Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

बँक खाजगीकरण विरोधी मोहिमसह देशभरातील खाजगी करणाला भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून विरोध ,गावोगावी जाऊन जनजागृती ,सह्याची मोहीम सुरू.

पारगाव:- वाशी तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने केंद्र सरकार कडून होत असलेल्या खाजगीकरणाला विरोध केला जात आहे.सध्या बँक खाजगीकरणं होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.त्या संदर्भात व विविध क्षेत्रातील खाजगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी गावोगाव जाऊन जनजागृती केली जात आहे.या खाजगीकरण विरोधी सह्याची मोहीम राबविण्यात येत आहे. अधिक माहिती अशी की,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी कॉ.पंकज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाशी तालुक्यातील विविध गावात जाऊन नागरिकांत केंद्राकडून होत असलेल्या खाजगीकरण विरोधी संदर्भात जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे.दि.31 ऑक्टोबर रोजी सकाळी तालुक्यातील लाखणगाव येथे कॉ.पंकज चव्हाण यांनी नागरिकांना संबोधित केले.केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करत असल्याने गोरगरिबांना ,मजूर वर्गाला,शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसत आहे.रेल्वेचे खाजगीकरण केले आहे.साधं फ्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी ही आता पन्नास रुपये लागत आहेत. गरीबाच्या पोरांना रेल्वेत बसणं सोडा फ्लॅटफॉर्म पाहण ही शक्य होणार नाही.सध्या बँकेचे खाजगीकरण करणं सुरू आहे आणि वेळीच...

माणूस म्हणून जग माणसा.....

माणूस म्हणून जग माणसा, जिवन खूप लहान आहे.... सर्वांशी प्रेमाने वाग माणसा, आयुष्य खूप छान आहे... बनू नकोस अहंकारी, अहंकार तुझा घात आहे.... नम्रतेने वाग माणसा, ही तर तुझी जात आहे... कपटी पणाने वागू नकोस, यांतच तू लहान आहे... ठेव तुझे मन स्वच्छ, यातच तू महान आहे.. सर्व विश्ववाटले जरी वाईट, धीर तू सोडू नकोस.... तुझ्यातला आंतरआत्म्याला वाईट मार्गाला ओढू नको... चंदनासारखं आयुष्य तुझं, चांगल्या कामात झिजव तू.. कोणाचीही इर्षा न करता,प्रेम, आशीर्वाद कमव तू... आयुष्याच्या वाटेवर चांगले काम करत रहा.. तू असताना वतू नसताना तुझी छाप सोडून जा,तुझी छाप सोडून जा.... - कवी  किरण साळुंखे राज्यशास्त्र विभाग                                   श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयबार्शी

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून यांच्या कडून ई -पास ची होळी

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून यांच्या कडून  ,ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला पंढरपूर/-नामदेव लकडे - महाराष्ट्र राज्य सरकारने एसटी महामंडळाची बस प्रवासींना विना पास राज्यभरातून प्रवास करण्यासाठी सुरू केली व खाजगी वाहनधारकांवर ई पास ची सक्ती आणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आनली एकीकडे प्रशासन कोरोणा पासून वाचण्याचे संदेश देत आहे व त्यावर अनेक उपाययोजना ही करत आहे आणि एकीकडे अनोळख्या व्यक्तिबरोबर व लक्षणे माहीत नसलेल्या व्यक्ति बरोबर प्रवास करण्यास परवानगी देत आहे आणि लॉकडाऊन मुळे चार महिने घरातच राहणाऱ्या सदस्यांबरोबर प्रवास करण्यास बंधने घालत आहे. एकीकडे सरकार आपला महसूल (तिजोरी) भरण्यासाठी जनतेचा जीव धोक्यात घालत आहे आणि एकीकडे गोरगरिबांना करून खाण्यासाठी बंधने आणून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणत आहे.या वाहन धारकांना धंदे नसल्याने यांनी बँका व फायनान्स वाल्यांचे हप्ते कसे फेडायचे आज गाडी चा व्यवसाय करून खाण्यावर तगादा लावून त्यांच्या गाड्या ओढून नेत आहेत अश्या गोर गरीब वाहनधारकांनी जगावे की मरावे हा प्रश्न या वाहनधारकां...

