Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटप

सोलापूर /विशेष प्रतींनिधी - सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले गटनेते चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे हे उपस्थित होते. यानंतर माननीय आमदार यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची त्यांच्या कार्यालयात तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सीओ श्री.दिलीप स्वामी यांची देखील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. आमदार लाड यांच्या वतीने जूळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी येथील शासकीय क्वारंटाइन सेंटर मधील महिला डॉक्टर तसेच रुग्णसेवक यांना १०० PPE कीट प्रदान करण्यात आले.यावेळी मनपा उपायुक्त धनराज पांडे, मनपा क्रीडाधिकारी...

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश

मुंबई : वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 1 जुलैपासून सुरूवात होणार असून या सत्रातील प्रवेशासाठीची अंतिम तारीख वाढवून आता 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2021-2022 या चालू वर्षातील, दिनांक 01 जुलै 2021 ते दिनांक 31 डिसेंबर 2021 या सहा महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. यासाठी, प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क रूपये 450/- तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा रूपये 100/- एवढे आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी विहीत अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली,वर्सोवा, मुंबई - 61 येथे दिनांक 30 जून 2021 पर्यत सादर करावे, असे...

थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा

शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा - आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी सांगली  /विशेष प्रतिंनिधी - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील ,क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांचे सहकारी,सातारा प्रतिसरकारच्या लढ्यातील तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र लाड (भाऊ)यांना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र च्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. काल 21 जून 2021रोजी पलूस येथे घेण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे भविष्यकालीन धोरण ठरवण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दगडू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रारंभी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन क्रांतिवीर रामचंद्र लाड तथा भाऊ हे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत . त्यामुळे कॅप्टन भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा ठराव करण्यात आला व भ...

शावळ येथे वृक्षारोपण,फादर्स डे चे औचित्य साधत भोसले परिवारांचा उपक्रम

  सोलापूर / मनमोहन भोसले - अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे फादर्स डे चे औचित्य साधत डॉ मेंटन फाउंडेशन यांच्या सौजन्याने व कै भीमराव तुळशीराम भोसले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सुंदर भोसले यांनी केले होते. यावेळी गावचे सरपंच सोमलिंग तामदंडी ,ग्रामसेवक संतोष म्हेत्रे ,सदस्य संजय भोसले ,  सदगुरू महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा रुपाली गणेश पाटील ,शिवबा फाऊंडेशन संस्थापक सिद्धेश्वर सर्जेराव सुरवसे,जिजाई कन्स्ट्रक्शन शावळ अध्यक्ष  भीमा गोरख सुरवसे,श्रीमंत भोसले, नितीन चव्हाण,मनमोहन भोसले, प्रेमनाथ भोसले , परमेश्वर भोसले, समर्थ भोसले आदी उपस्थित होते.

Jobs - बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी

 बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी भरती २०२१. पदाचे नाव: कार्यालय सहाय्यक आणि वॉचमन कम माळी. रिक्त पदे: 02 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई. अर्ज करण्याची पद्धद्त : ऑफलाईन. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुन 2021. वेबसाइट - https://bankofindia.co.in/ जाहिरात -  येथे क्लिक करा अर्ज पाठवण्याचा पत्ता: बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, आरोग्य मंदिर जवळ, रत्नागिरी – कोल्हापूर महामार्ग, शिवाजी नगर, रत्नागिरी 415639.

संभव फाऊंडेशन व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात ३ हजार रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

