Skip to main content

घराची सजावट स्वस्त आणि मस्त



कितीही महागडे कपडे किंवा कोणतीही वस्तू सतत वापरून आपल्याला त्यांचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे मग आपण दिवसभर ज्या घरात राहतो त्या घरातले वातावरण बदल ही तेवढेच गरजेचं असत. आपल्या घराला नवीन लुक देने हा आपल्याला नेहमीच खर्चिक आणि वेळखाऊ काम असे वाटते पण ते तस नक्कीच नाही, आता आपण घराला कमी खर्चिक आणि कमी वेळात होणाऱ्या काही गृहासजावटीच्या टिपा देणार आहोत.

दरवर्षी घराची सजावट बदलणं नक्कीच गरजेच नाही पण आपण दार २ वर्षांनी तर हे काम करूच शकतो. यात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा भाग म्हणजे भिंती त्या आपण ५ ते ७ वर्षानंतर रंगरंगोटी साठी काढतो ते एक खर्चिक काम आहे हे काम आपण एकदाच कराव आपल्या घरातील भिंती ह्या शक्यतो पांढऱ्या ठेवण्याचा प्रयत्न असू द्या कारण पांढरा रंग घराला नेहमीच ताजा टवटवीत वातावरण देत असत. घरातील प्रकाश योजना वाढवण्यासाठी ही पांढऱ्या रंगाचा चांगला वापर होतो, तसेच कोणत्याही रंगासोबत जुळवून घेण्यासाठी सोप जाते.
आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या घरातील प्रकाश योजना आपल्या घरात भरपूर प्रकाश नसेल तर ते भकास वाटते त्यामुळे नेहमीच प्रकाश पाहिजे त्यासाठी चांगल्या प्रकारचे दिवे किंवा सुंदर घरी बनवलेलं कंदील सुद्धा आपण वापरू शकतो. दिवे हे आपल्या घरातील केंद्रबिंदू असतो.

त्यांनतर आपण वळूया फर्निचर कडे फर्निचर हे गर्जेपुरतेच असू द्यावे भरगच्च फर्निचर न ठेवता खोलीला शोभेल एवढंच ठेवावे. बैठकीची व्यवस्था करताना बैठकीच्या खाली सुंदर असा गालिचा अंथरावा जेणेकरून आपल्या फरशी ला नवीन लुक देण्यास मदत करतो.

आता आपण काही कलात्मक छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आपल्या खोलीला छान सुंदर रूप देऊ शकतो ते बघूया

खोलीच्या भिंतीवर आपण घरीच बनवलेल्या छायाचित्र रचना करून लावू शकतो तसेच आपण छोट्या रोपट्यांच वापर करून आपल्या खोलीला ताज आणि नैसर्गिक लुक देऊ शकतो, रोपटे लावल्याने आपण निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि घरात सकारात्मकता राहण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे आपण काही छोट्या छोट्या गोष्टींचा रंग बदलून आपल्या घराला नवीन लुक देऊ शकतो जस की उश्यांचे आच्छादन, खिडक्यांचे पडदे, खोलीतील एका भिंतीला वेगळा रंग. 

तसेच अश्याचं छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आपल्या खोलीचं रूप बदलू शकतो, जस की खोलीत एखादी पुस्तकांची कपाट बनवून भिंतीवर लावणे, खोलीत छान असा आरसा लावणे, एखादी सुंदर मूर्ती ठेवणे जेणेकरून आपल्याला ते बघायला कंटाळा न येता प्रसन्न च वाटेल. अश्या प्रकारे आपण खूपच कमी खर्चात आपल्या घराला छान आणि सुंदर लुक देऊ शकतो.

                                                                                                        लेखन -  कोयल कुणाल गरुड

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...