अॅड. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील , नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच : आनंद चंदनशिवे

विठ्ठल मंदिर उघडण्यावर वंचित,विश्र्व वारकरी सेना ठाम ; वंचितला प्रतिसाद पाहून भाजपाचाही घंटानाद आंदोलन फार्स पंढरपूर/नामदेव लकडे- लाॅकडाउन मुळे मागिल पाच महिन्यांपासून बंद असणारे विठ्ठलाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे यासाठी मंदिर प्रवेश करणारच यावर वंचित बहुजन आघाडी व विश्र्व वारकरी सेना ठाम असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हाणून पाडीत आंदोलन यशस्वी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.ते पंढरपूर येथे पञकार परिषदेत बोलत होते. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने राज्यभर घंटानाद आंदोलन केले. यावर वंचित बहुजन आघाडीने टीका केलीय. भाजपचे ‘दार उघड’ आंदोलन मंदिरासाठी नाही सत्तेसाठी आहे. सत्तेचे दार उघडण्यासाठी हे सारे खटाटोप आहेत. प्रकाश आंबेडकर यांना राज्यभरातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे भाजपने आंदोलनाचा फार्स केला आहे, असेही चंदनशिवे म्हणाले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर खुले करण्यासंदर्भात वंचित बहूजन आघाडी व विश्र्व वारकरी सेनाच्या वतीने सोमवारी होणार्या आंदोलनाची माहितीही दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबे...

कोरोना ,लॉकडाउन आणि बांधकाम कामगार

महाराष्ट्रामध्ये मागील एक वर्षापासून नोंदीत बांधकाम कामगारांची सर्व कामे जवळजवळ थांबलेली आहेत. वर्षांपूर्वी अनेक जिल्ह्यात आलेला महापुर, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आणि आता लॉक डाउन या सर्वांमुळे महाराष्ट्रातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांमध्ये बांधकाम कामगारांचे काम करणे त्यांनी बंद ठेवलेले आहे.त्याच बरोबर सध्या   covid-19 ची साथ असल्यामुळे प्रत्यक्षामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करता येणार नाही असे सांगून ऑनलाईनच नोंदणी करा असा आदेश बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत महाराष्ट्रातील सर्व सरकारी कामगार अधिकाऱ्यांना 23 जुलै 2020 रोजी करण्यात आलेला आहे. संपूर्ण देशामध्ये covid -१९ ची साथ पसरत चालली असून महाराष्ट्र राज्य या रोगापासून धोकादायक परिस्थिती निर्माण होणारे एक राज्य बनले आहे . मागील  सहा महिन्यापासून देशातील बांधकाम व असंघटीत उद्योगामधील कामगार  बेकारी व उपस्मारीमध्ये होरपळून निघत आहेत .आशा वेळेस महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगराना  आर्थिक सहाय करण्याऐजी बांधकाम कामगारांच्या असलेल्या योजना बंद करीत चालले आहे .मागील सहा महिन्यापासून नोंद...

जनावरांचा आठवडी बाजार साळेगाव येथेच भरणार , अफवांवर विश्वास ठेवू नये -- सरपंच कैलास जाधव पाटील

केज /अमर पाठक :- केज तालुक्यातील साळेगाव येथे भरणारा प्रसिद्ध असा जनावरांचा आठवडी बाजार हा मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने पूर्वी प्रमाणे साळेगाव येथेच भरणार असून खोडसाळपणे सोशल मिडयावर अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. साळेगाव ता. केज येथे मागील ५० वर्षा पेक्षा अधिक काळा पासून दर गुरूवारी जनावरांचा व शेळ्या मेंढ्यांचा आठवडी बाजार अखंड भरत आहे. परंतु कोरोना व्हायरसचा संसर्ग किंवा फैलाव होवू नये आणि नागरिक व बाजारकरी मंडळी यांच्या जिविताला कोणताही धोका किंवा हानी पोहोचू नये. त्यांना त्रास सहन करावा लागू नये. म्हणून मा. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड जिल्ह्यातील सर्व नियमित भरणारे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  त्यामुळे साळेगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेशा पर्यंत बंद आहेत. याचा गैरफायदा घेऊन आणि मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा विरुद्ध काही लोकांनी खोडसाळपणा करून शेजारच्या गावा जवळ आडरानात आणि पारधी समाज बांधवांच्या वस्तीच्या शेजारी बाजार भरणार असल्याच्या अफवा पसरविण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला आहे.  अशा अफ...

भाजपची दार उघड आंदोलनातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीने केली घणाघाती टीका

भाजपने आज दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन केलं. पंढरपूर/नामदेव लकडे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मंदिरे पाच महिन्यांपासून बंद होती. अनलॉक 3 मध्ये केंद्र शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने अद्याप मंदिरे उघडली नाहीत. राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने विश्व वारकरी सेनेच्या मंदिरप्रवेश आंदोलनाला पाठिंबा दिला. 31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश केला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या मंदिर प्रवेश आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे . याच पार्श्वभूमीवर भाजपने आज दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन केलं.भाजपच्या या आंदोलनावर वंचित बहुजन आघाडीने जोरदार टीका केली आहे. 'हे आंदोलन मंदिराचे दार उघडण्यासाठी नाही तर सत्तेचे दार उघडण्यासाठी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली आहे. भाजपचे मंदिर उघडण्याचे आंदोलन...