  शहर प्रतिनिधी /सोलापूर  - आज जगभरात कोरोना विषाणू ची महामारी सुरू असताना लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत, सर्वत्र शासनाने लागु केलेल्या संचारबंदी मुळे होतकरू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली असून यात कष्टकरी विडी कामगार, घरेलू कामगार महिला, फेरीवाले, बांधकाम कामगार समूहाचे पण तितकेच हाल होताना दिसत आहेत. सोलापूर शहरातील तळागाळातील गरीबां पर्यंत मदत पोहचुन सेवा पुरवणारी संभव फाऊंडेशन गेल्या काही दिवसांपासून लॉक डाउनच्या काळात कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेत ही अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे कार्य सुरू ठेवले असून या मध्ये आटा, डाळ, तेल, साखर, हळद, मीठ व मास्क असे जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून पोटाची खळगी भरण्यासाठी दोन हातांशी धडपडणाऱ्या सोलापूर शहरातील  तीन हजार चारशे होतकरू, कष्टकरी गरजवंताना सदर किट चे वाटप करण्यात आले.  हे रेशन किट जुने विडी घरकुल, नवीन विडी घरकुल कुंभारी, मुळेगाव, कुमठे, दोड्डी, बेलाटी, मिलींद नगर, एस.टी बस स्टँड, जुना बोरामणी नाका, गांधी नगर, रविवार पेठ, मोदी, सुत मिल, हब्बु वस्ती, माने वस्ती, जवळकर...

कोवीड 19 गेम चेंजर या विषयावर ऑनलाईन राज्यस्तरीय झाली पोस्टर स्पर्धा

  बार्शी/प्रतिनिधी - श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शीच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने' कॉव्हिड 19, द गेम चेंजर' या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती.  महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी काढलेल्या 50 पेक्षा जास्त पोस्टर्सचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.  या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनीही यात भाग घेतला आणि 18 पेक्षा जास्त पोस्टर नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन झा आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रो. डॉ. ए. एम. देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायलॉस्ट सोसायटी, इंडिया  यांच्या हस्ते झाले.  त्यांनी कोरोनावरील अतिशय माहितीपर व्याख्यान दिले. प्रथम स्नेहा नलवडे,  द्वितीय स्वेता जाधव, तृतीय भूमिती माने व विशाखा शिराळकर या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार करण्यात आला.  यावेळी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्षा मा. सौ. वर्षाताई झाडबुके यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे आयोजन एसबीझेडएम, मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख श्रीमती अरुषा नंदीमठ...

म्युकर मायकोसिस बुरशींचा कर्दनकाळ ठरताहेत 'या' गोळ्या

सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांच्या उपचार संशोधनातील निष्कर्ष बार्शी : देश कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा जास्त संसर्गजन्य असलेल्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच पोस्ट कोविड रुग्णांमध्ये वाढत असलेल्या म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजारामुळे त्रस्त झालेला आहे. म्युकर मायकोसिस ची राज्यात ७००० पेक्षा वाढलेली रुग्णसंख्या,९% हून अधिक पोहोचलेला मृत्यूदर व खूप महागडी आणि जास्त कालावधीची उपचार पद्धती अशा भयग्रस्त वातावरणात एक अत्यन्त सकारात्मक बातमी समोर आली असून ती म्हणजे बार्शी सारख्या ग्रामीण भागातून, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासिका सौ अमृता शेटे मांडे यांनी म्युकर मायकोसिस च्या उपचार पद्धतीवर केलेल्या संशोधनाची. संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष उपचार पद्धतीला पर्याय उपलब्ध करून देणारे असल्याने म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा देऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील असा विश्वास डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे  म्युकर मायकोसिस हा रोग फक्त काळ्या बुरशी चा म्हणण्या पुरता राहिला नसून...

शिक्षकेतर संघटनेकडून 7 व्या वेतन आयोगासाठी आंदोलनाची हाक

  बार्शी / प्रतिनिधी – आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने शिक्षकेतरांना आश्‍वासित प्रगतीयोजनेचे 12 व 24 वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुर्नजिवीत करून पूर्वलक्षीप्रभावाने लागू करा व 7 व्या वेतन अयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीनशिक्षकेतरांना तातडीने द्या हि मुख्य मागणी घेवून राज्यातील महाविद्यालय कर्मचारी बांधवांनी लढ्याची हाक दिली आहे. 21 जून ते 26 जून 2021 छत्रपती शाहू महारांच्या जयंती पर्यंत मागणी सप्ताह . या काळात महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी हातात पोस्टरधरून फोटो काढून ते फोटो मा. मुख्यमंत्री,  मा. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री,  मा. उपमुख्यमंत्री,  मा. संचालक व सहसंचालक उच्च शिक्षण यांना मेल, फेबसबुकला, टिव्टर ला टॅग व मेसेज करतील  या अंदोलनास राज्यभरातील महाविद्यालय शिक्षकेत कर्मचारी उत्फुर्त प्रतिसाद देतील.  तसेच पूढे हे अंदोलनसातवा वेतन आयोग मिळेपर्यंत खिशाल काळ्या फिती लावणे,  लाक्षणीक उपोषण, निदर्शेने अंदोलन या मार्गाने पूढे जाईल.  शासनाने हे अंदोलन कर्मचारीवर्गावर लादले आहे.  उच्च शिक...