घराची सजावट स्वस्त आणि मस्त

कितीही महागडे कपडे किंवा कोणतीही वस्तू सतत वापरून आपल्याला त्यांचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे मग आपण दिवसभर ज्या घरात राहतो त्या घरातले वातावरण बदल ही तेवढेच गरजेचं असत. आपल्या घराला नवीन लुक देने हा आपल्याला नेहमीच खर्चिक आणि वेळखाऊ काम असे वाटते पण ते तस नक्कीच नाही, आता आपण घराला कमी खर्चिक आणि कमी वेळात होणाऱ्या काही गृहासजावटीच्या टिपा देणार आहोत. दरवर्षी घराची सजावट बदलणं नक्कीच गरजेच नाही पण आपण दार २ वर्षांनी तर हे काम करूच शकतो. यात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा भाग म्हणजे भिंती त्या आपण ५ ते ७ वर्षानंतर रंगरंगोटी साठी काढतो ते एक खर्चिक काम आहे हे काम आपण एकदाच कराव आपल्या घरातील भिंती ह्या शक्यतो पांढऱ्या ठेवण्याचा प्रयत्न असू द्या कारण पांढरा रंग घराला नेहमीच ताजा टवटवीत वातावरण देत असत. घरातील प्रकाश योजना वाढवण्यासाठी ही पांढऱ्या रंगाचा चांगला वापर होतो, तसेच कोणत्याही रंगासोबत जुळवून घेण्यासाठी सोप जाते. आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या घरातील प्रकाश योजना आपल्या घरात भरपूर प्रकाश नसेल तर ते भकास वाटते त्यामुळे नेहमीच प्रकाश पाहिजे त्यासाठी चांगल्या प्रकार...

बेजबाबदारपणे विद्वेशी वक्तव्य करणाऱ्या सुदर्शन चँनलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांचा मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून तीव्र निषेध

प्रतीनिधि /पुणे -  मुस्लीम समाजातील जे विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितिशी सामना आणि संघर्ष करुन युपीएससी परीक्षा देतात, या परीक्षेत  उतीर्ण होऊन फार कमी विद्यार्थी यशस्वीपणे आयएएस, आयपीएस, आयएफएस पदावर जाऊन सनदी आधिकारी होतात, भारतीय प्रशासन सेवेत योगदान देतात, या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याऐवजी सुदर्शन चँनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी आक्षेपार्ह विधान करुन धार्मिक द्वेष निर्माण केला आहे. आयएएस होणारे मुस्लीम विद्यार्थी म्हणजे "शासन व्यवस्थेच्या सर्वात मोठ्या पदावरील मुस्लीमांची घुसखोरी" असा जावई शोध लावून या चँनलवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या कार्यक्रमासंदर्भातील ट्वीटला तर थेट पंतप्रधान आणि आरएसएसला टँग करण्यात आले. या अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह वर्तनाची दखल घेऊन सनदी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवली तसेच दिल्ली उच्चन्यायालयात याचिका दाखल केली. दिल्ली  उच्च न्यायालयाने या कार्यक्रमाचं प्रसारण रोखणारी नोटीस दिल्यामुळे होऊ घातलेला कार्यक्रम रद्द झाला असला तरी ह्या  बेजबाबदार व...

राज्यातील शेळी-मेंढी व जनावरांच्या सर्व बाजारपेठा सुरू करा÷शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे

प्रतिनिधी/ नामदेव लकडे-गेल्या ६ महिन्यांपासून करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेळी-मेंढी व जनावरांच्या महाराष्ट्रभरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता बिइंग महाराष्ट्रातील इतर सर्व बाजारपेठा या सरकारने सुरू केलेल्या आहेत व नुकतीच बससेवाही सरकारने सुरू केलेली आहे.परंतु सरकारने अजूनही शेळी-मेंढी व जनावरांच्या बाजारपेठा सुरू केलेल्या नाहीत.सर्व बाराजपेठा बंद असल्यामुळे शेतकरी बांधव व शेळी-मेंढी पालन करणारा धनगर समाज हवालदिल झालेला आहे.  यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.यामुळेच जिल्ह्यातील येथील शेतकऱ्यांनी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांच्याकडे तेथील बाजरपेठ सुरू करण्याविषयी व्यथा मांडली.संघटनेने लगेच महाराष्ट्राचे दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.कारण हा विषय सविस्तर मांडून.शेतकरी आणि व्यापारी शेळी-मेंढी पालन करणाऱ्या धनगर समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या तसेच हा विषय गंभीर असून यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.  असे मत शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज...

संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी श्री.विश्वजीत (मुन्ना) भोसले यांची निवड

पंढरपूर/नामदेव  लकडे -संभाजी ब्रिगेड ची महत्वपूर्ण मिटींग पंढरपूर येथे झाली यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आणि संभाजी ब्रिगेड च्या पंढरपूर शहर कार्याध्यक्ष पदी मा श्री विश्वजित भोसले यांची निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, छावा संघटना शहराध्यक्ष सागर चव्हाण, स्वराज्य संस्थापक संदीप मुटकुळे, विक्रमसिंह भोसले, अॅड सागर आटकळे, अॅड कीर्तीपाल  सर्वगोड, राष्ट्रवादी उपाध्यक्ष दादा थिटे,शिवसेनेचे तानाजी मोरे , निलेश गंगतडे, सोपानकाका देशमुख,संतोष बंडगर,विशाल भोसले,रोहीत शिंदे,विकी झेंड,रामेश्वर साळुंखे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा -राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक पवार यांची पालकमंत्री यांच्या कडे मागणी

पंढरपूर/ नामदेव लकडे -मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता डाळिंब पिकामुळे नवीन एक संकट ओढवले आहे.या संकटाशी सामना करणाऱ्या या शेतकऱ्यांना आता शासनाने त्वरित मदत घ्यावी अशी मागणी पंढरपूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍड दीपक पवार यांनी सोलापूर जिल्ह्यचे पालकमंत्री ना.दत्तामामा भरणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सध्या डाळिंब पिकावर तेल्या आणि कुजवाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. यामुळे या डाळिंब फळबागाचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी दीपक पवार यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत विद्यार्थी, पालक, सर्व कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी चर्चा करून निर्णय मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते.श्री. सामंत म्हणाले,सर्व अकृषी विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देऊन कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत परीक्षेचे नियोजन करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांच्याशीसुद्धा याबद्दल सविस्तरपणे चर्चा करून विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांचे कसलेही खच्चीकरण होणार नाही, आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक...

वंचित च्या मंदिर प्रवेश आंदोलनास शेतकरी संघर्ष संघटनेचा पाठिंबा

प्रतींनिधी / मंगळवेढा - वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटना जाहीर पाठिंबा दिला आहे . त्याचबरोबर शेतकऱ्यांना घेऊन  आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक आमिर आतार यांनी सांगितले आहे . शासनाकडून कोरोणाच्या राष्ट्र भूमीवर जाहीर करण्यात आल्यामुळे देशातील व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकाचे मंदिरांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिकत असलेले फुले-फळे याला मार्केट मिळत नाही त्याचबरोबर नारळ कळते उत्पादन शेतकरी यांचे नुकसान होत आहे पंढरपूर शहरातील छोटे-मोठे सर्वसामान्य व्यापारी यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे पंढरपुरातील अर्थकारण ढासळले आहे कोणत्याही परिस्थितीत श्री विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे या आंदोलनास शेतकरी संघर्ष संघटनेचा  यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती   शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री हंसराज वडघुले...

श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा अंधत्व निवारण समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी शिबिर

सोलापूर/शाम आडम  - श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा अंधत्व निवारण समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी दिनांक २९/०८/२०२० रोजी क्रांती चौक कॉ गोदुताई विडी घरकुल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यात जवळपास ६० जणांना तपासणी करण्यात आली होती त्यात या नेत्र तपासणी दरम्यान ५ रूग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली.ह्या नेत्र तपासणी शिबिराकरीता डॉ शिवाजी पाटील,सुरज जाधव, रमेश देशपती व अंजली गायकवाड यांनी मार्गदर्शन केले व हे शिबीर यशस्वी करण्यासाठी  मंडळाचे विनायक भैरी, नागेश बंडी, महेश जक्कुल, संतोष बोडा, अमोल म्हंता, नागेश कासुल,पवन गुंडेटी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकरी संघर्ष संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांची निवड

हुलजंती/अमीर आत्ताऱ  : शेतकरी संघर्ष संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी हुलजंती गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले व पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष जनार्धन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.या निवडी बद्दल सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.  लवकरच पश्चिम महाराष्ट्र कारकरणीचा विस्तार करण्यात येणार आहे, तरी जे कोणी या सामाजिक संघटनेत सहभागी होऊन सामाजिक कार्य करू इच्छितात त्यांनी माझ्याशी अथवा  पश्चिम महाराष्ट्र संघटक अमीर अतार यांच्याशी संपर्क साधा असे नव नियुक्त पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांनी सांगितले आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असेही ते म्हणाले.