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा

                                           कृषी विभागाचा उपक्रम सोलापूर,दि.14: जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.                 राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर खरीप हंगाम 2021 मध्ये पीक स्पर्धो राबविण्यात येणार आहेत. खरीप हंगाम मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै 2021 पूर्वी तसेच इतर खरीप पिकासाठी भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफुल इत्यादी पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पूर्वी अर्ज सादर करावेत.                 राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून वि...

आयुक्त साहेब मयत समर्थ भास्कर च्या कुटुंबियांना न्याय द्या. डी.वाय.एफ.आय. व एस.एफ.आय. ची मागणी

  न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या तरुण व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने  पोलिसांनी घेतले ताब्यात सोलापूर दि.१४:- मयत समर्थ धोंडीबा भास्कर च्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटी योजनेतून ५० लाख रुपये आर्थिक मदत करा व समर्थ भास्कर च्या मृत्यूस कारणीभूत असणारे प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अशी रास्त, नागरी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने करण्यासाठी सोलापूर महानगर पालिका मा. आयुक्त कार्यालय येथे तरुण व विद्यार्थी शिष्टमंडळाद्वारे निवेदन घेऊन येताच पोलिसांनी बळाचा वापर करून निदर्शन करण्यास मज्जाव केला आणि अटक सत्र सुरु केले. यावेळी युवा आघाडीचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केले.  सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने सोलापूर महानगर पालिका मा. आयुक्त कार्यालय येथे स्मार्टसिटी च्या ढिसाळ कारभारामुळे दगावलेल्या मयत समर्थ भास्कर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावे या मागणीसाठ...

विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

  विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस मास कम्युनिकेशन विभागातर्फे ऑनलाईन स्नेहसंमेलन व ‘विद्यावार्ता’चे प्रकाशन सोलापूर/विशेष प्रतिनिधी - कोरोना महामारीच्या संकटात, लॉकडाऊन काळात  विद्यार्थ्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवून वेळेचा सदुपयोग केला हे कौतुकास्पद आहे असे  गौरवोद्गार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे आयोजित ऑनलाईन स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन व ‘विद्यावार्ता’ या प्रायोगिक वार्तापत्राच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, संयोजक व विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात मास कम्युनिकेशन , बी. व्होक तसेच अँकरिंग, डॉक्युमेंटरी मेकिंग आणि डिजिटल जर्नालिझम या  अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते . यात मास कम्युनिकेशन विभागांतील 45 विद्यार्थ्यांनी कथा, कविता ...

लॉकडाउन - सुख ,समाधान आणि निरपेक्ष प्रेम शिकवणारा काळ

                                     पाखरांची किलबिलाट, चिमण्यांची चिवचिवाट ऐकून जिथे दिवसाची सुरुवात होत असे. आज तिथे रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने जाग येत आहे.रात्री अपरात्री जेव्हा केव्हा हे आवाज कानावर पडले मनात भीतीचं काहूर माजत . कुठे, कुणाला काही झालं तरी नसेल ना या विचाराने मन भयभीत होऊन जातं होतं. पांढरे निळे पीपीई किट घालून आलेले . ज्यांचे ना डोळे दिसायचे ना चेहेरे असे काही लोक यायचे आणि घरातील व्यक्तींना घेऊन जायचे. काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण असायचा. कोरोना हा संसर्गजन्य आजार पाहता पाहता आपल्या घरा दारा पर्यंत येउन ठेपलाय याची तीव्र जाणीव होऊ लागली. दिवस रात्र रेडिओ, टीव्ही वरून प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या पाहुन मन अधिकच खचायचं.या अशा भयावह वातावरणात सकारात्मक राहणं जणू एक चॅलेंज होतं. पण या सोबतच अश्या ही काही घटना होत्या ; ज्या जगण्याचं बळ देवून जात. कोरोना ने माणसाला माणसापासून जरी दूर केलं असलं तरी , माणुसकी पासून दूर लोटू शकला नाही. या काळात या ना त्या प्रकारे लोकां...

अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य सर्वांना समानच

  कुठल्याही चैनलचा पत्रकार असो त्यांनी एखादी बातमी दिली ती फेक असली तर ते पत्रकार आणि त्या चॅनेल चे संपादक हे जबाबदार असतातच. भारतातील सर्व नागरिक सर्वजण चैनल बघण्यासाठी पैसे भरतात आणि भारतातील सर्व नागरिकांना अधिकार आहे की कुठलेही चैनल चुकीची आणि भडकण्यासाठी बातमी देत असतील तर त्यावर त्वरित कारवाई करावी. तसेच सर्व नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य सुद्धा आहे की या बातमी बाबत अभिव्यक्त व्हावे. पत्रकार आहे आणि चैनल एक नंबर आहे याचा अर्थ सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करणे नव्हे आणि सन्मान न ठेवणे हा होऊ शकत नाही. अनेक न्यूज च्या अशा अनेक बातम्या चुकीच्या येत आहेत त्यामध्ये अर्णव गोस्वामी यांची आहेच. तसेच अनेक चैनल जाहिराती आणि टीआरपी साठी बातम्या देत आहे हे उघड आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा अधिकार  संविधानाने दिलेला आहे कारण प्रत्येक नागरिक त्याचे पैसे त्यांना देतात आणि ते आपल्याला सेवा देतात आणि ते आपल्या सेवा योग्य देत नसतील तर प्रत्येक नागरिकाला त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त पत्रकारांना नसून प्रत्येक नागरिकाला सुद्धा प्रश्न विचारण्...

संत विचारातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद

    राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद दूरदर्शनवर कार्यक्रमाचे सादरीकरण करताना  लोककला ही आपली सांस्कृतीक परंपरा आहे . तीचे  जतन , संवर्धन आणि सादरीकरण पुढील पिढीला  होण गरजेचं आहे . त्यामुळे तरुण पिढीनं ही कला आत्मसात करून त्या माध्यमातून समाज जागृती करावी .विविध सामाजिक विषयावर या माध्यमातुन भाष्य करावं जेणेकरुन व्यसनमुक्ती  ,पर्यावरण, स्वच्छता , बेटी बचाओ, अशा सामाजिक विषयावर प्रबोधन होईल . स्वयं रोजगाराच्या अनेक योजना याची माहिती तरुणांना होऊन सक्षम भारतीय नागरिक तयार होतील आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होईल. प्रश्न- मागील  वर्षी पद्म पुरस्कारासाठी तुमचं नामांकन झाले होते ,त्याबदल आपली प्रतिक्रिया काय ? उत्तर- माझ्या प्रबोधन भारुड कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे . त्यात पद्म साठी कला क्षेत्रात नामांकन  झाले  होतं. नामांकन होणंच माझ्यासाठी खूप आनंददायी होत . तो एक अविस्मरणीय क्षण होता. प्रश्न-भारुडाची आवड कोठून व कशी निर्माण झाली ? उत्तर- मला लहानपणापासून कलेची आवड होती. शाळेत असताना कविता म्हणणे, देशभक्ती गीत म्हण...