कर्जदारांना हप्ते भरण्याकरिता जानेवारी 2021 अखेर पर्यंत मुदतवाढ मिळावी -अखिल भारतीय छावा संघटना

अखिल भारतीय छावा संघटनेकडून  पंढरपूर चे प्रांताधिकारी यांना निवेदन देताना पदाधिकारी आणि कार्यकर्ते  पंढरपूर/नामदेव लकडे -कोरोणा सारख्या महाभयंकर आजारामुळे संबंध देशातील नव्हे तर जगातील सर्व अर्थव्यवस्था कोलमडली आहे या महामारी मध्ये सर्वांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट व हालाखीची झाली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत आहे अशातच वित्तीय संस्था फायनान्स मायक्रोफायनान्स महिला बचत गट वाहन कर्ज व्यवसाय कर्ज सरकारी बँक या वारंवार कर्जदारांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तगादा लावत आहेत त्यामुळे संबंधितांना मानसिक त्रास होऊन अनेकांनी आत्महत्या देखील केले आहेत या सर्व बाबीचा विचार करून जानेवारी 2021 अखेरपर्यंत कर्जाचे हप्ते भरण्यास या कर्जदारांना मुदतवाढ मिळावी असेल आपणाकडून लेखी आदेश व्हावेत ही एवढीच विनंती आम्ही निवेदना द्वारे आपणा कडे करत आहोत.तसेच या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी करत आहोत.निवेदन देते वेळी अखिल भारतीय छावा...

प्रकाशातून अंधारकडे नेणाऱ्या महावितरण कंपनीचा कुटील डाव हाणून पाडा - कॉ.आडम मास्तर

सरसकट वीजबिल माफीसाठी माकप च्या वतीने  25 हजार वीजबिलांची आक्रमक  होळी.    सोलापूर/दत्ता चव्हाण  -  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील उद्योजकांना दर 1 युनिटला 2 रुपये 76 पैसे वीजबिलाची आकारणी तर सर्वसामान्यांना दर 1 युनिटला 7 रुपये वीजबिल आकारणी केली जाते. या उद्योजकांसाठी राज्य सरकार कडून  स्वतःच्या तिजोरीवर ओझे टाकून 800 कोटी रुपये अनुदानपोटी महावितरण कंपनीला अदा केली जाते. ही तफावत महाराष्ट्राला आर्थिक विषमतेकडे नेत आहे. शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेचा (प्रकाशाचा)  शोध लावले ते जगाला अंधारातून मुक्त करण्यासाठी मात्र आज महावितरण कंपनी पुन्हा श्रमिकांना प्रकाशातून अंधाराकडे नेऊ पाहत आहे तरीही सरकारला याची जाग का ? येत नाही याहून अधिक दुर्दैव दुसरे असूच शकत नाही.हा हेतुपुरस्सर रचलेला डाव असल्याची परखड  टीका ज्येष्ठ कामगार नेते कॉ.नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला 68 हजार कोटी रुपयांची अर्थातच अब्जावधी रुपयांची टोपी घालून  विजय माल्या, निरव मोदी, मेहुल चोकशी देशाला बुडवून पळून गेले अशांचे बँके...

जालना जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याचा डाळींब शेतीचा प्रयोग यशस्वी

जालना /विशेष प्रतिंनिधी - आपला देश कृषी प्रधान आहे.व तो राहवा हाच ध्यास घेऊन अनेक शेतकरी शेती मध्ये नवनवीन प्रयोग करीत आहे.यासाठी केवळ  शासनावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेऊन शासकीय योजनाचा लाभ घेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात .परंपरागत पध्दतीत  नाविण्यपुर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती अजूनही उत्तम उत्पन्न देऊ शकते. हे सिध्द करुन दाखविले आहे.ध्येयवेड्या प्रदीप संदीप ठोंबरे या युवा शेतकऱ्याने .मराठवाड्यातील चांदई ठोंबरी ता भोकरदन जि.जालना येथील संदीप गणपत ठोंबरे हे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेतीमध्ये कापूस ,मका,तूर,ज्वारी ,गहू आदी परंपरागत पिके घेत  यातून घरखर्चा पूरते उत्पन्न मिळत होते .परंतु शेतीमध्ये पाहिजे तसा विकास नव्हता सोबत मराठवाड्यात सतत पडणारा दुष्काळ यामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडले होते .यावर मात करण्यासाठी मुलगा प्रदीप ठोंबरे यांनी नाविण्यपूर्ण प्रयोग करण्याचा विचार केला.महाविद्यालयीन शिक्षण घेत शेतीची आवड म्हणून अनेक औषधी वनस्पतींची लागवड करुन त्याचे जतन करणे हा त्याचा छंद यामुळेच फळबागाची कल्पना सुचली याविषयी वडीला सोबत चर्चा करुन श...

७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय; सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून होणार अधिवेशन मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब,विधानपरिषदेतील विरोधी पक्ष...

शेतकरी कष्टाच्या घामासोबत संस्काराचे मोती पिकवतो! - बळीराजाच्या आयएएस मुलाच्या यशाबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुकोद्गार

जळगाव :-  शहरातील मुलेच उच्च अधिकारी होवू शकतात असा आजवर समज होता. परंतु कांतीलाल सुभाष पाटील या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आणि कोणताही क्लास न लावत युपीएससी उत्तीर्ण होऊन हा समज खोडून काढला आहे. शेतकऱ्याचा मुलगाही आयएएस होऊ शकतो, हे दाखवून शेतकरी कष्टाच्या घामासोबत संस्काराचे मोतीही पिकवतो असा आत्मविश्‍वास त्यांनी समाजाला दिला असल्याचे कौतुकोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील कांतीलाल पाटील यांच्या सत्काराप्रसंगी काढले.  भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथील कांतीलाल सुभाष पाटील या तरूणाने यंदाच्या युपीएससी परिक्षेत यश संपादन केले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्याचा हृदय सत्कार केला. याप्रसंगी त्यांचे वडील सुभाष पाटील, भुसावळचे नगरसेवक मनोज बियाणी व सामाजिक कार्यकर्ते राजू पारख यांची उपस्थिती होती.  याप्रसंगी गुलाबराव पाटील यांनी कांतीलाल पाटील यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आमचे जुने सहकारी तथा जुने शिवसैनिक सुभाष पाटील यांच्या चिरंजीवांनी मिळवलेले यश हे अतिशय अभिमानास्पद आहे. खरं तर शहरातील मुलेच उच्...

सोयाबीन पिवळे पडण्याची संभाव्य कारणे व उपाय

सध्या अनेक भागात पाऊस पडल्याने सोयाबीन सह उडीद , मूग ,तूर पिकांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे पिकावर वेगवेगळे रोग पडत.त्याचाच एक भाग म्हणजे सोयाबीन पिवळे पडणे ,याची कारणे व उपाय खालील प्रमाणे -  सोयाबीन पिवळे पडण्याची संभाव्य कारणे: १. सततचा पाऊस  २. शेतात पाणी साचून राहणे,  ३. ज्यास्त दिवस ढगाळ वातावरण ४. दिवसाचे अधिक तापमान ५. अन्नद्रव्यांची कमतरता ६. रस शोषक किडींचा प्रादुर्भाव (पांढऱ्या माशीमुळे यलो मोसाईक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो) ७. खोडमाशी, चक्रभुंगा किडीचा प्रादुर्भाव लक्षणानुसार योग्य उपाययोजना कराव्यात: १. शेतात पाणी साचू देऊ नये. साचले असेल तर नाली तयार करून पाणी शेताबाहेर काढून घ्यावे. २. पिवळे चिकट सापळे १० प्रति एकरी या प्रमाणात लावावेत. ३. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या आंतरप्रवाही कीडनाशकाची फवारणी करावी. ४. सोयाबीन पिकाचे पाने पिवळी झालेली व पानाच्या शिरा हिरव्या असल्याचे दिसून येत असतील तर सदर प्रकार लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो त्यावर उपाय म्हणून, त्वरीत ५० ग्...

अर्जुन पुरस्कार प्राप्त सारीका काळे यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार

उस्मानाबाद /अक्षय वायकर - अर्जुन पुरस्कार प्राप्त सारीका काळे यांचा वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रवक्ता राम गायकवाड , जिल्हा कार्यकारिणी सदस्य अंकुश लोखंडे(माजी सैनिक)बाबासाहेब जानराव , आर. एस.गायकवाड ,सचिन लोखंडे ,युवा नेते अंकोल वाघमारे , अनुराधा लोखंडे ,ज्योती लोखंडे ,सुदर्शन बनसोडे ,कवी-गोविंद भंडारे ,जगन्नाथ वाघमारे ,राहुल कांबळे ,सुरज बिराजदार  इत्यादि उपस्थित होते. 

गुळपोळी येथे रक्तदान शिबीरात महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद

  बार्शी /अब्दुल शेख - कै.सुखदेव शिवाजी चिकणे यांच्या 21 व्या  पुण्य स्मरण निमित्त व कोवीड 19 च्या महामारी ने रक्ताचा तुटवडा आहे ,या निम्मीत्ताने गूळपोळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिराचे आयोजन  भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय गुळपोळी ,भैरवनाथ ग्रामीण पतसंस्था गुळपोळी, नेहरू युवती मंडळ गुळपोळी,नेहरू युवा मंडळ गुळपोळी,भैरवनाथ ग्रामविकास मंडळ गुळपोळी,शिवतेज मंडळ गुळपोळी  यांच्या वतीने करण्यात आले होते.  या रक्तदान शिबीराचे उदघाटन सुर्डी ग्रामपंचायतीचे  सदस्य धिरज श्रीरंग डोईफोडे व जी एस टेलर चे संचालक गुलाब हुसेन शेख  यांचे हस्ते करण्यात आले. सदर रक्तदान शिबीर मध्ये महिलांनी  उत्साहित होउन स्वयंस्फुरतीने रक्तदान केले. या शिबीरात 32 रक्तदाते यांनी रक्तदान केले.शिबीरामध्ये रक्तदाते यांना विस लिटर थंड पाणी ठेवणयाचा जार चा भेट म्हणुन देण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थिति अक्षय चंद्रकांत सावंत ,सुनिता चिकणे , सौरभ कापसे , राजेंद्र गोरे , गणेश लंगोटे प्रहार संघटना उपाध्यक्ष बार्शी तालुका व पोलीस पाटिल बाळकृष्ण पिसे , अतुल चिकणे ...

युवा प्रतिष्ठान पांढरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गावातील नागरिकांनी राबविलेला उपक्रम खूप स्तुत्य असून यातून येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळेल आणि गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्रयत्न करतील असेच स्तुत्य उपक्रम गावाच्या हितासाठी नेहमी राबवले जावे,सर्वांचे मनस्वी अभिनंदन. यशस्वी  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन - राजू घावटे सरपंच  बार्शी / प्रतींनिधी - युवा प्रतिष्ठान पांढरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.युवा प्रतिष्ठान पांढरीच्या वतीने 2014 पासून आज पर्यन्त समाज हिताचे अनेक कार्यक्रम राबविले जातात.यावर्षी कोरोना च्या संकटमुळे व सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करत 10 वी व 12वी मधे उतीर्ण झालेल्या विद्यार्त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पांगरी पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक शिरसट साहेब , पत्रकार इरशाद शेख , वकील श्रीधर जावळे उपस्थित होते. यावेळी नुमंत घावटे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण घावटे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश घावटे यांनी केले. हा कार्यक्रम पार पडन्यासाठी लक्ष्मण घावटे सर,महेश घावटे ,अच्युत घावटे , ग...

हुलजंती येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढा - जनकल्याण फाउंडेशन

 हुलजंती/अमीर आत्तार -   मंगळवेढा तालुका येथील पश्चिम भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून हुलजंती ओळखले जाते. गेली 10 ते 12 वर्षे झाले गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी  यांनी आवा च्या सव्वा रक्कम घेऊन  हुलजंती गावठाण व येथील सरकारी जमिनी लोकांच्या नावाने बेकायदेशिरपणे नावे केले आहेत . गावातील तीस-चाळीस टक्के तरुण सुशिक्षित बेकार असून त्यांनी ग्रामपंचायत कडे व्यवसायासाठी जागेची मागणी करतात .परंतु ग्रामपंचायत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू उदरनिर्वाह करण्यासाठी जागा देत नाही  .विचारल्यास गावांमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगतात . परंतु गावाबाहेरील नातेवाईक पाहुण यांना मात्र जागा उपलब्ध कशी होते . गावातील काही तरुण ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही जगा देत नसल्याकारणाने जन कल्याण फाउंडेशनच्या वतीने आज  रोजी ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले असून निवेदन दिले.  यावेळी वेळी सोलापूर जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), ग्राहक मंच तालुका अध्यक्ष अमोल कोरे , युवा नेते मारुती पेटर्गे, हिम्मत पेटर्गे, सिद्धेश्वर पेटर्गे, सुनील...

वेतन कपात करणार्‍या शासन निर्णय विरोधात 28 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी - आयटक संलग्न सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने 28 ऑगस्ट रोजी वेतन कपात करणार्‍या शासन निर्णया विरूध्द काम बंद अंदोलन होणार आहे. अधिक माहिती अशी की, 28 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतींची वसूली व उत्तपन्नाची अट बंधनकारक केल्यामुळे त्याचप्रमाणे लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध अद्याप चालू असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्यांना वसूलीच्या प्रमाणात 50 टक्के आणि 75 टक्के वेतन मिळणार आहे.  म्हणजे 10 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्राच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने किमान वेतनाचे दर पुर्ननिर्धारित करून ते परिमंडळ 3 मधील कर्मचार्यांना 13085 रूपये मान्य केले असले तरी वरील शासन निर्णयामुळे त्याचा लाभ कर्मचार्यांना मिळणार नाही.  एका हाताने देण्याचे नाटक करायचे तर दुसर्या हाताने हिसकावून घ्यायचे या सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संतप्त झाले आहेत.  म्हणून 28 जूलैचा शासन निर्णय रद्द करून शासनमान्य वेतन 100 टक्के शासनानेच करणे आवश्यक आहे.  या प्रमुख माण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 जूलै रोजी अंदोलन केले होते....

नवीन पिक कर्जाचे तातडीने वाटप करा ,महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांना आ. नमिता मुंदडांच्या सूचना

 केज/अमर पाठक -  विविध संकटांचा सामना करत शेतकरी खरीप हंगामाला सामोरे जात असताना बँकांकडून मात्र त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वारंवार खेटे मारूनही बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज देण्यात यावे, विशेषतः नव्या पिक कर्जाचे तातडीने वाटप करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.  कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीक कर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही.  धान्य विकल्यानंतर कर्ज देणार का असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. यासंदर्भात आ. मुंदडा यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस बँकेचे बीड जिल्हा प्रमुख  कुलकर्णी यांच्यासह मतदार संघातील सर्व शाखांचे व्यवस्थापक हजर होते. मागील २०-२५ वर्षात महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे जी गावे दत्तक आहेत तिथे एसबीआयने मोठ्या प्रमाणात पिक कर्ज...

मुस्लिम मुलांकडुन दहा वर्षापासुन गणेश प्रतिष्ठापना , कुंटुंबियाचाही सहभाग

अक्कलकोट/ जयकुमार सोनकांबळे :- खैराट येथील एक मुस्लीम धर्मीय मुलगा गेल्या दहा वर्षापासुन घरात गणपती बसवत असुन विविधत पुजा अर्चा करून विधिवत मिरवणुक काढुन विसर्जन करत असुन हिंदु मुस्लिम भाऊबंदकीचा आदर्श सर्वासमोर ठेवला असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.जहिर हुसेन बिराजदार (रा.खैराट )असे या मुलाचे नांव असुन तो इयत्ता आठवीत आहे. बालवाडीत असल्यापासुन वयाच्या चौथ्या वर्षापासुन जहिर बाप्पाचे आकर्षक असुन तेव्हापासून सलग दहा वर्षे झाले तो विधिवत गणेश मुर्तीची स्थापना करून सकाळ संध्याकाळ आरती करतो.या गणेश पुजनच्या वेळी त्याचे शेजारचे मित्रमंडळीही हजेरी लावतात.या लहान मुलाचे आदर्श घेऊन आपण एकमेकांचे सण उत्सव साजरे करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे. व जगात सर्वशेष्ठ आहे अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल हुसेन बिराजदार यांनी व्यक्त केली. आम्ही कुंटुंबीयही याला सहकार्य करतो असे सांगितले.मुलाचे आजी आजोबा स्वतः सर्व धर्म समभाव मानणारे असुन तेही याला विरोध करत नाहीत.बिराजदार कुंटुंबीय सगळेच या उत्सवात सहभागी होतात.जहिरचे दोन मोठे बंधुसह चुलत बहिण भाऊही या गणेश उत्सवात सहभागी होतात.जहिर नित्यनियमाने नम...

राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी किर्ती मोरे तर शहराध्यक्ष पदी डाॅ.अमृता मेनकुदळे यांची निवड

पंढरपूर/ नामदेव  लकडे -सोलापूर जिल्ह्यातील महिला व युवती  यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिला व युवती यांचे एक मजबूत संघटन तयार करून महिला व युवती यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नुतन पदाधिकारी निवडी करण्याच्या सुचना जिल्हा निहाय अध्यक्षांना दिल्या होत्या. .त्याप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस युवती पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी किर्ती रामचंद्र मोरे व पंढरपूर शहर अध्यक्ष पदी डाॅक्टर अमृता अनिल मेनकुदळे यांची निवड केली असुन त्यांना.त्यांच्या निवडीचे पञ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती अध्यक्ष श्रीया भोसले,पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बालाजी मलपे,पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधिर भोसले, मराठा मावळा तालुका अध्यक्ष अॅqडव्होकेट महेश आटकळे आदी उपस्थित होते. 

नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!

औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र हे सातत्याने अग्रेसर राहिले आहे. याला कारण म्हणजे आपल्या राज्याची भौगोलिक स्थिती, राज्यात वीज, पाणी आणि जमिनीची असलेली मुबलक प्रमाणातील उपलब्धता यासह आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षण संस्थांमुळे कुशल मनुष्यबळ यांचाही मोठा वाटा आहे. राज्यातील उद्योगस्नेही धोरणाबरोबरच, उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या विमानतळ, जेट्टी, यांच्यासह दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा आहेत. देशात सातत्याने उद्योगक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रालाही कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अडचणींना तोंड द्यावे लागले होते. महाराष्ट्राचा अर्थचक्राला फिरतं ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे देश विदेशातून राज्यात येणारी राष्ट्र्रीय तसेच परकीय गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारे कुशल अकुशल कामगारांचीही आवश्यकता आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मजुर, कामगार जे परराज्यातून इथे पोटापाण्यासाठी आले होते, ते मोठ्या प्रमाणात स्थालांतरित झाले. टाळेबंदीमुळे अनेक उद्योगांना आपले उद्योग बंद ठेवावे लागले. ही टा...