बालकामगार विरोधी दिन - चिमुकल्या जिवांची मते

                  बालकामगार नकोच!! बालकामगार आपल्या भारताला भेडसावणारी मोठी समस्या आहे. बर्याच ठिकाणी लहान मुलं आपल्याला काम करताना दिसतात. मग ते हॉटेल असो वा चहाची टपरी असो किंवा मग लहान लहान कंपन्या असो तसेच घर काम करण्यामध्ये ही मुलांचा समावेश असतो. याचे मुख्य कारण आर्थिक परिस्थिती आहे, आई-वडीलांचे कमी उत्पन्न, मोठे कुटुंब तसेच बरीच कारणं ही आहेत. यामुळे लहान वयातच मुलांना काम करण्यास भाग पाडले जाते.  शहरी तसेच ग्रामीण भागात सुध्दा लहान मुलं काम करताना दिसतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे व खेळण्यांचे दिवस असतात त्या वयात मुल काम करताना दिसतात. अनेक सामाजिक संस्था कार्य करत आहेत पण या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणं गरजेचं आहे.  बालकामगार ही समस्या मुळापासून नष्ट करायची असल्यास मुलांना शाळेत पाठवणे तसेच आरोग्य व गरजेच्या वस्तू मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आपण हि सुजाण नागरिक म्हणून १८ वर्षांखालील मुलांना काम न करु देणे. तसेच कुठे लहान मुलं काम करताना आढळल्यास चौकशी करणे. त्यांना शक्य होईल ती मदत करणे जेणेकरून ते त्यां...

" लस घेतल्याने दंडाला वस्तू चिकटण्याचा प्रकार फसवा"

          जनतेनी फसव्या  चमत्कारावर विश्वास ठेवू नये. म.अंनिस च्या सत्यशोधन समितीचे आवाहन कोव्हिशील्ड लसीमुळे हातामध्ये चुंबकत्व आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबाबत म.अंनिसच्या सत्यशोधन समितीने खालील निष्कर्ष काढले आहेत. कोव्हिशिल्डची लस जेथे दंडात टोचली तेथून ती रक्ताद्वारे शरीरभर प्रसार पसरते. त्यामुळे त्या लसीचा परिणाम चुंबकत्व निर्माण करण्यात असेल तर सर्व शरीर चुंबक बनले पाहिजे. व्हिडिओ मध्ये फक्त दंडाच्या आसपास स्टेनलेस स्टील च्या हलक्या वस्तू चिकटलेल्या दिसतात.  अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणताही असाधारण चमत्काराचा दावा तपासण्या पूर्वी संबंधित व्यक्तीने अंगाच्या आसपास काही वस्तू तर लपवल्या नाहीत ना,  किंवा कोणत्याही स्वरूपाचा चिकटणार पदार्थ लावला नाही ना ? हे नियंत्रित परिस्थितीत  तपासायला हवे. तसेच हा प्रयोग चिकित्सक लोकांसमोर करायला हवा. जादूगार ज्याप्रमाणे चमत्कारातील खोटेपणा उघड करतो तशीच ही तपासणी आहे. संबंधित व्यक्तीने काखे मध्ये किंवा शरीराच्या सानिध्यात चुंबक ठेवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  कोव्ह...

पलूस येथील जीवे ठार मारण्याच्या प्रकरणातून आई-वडिलांसह दोन मुलांची जामिनावर मुक्तता

सांगली - ऊस तोडीचा राग मनात धरून महादेव आश्रुबा बडे यास मधुकर बापू सौदरमल , अमोल मधुकर सौदरमल  ,सचिन मधुकर सौदरमल  ,अरूणाबाई मधुकर सौदरमल  यांच्यासह अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी व उसाच्या कोयत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या बाबतचा प्रकरणातून वर नमूद चौघा संशयित आरोपींचा जामीन सांगली येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस पी पोळ साहेब यांनी मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की सदर महादेव आश्रुबा बडे यास वर नमूद संशयित आरोपींनी ऊसतोडीच्या कारणावरून दिनांक 28 फेब्रुवारी 2021  रोजी कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या आशपलूस येथील जीवे ठार मारण्याच्या प्रकरणातून आई-वडिलांसह दोन मुलांची जामिनावर मुक्ततायाची फिर्याद फिर्यादी अंगत रामकिसन घुले यांनी पलूस पोलीस स्टेशन येथे दिली होती. तदनंतर वर नमूद संशयित आरोपी मधुकर बापू सौदरमल , अमोल मधुकर सौदरमल  ,सचिन मधुकर सौदरमल  ,अरूणाबाई मधुकर सौदरमल यांना पोलिस येथील पोलिसांनी अटक केलेली होती. तदनंतर सदर आरोपींनी नियमित जामीन मिळवण्याचा मी सांगली येथील मे. सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर...