Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

कळंबवाडी (पा) येथे रक्तदान शिबिर संपन्न

  बार्शी/विशेष प्रतींनिधी - शौर्य चक्र प्राप्त मेजर कुणाल गोसावी यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त व कै. शिवाजी गोविंद जगदाळे यांच्या स्मरणार्थ -शहीद मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी बहुउद्देशीय संस्था कळंबवाडी  (पान )  तेजस्विनी फाउंडेशन व  आर्णवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 29 नोव्हेंबर 2020 रोजी भगवंत रक्तपेढी बार्शी येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर गोसावी यांनी केले . यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री अॅड. झालटे सर यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी सतीश चव्हाण सर ,रवी जगदाळे, श्री आर टी. माने सर व इतर मान्यवर उपस्थित होते.    सदर कार्यक्रमा प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अॅड. झालटेसाहेब यांनी शिवशंकर गोसावी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले याबद्दल समाधान व्यक्त  केले.    श्री धनंजय जगदाळे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवशंकर गोसावी यांनी तरुण वर्गामध्ये आदर्श निर्माण करण्याचे काम केले तरुणांची समाजाला गरज ...

मोदी साहेब शेतकऱ्यांबाबत आत्मचिंतन करा- कॉ.नरसय्या आडम मास्तर

सोलापूर/दत्ता चव्हाण - जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या विरोधात केंद्र सरकारने पारित केलेल्या विधेयक तातडीने रद्द करण्यासाठी जगण्या मरण्याची आणि अस्तित्वाची लढाई करत आहेत. त्या निष्पाप शेतकऱ्यावर पोलिसांची दंडेलशाही चालू आहे.सरकार हस्तक्षेप करत नाही.यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मचिंतन करावे अशी मार्मिक टीका आडम यांनी व्यक्त केली.  सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सांय 4 वाजता मा.निवासी उपजिल्हाधिकारी  अजित देशमुख यांना दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा व त्यांच्यावरील दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व सिटू चे महासचिव अँड एम.एच.शेख  यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात नगरसेविका कामिनी आडम, नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, व्यकंटेश कोंगारी,युसूफ शेख मेजर , म.हानिफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, अनिल वासम आदींचा समावेश होता. सदर निवेदनात असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो आणि स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणून मोदी 2004 साली सत्...

डॉ. संतोष पवार यांना जननायक पुरस्कार जाहीर

तुळजापूर /अक्षय वायकर -तुळजापूर  तालुक्यातील शिरगापूर येथील रहिवासी व नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. संतोष पांडुरंग पवार यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा कुशल नेतृत्व जननायक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. संतोष पवार हे इतिहासाचे थोरअभ्यासक आहेत. त्यांनी अक्कलकोट येथील ऐतिहासिक राजवाड्यावर पीएच.डी.केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. या सर्व कार्याची दखल घेत पुरस्कार जाहीर केल्याचे व्यवस्थापक अमोल सुपेकर यांनी सांगितले. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. पवार यांचे डॉ. लक्ष्मण थिटे, डॉ मल्लिनाथ बिराजदार, प्रसाद देशमुख, भैरवनाथ कानडे, शिवानंद खुने, लक्ष्मण नरे यांनी अभिनंदन केले आहे.

लग्नासाठी मुलगी देता का ? का शिधापत्रिका देता ?

प्रतींनिधी/जयकुमार सोनकांबळे - दिनांक 26 /11 /2020 रोजी पाटोदा जि. बीड तहसील कार्यालया समोर लग्ना साठी मुलगी देण्यात यावी, साठी आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले, गोरगरीब वंचित समूहातील लोकांची या तहसील कार्यालयाकडून फसवणूक केली जात आहे, असेच पाटोदा तालुक्यातील गरीब कुटुंबातील अमित आगे हा विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याला शैक्षणिक कामासाठी शीधापत्रिकेची गरज पडली आणि त्याने तहसील कार्यालयाकडे दिनांक 29 /9 /2020 रोजी शिधापत्रिका मिळण्यासाठी विनंती अर्ज केला परंतु संबंधित कार्यालयाने त्यांना पत्र देऊन सांगितले की एका व्यक्तीच्या नावाने शिधापत्रिका देण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे व एक व्यक्तीही कुटुंबाच्या व्याख्येत बसत नाही. असे लेखी पत्र देऊन त्यांना शिधापत्रिका देण्याचे नाकारून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला होता, त्यामुळे अमित आगे यांनी तहसील कार्यालयात पत्र देऊन एका व्यक्तीस शिधापत्रिका देता येत नाही असे कोणत्या कायद्यामध्ये आहे, अशी विचारणा केली असता तहसील कार्यालयाने या पत्रास कोणतेही उत्तर दिले नाही.म्हणून अमित आगे यांना एक ...

सरकार कामगार, शेतकरी विरोधी कायदे करत देश अदानी अंबानीच्या घशात घातला जात आहे- काॅम्रेड तानाजी ठोंबरे

 बार्शी /अब्दुल शेख   - अखिल भारतीय किसान सभा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, आॅल इंडिया स्टुडन्टस् फेडरेशन यांच्या संयुक्त वतिने देशव्यापी संपाचा भाग  म्हणून 26 नोव्हेंबर 2020 रोजी मा. तहसिलदार यांचे कार्यालयावर निदर्शने व धरणे अंदोलन करण्यात आले.  हे अंदोलन काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.  यावेळी वेगवेगळया संघटनांचे पाचशेच्या वर कार्यकर्ते सहभागी झाले होते.  घोषणा देत तहसिलदार कचेरीवर परिसर दणानुन सोडला होता. मोर्चात आयटक संलग्न ग्रामपंचया कर्मचारी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, बांधकाम कामगार, विज वर्कर्स फेडरेशन, डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघ, घरेलू कामगार संघटना, एआयबीए महाराष्‍ट्‍र बैक, युनियन बैक कर्मचारी, आॅल इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशन, इंटक गिरीणी कामगार संघटना, कन्फेग्रेशन फ्री ट्‍रेड युनियन आॅफ इंडिया या कामगार, शेतकरी, विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या.  यावेळी काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, देशात कामगार व शेतकरी विरोधी कामदे करत, देश आदानी व अंबानी यांच्या घशात घातला जात आहे, परंतू देषातील श्रमिक ह...

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान - अश्विनी महांगडे

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना पोलिसांचा सन्मान करण्याचे पत्र देताना रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे, संतोष पवार, परवेझ लाड आदि... रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार सातारा /विशेष प्रतिनिधी -कोरोनापासून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कार्य करणारे पोलीस दल म्हणून ओळखले जात आहे. या पोलीस दलात दर महिना उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस बंधू-भगिनींना "पोलिसमॅन ऑफ द मंथ" हा पुरस्कार देऊन पोलीस विभागाच्या वतीने गौरविले जाते. त्याच पोलीस जवानांचा सन्मान रयतेचे स्वराज प्रतिष्ठानला करण्याची इच्छा आहे तरी त्यास परवानगी मागणारे पत्र प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्षा- अश्विनी महांगडे यांनी सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना भेटून दिले आहे. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली. यावेळी संतोष पवार, परवेझ लाड यांनी प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कामाची त्यांना माहिती द...

मळेगाव येथे 26/11 हल्ल्यातील शहिदांना अभिवादन

बार्शी/शुभम काशीद- मळेगाव ता.बार्शी येथे 26/11 मध्ये शहिद झालेल्या वीरांना श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ मळेगाव यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले,देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुबंई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यानी हल्ला केला या हल्ल्यामध्ये आपल्या अनेक वीर सुपुत्राना वीर मरण आले,या हल्यामुळे भारत देश हादरून गेला,तरी देखील आपले मुबंई पोलीस त्या दहशतवाद्या सोबत 3 दिवस झुंज देऊन लढाई आपण जिंकली,यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता तुकाराम ओबाळे साहेब यांनी एका दहशतवाद्यास जिवंत पकडले,परंतु त्या आतंकवाद्यावे ओबाळे साहेबाना गोळ्या घातल्या व त्यांना वीर मरण आले,या सर्व वीर सुपुत्राचे स्मरण रहावे म्हणून विरांच्या प्रतिमेचे पूजन माजी सैनिक प्रल्हाद दळवी यांच्या शुभहस्ते करून अभिवादन करण्यात आले,यावेळी माजी ग्रा.प.सदस्य नितीन पवार व अशोक माळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,माजी ग्रा.प.सदस्य नितीन पवार,सावता परिषदेचे बार्शी तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी,धनगर समाज सेवा संस्था बार्शी तालुका अध्यक्ष सागर शेळके,ग्रामपंचायत क्लार्क सुरेश का...

ऩॅशनल करियर सर्विस फाॅर दिव्यांग मध्ये भरती

ऩॅशनल करियर सर्विस फाॅर दिव्यांग मध्ये भरती पद -कार्यशाळा परिचर  एकूण पदे -१ एस सी  शिक्षण - एस एस सी किंवा समतुल्य आय टी आय पास , वयोमर्यादा - १८-२५ वर्षे  अधिक माहिती साठी जाहिरात पहावी.- येथे क्लिक करा  

धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

  मुंबई : मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब  रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य करून, गरीब  रूग्णांची सेवा करावी अशा सूचना विधी व न्याय विभाग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या. राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे 10 टक्के गरीब  रूग्णांना मोफत उपचार देण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी आर.एन. लढ्ढा, धर्मादाय आयुक्त आर.एन.जोशी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवणे आदींसह अधिकारी आणि विविध धर्मादाय रूग्णालयांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री...

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी केल्यानंतर प्रवेश

  तुळजापूर/अक्षय वायकर- : विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला डॉ. मोहन बाबरे व उपप्राचार्य रमेश नन्नवरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. कला विज्ञान वाणिज्य आणि एमसीवीसी या शाखेच्या अकरावी आणि बारावी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सात महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर महाविद्यालयात प्रवेश केला त्यांना प्राचार्य डॉ. मोहन बाबरे व उपप्राचार्य रमेश नन्नवरे यांनी कोरोना संसर्गाची अनुषंगाने तपासणी व आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी प्राध्यापक आर.पी. गायकवाड, प्रा. एस. एस. भोसले, प्रा. सी. के. कुरेशी, प्रा. अमर भरगंडे, प्रा. अमर बोरगावकर, प्रा. सी. डी. काठेवाड, प्रा. एस. आर. मुसळे, प्रा. एस .पी. कठारे, प्रा. सी. टी. तांबे, प्रा. ए. ए. जोशी, प्रा. आर. एम. इंगळे, प्रा. ए. जे. माने, प्रा. रामलिंग थोरात, प्रा जी व्ही पाटील, प्रा. रत्नाकर उपासे, प्रा. दत्तात्रय देवगुंडे, अधीक्षक धनंजय पाटील यांच्यासह इतर कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या सात महिन्याच्या काळामध्ये घरांमध्य...

शकिल मुलाणी यांची भाजपच्या बार्शी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी/अब्दुल शेख -:बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत व जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते शकिल मुलाणी यांची भाजपच्या बार्शी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुलाणी यांची पक्षावर असलेली निष्ठा आणि काम करण्याची चिकाटी यामुळेच त्यांची निवड केली असल्याचे सांगितले.तसेच जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनीही मुलाणी यांनी भाजप पक्षाचे सर्वसमावेशक धोरण अल्पसंख्यांक समाजामध्ये राबवून पक्षाला बळकटी देण्याचे काम करावे असे सांगितले.शकिल मुलाणी यांनी समाजसेवेबरोबर आ.राजेंद्र राऊत यांचे निस्वार्थी कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केली आहे.त्यांनी २०१२ साली मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष तर २०१५ साली मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे.त्याबरोबरच उडाण फाऊंडेशन या सामाजिक संघटनेतही ते कार्याध्यक्ष म्हणून काम पहात आहेत.त्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात भाग घेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना १ महिन्यांचे मोफत पास दिल्याचेही मुलाणी यांनी य...

राज्यातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहीम

प्रतिनिधी/जयकुमार सोनकांबळे -यावर्षीच्या एप्रिल ते डिसेंबर या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणुका कोरोनामुळे निवडणूका होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली.यामुळे गावातील कार्यकर्ते नाराज झालेले आहेत.तेंव्हापासूनच लवकर निवडणूका व्हाव्यात,अशी अपेक्षा इच्छुकाकडून व्यक्त केली जात होती.आता राज्य निवडणूक आयोगाने यासाठीची प्रक्रीय सुरू केली आहे.1 डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.त्यावर 7 डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्याय येणार आहेत.त्यानंतर 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केले जाईल.          विधानसभा मतदारसंघाच्या 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील.त्या आधारावर तयार करण्यात येणार्या ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधीत ठिकाणी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.या प्रारूप मतदार याद्यांवर तेंव्हापासून 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नविन नावांचा समावेश करणे, नाव...

हुलजंती येथे खुले वाचनालय सुरु

प्रतींनिधी/अमीर आत्तार -हुलजंती व परिसरातील वाचकांसाठी खुशखबर आपणास सर्वांसाठी सन फाउंडेशन . व शेतकरी संघर्ष संघटना यांच्या वतीने हुलजंती गावामध्ये  प्रथमच मोफत सर्व वृत्तपत्रे वाचण्यास उपलब्ध आम्ही करत आहोत.अशी माहिती सन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमीर भाई आतार यांनी दिली.  शांत वातावरण बैठक व्यवस्थाही केलेली आहे याची माहिती सन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमीर भाई आतार यांनी दिली .हजरत टिपू सुलतान जयंती उत्सव यांच्यातर्फे नागरिकांना बैठकीसाठी बाकड्याची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी थोड्याच दिवसात यूपीएससी एमपीएससी ची पुस्तक उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सन फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात येत आहे. 

अस्वस्थ करणाऱ्या वर्षाच्या समाप्तीकडे जाताना......

  सकाळी फेरफटका मारताना एक विशीतला तरुण खूप चिंतेत बसलेला दिसला. दोनदा फिरून आल्यावरही तो तिथेच आणि त्याच चिंताक्रांत अवस्थेत दिसून आला. तेव्हा त्याच्याशी बोलावे या हेतूने मी त्याच्याकडे वळलो आणि त्याच्या शेजारी जाऊन बसलो. तो खूप वेळ शांतच होता. मीच सुरुवात केली. विचारपूस केली. तेव्हा अपेक्षेप्रमाणे कोरोनामुळेच चिंतीत होता. त्याच्याशी खूप बोललो. खूप मनमोकळ्यापणे गप्पा मारल्या. थोडीशी चिंता मिटल्यासारखी वाटली त्याची. पण त्याने विचारलेल्या एका प्रश्नाचे मात्र मला खूप अप्रूप वाटले, तो म्हणाला, "भाई, हे जग खरंच पुन्हा सुरू होईल का?" मी अक्षरशः गोंधळलोच आणि हादरलोसुद्धा त्याच्या या प्रश्नावर. तो तरुण किती खोलवर विचार करत होता! यावरून आजची संवेदनशील तरुणाई कसा विचार करतेय याचा पुसटसा पण अत्यंत महत्वाचा प्रवाह समोर आला.                    २०२० हा दशकातीलच नव्हे तर शतकातील कायम स्मरणात राहणारा वर्ष असणार यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. या वर्षात सगळ्या जगाने असंख्य घडामोडी अनुभवल्या. त्यात सर्वात प्रभावी आणि कायम स्मरणात राहील तो म्हण...

26 नोव्हेंबर रोजी बार्शीत कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांचा संयुक्त भव्य निर्धार मोर्चा

बार्शी/अब्दुल शेख - बार्शी  तालुका कामगार संयुक्त कृती समिती व अखिल भारतीय किसान सभा, आयटक, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या पदाधिकाऱ्यांची  संयुक्त बैठक दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी आयटक कामगार केंद्र येथे कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशभर कामगार व शेतकरी, विद्यार्थी यांच्या विरोधात असणारे शासनाचे धोरण हाणून पाडण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2020 वार शुक्रवार रोजी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून भव्य निर्धार मोर्चा बार्शी मध्ये सनदशीर लोकशाही मार्गाने तसेच कोवीड महामारी चे सर्व नियम पाळत व दक्षता घेऊन काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आली.  अधिक माहिती अशी की कामगारांनी लढून मिळवलेले कायदे केंद्र सरकार हाणून पाडत आहे, तसेच शेतकऱ्यांना कंपनीकरण्याच्या खाईत ढकलून देत आहे त्याचप्रमाणे केंद्रीय संयुक्त कामगार कृती समितीने केलेल्या मागण्या सोबतच वाढत्या वीज बिलाचा प्रश्न, शेतीचे नुकसान भरपाई प्रश्न,  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, घरेलू कामगार बोर्ड प्रश्न, बांधकाम कामगारांच्या मागण्या, महाविद्यालयीन शिक्षकेतरांच्या मागण्यात, लॉक डा...

मेल माेटर सर्व्हिस मध्ये नोकर भरती

 मेल माेटर सर्व्हिस मध्ये नोकर भरती एकूण रिक्त जागा - 12 मोटर वाहन मेकॅनिक - 05 टिनस्मिथ - 03 पेंटर -  02 टायरमन - 01 लोहार - 01 थेट भरतीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता:साठी पुढील लिंक वर क्लिक करा- https://bit.ly/3lQ8b0J थेट भरतीसाठी वयोमर्यादा: ०१.०7.२०२० रोजी  १८ ते ३० वर्षे

शिक्षक आमदार पद हे शोभेचे किंवा मिरवण्याचे नसून ते जबाबदारीचे पद आहे - प्रा. डॉ.सुभाष जाधव

  आज  शिक्षणव्यवस्थेत अनेक प्रश्न आपल्या सर्वांना भेडसावत आहेत . नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातुन शिक्षक विद्यार्थी-पालक शिक्षकेतर कर्मचारी व गावोगावी समाजाच्या तळागाळात निष्ठेने व सेवावृतीने काम करणार्‍या संस्थासमोर अनेक समस्या निर्माण होणार आहेत. विशेषत: दलित आदिवासी, ओबीसी, बहुजन आणि  गरीब मुलामुलींच्या ,विशेषत: मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अनेक जटिल अडथळे निर्माण होणार आहेत . केंद्र सरकार शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र खाजगीकरण, कंपनीकरण व बाजरीकरणाच्या दावणीला बांधत असल्याने शिक्षणाच्या संधी आक्रसत जाणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवा-शाश्वती; वेतनश्रेणी व सामाजिक सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. शासन शिक्षण संस्थेचा आधार काढून घेत त्यांना अस्थिरतेच्या  गर्तेत ढकलत आहे. सरकारचा शिक्षणाबद्दलचा आणी शिक्षणावरील खर्चा संबंधी बदलेला दृष्टीकोण हे यामागील खरे कारण आहे .आजच्या या आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांचा प्रतिनिधी विचारपूर्वक निवडण्याची गरज असल्याने आपण मला विधानपरिषदेवर पाठवून आपले प्रश्न मांडण्याची व सोडवण्याची एक संधी द्यावी-प्रा....

भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या जागा

भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) पात्रता : जड वाहनाचा परवाना (लायन्सस) पदाचे नाव :- टिनस्मिथ (३ जागा) शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट पदाचे नाव :- पेंटर (२ जागा) शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट पदाचे नाव :- टायरमन (१ जागा) शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट पदाचे नाव :- ब्लॅकस्मिथ (१ जागा) शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट वयोमर्यादा :- ३० वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत) आवेदन पाठविण्याचा पत्ता :- THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018 आवेदनाची अंतिम तारीख :- २१ डिसेंबर २०२० अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3nGw4s6

हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज भरुन देण्याची मोफत सेवा

  मुंबई: हज 2021 च्या यात्रेसाठी केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2020 असल्याची माहिती महाराष्ट्र हज समितीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी दिली आहे.   यावर्षी हज यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्या विदर्भातील यात्रेकरुंना मोफत ऑनलाईन अर्ज भरुन देण्याची सुविधा नागपूर हज हाऊस, एम्प्रेस मिल कंपाऊंड, जुना जेल खाना रोड, नागपूर येथे करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी येथे येऊन अर्ज भरावेत, असेही महाराष्ट्र राज्य हज समितीचे श्री.काझी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पत्रकार आरिफ शेख गुन्हा दाखल प्रकरणी चौकशी करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी

सोलापूर/अमीर आत्तार  -साप्ताहिक शिवराज्य वृत्तपत्र चे उपसंपादक व वेगवेगळ्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून पत्रकारिता करणारे पत्रकार आरिफ शेख यांच्यावर वाहन खरेदी विक्री या व्यवसायमधून आर्थिक फसवणूक केली म्हूणन दिनांक 9/11/2020 रोजी  420/34 प्रमाणे  फौंजदार चावडी पोलीस ठाण्यात काही इसमांनी खोटा गुन्हा दाखल केला असून या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करण्यात येऊन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हूणन पत्रकार सुरक्षा समितीने पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे पत्रकार आरिफ शेख सारख्या प्रामाणिक पत्रकारांवर जर फसवणूक सारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित केला असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करून आरिफ शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची चौकशी होऊन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली असून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा  यशवंत पवार  दिला आहे.  पत्रकार आरिफ शेख गुन्हा दाखल प्रकरणी  पोलीस उपायुक्त  यांनी दिले...

उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागा

उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागा पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (७ जागा) शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, ३ वर्षांचा अनुभव किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (विद्युत) (५ जागा) शैक्षणिक पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा समतुल्य, ३ वर्षांचा अनुभव किंवा विद्युत अभियांत्रिकी पदवी मुलाखतीचा दिनांक : दि. २५ नोव्हेंबर २०२० अधिक माहितीसाठी : www.umc.gov.in  

शिक्षक मतदार संघाततून प्रा.सुभाष जाधव तर पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड,श्रीमंत कोकाटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा.- कॉ.नरसय्या आडम मास्तर

  सोलापूर /दत्ता चव्हाण   -  महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होत आहे. यासाठी शिक्षक मतदारसंघातून प्रा.सुभाष जाधव  यांना प्रथम पसंदी चे तर पदवीधर मतदारसंघातून मा.अरुण लाड प्रथम पसंदी तर श्रीमंत कोकाटे यांना दुसऱ्या पसंदीचे मते देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन  माकप चे राज्य सचिव कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केले. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपच्या केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारची आणि जनतेची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न चालू ठवले आहेत. भाजपला सत्ता स्थापन करता न आल्याने तो पक्ष महाराष्ट्राशी सूडबुद्धीने वागत आहे.  देशभरातील फॅसिस्ट स्वरूपाचे हल्ले करून नागरिकांची जीविका, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार त्या पक्षाचे केंद्र सरकार पायदळी तुडवत आहे. बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा  निवडणुकीत भाजपने अत्यंत विखारी असा धर्मांध प्रचार करून जनतेत जात-धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा प...

पंढरपूर येथे दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन!

पंढरपूर : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दैनंदिन सुरु राहिले. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खूली करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंड, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे.  मंदिरात व नामदेव पायरी ...

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘राष्ट्रीय माध्यम पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :  मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया ॲवॉर्ड) देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रसारमाध्यमांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे दि. 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.   विविध माध्यमातून मतदार जनजागृती करणाऱ्या माध्यम संस्थांसाठी हे पुस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये वर्तमानपत्र (प्रिंट मीडिया), इलेक्ट्रॉनिक (दूरचित्रवाहिनी) मीडिया, इलेक्ट्रॉनिक (रेडिओ) मीडिया व ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया अशा चार विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माध्यमांद्वारे सुलभ मतदान, मतदान प्रक्रियेसंदर्भात जागृती, मतदानाचे महत्त्व आदी विषयांवर विविध माध्यमातून जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या माध्यमांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.   भारत निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पुरस्कारांसाठी माध्यम संस्थांची निकषांच्या आधारे शिफारस करण्याचे सूचित केले आहे. त्...

यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य – मंत्री ॲड.के.सी. पाडवी

  मुंबई/प्रतींनिधी - यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास मंत्री श्री.पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून  यूपीएससीच्या पूर्व परीक्षा पास  होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या  २५ उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच मुख्य परीक्षा पास  होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५ अशा अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात...

एसबीआय प्रोबेशनरी अधिकारी २००० पदे

  एसबीआय प्रोबेशनरी अधिकारी २००० पदे पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२० रोजी २१ ते ३० वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमदेवारांना सवलत) आवेदनाची अंतिम तारीख : ०४ डिसेंबर २०२० अधिक माहितीसाठी :  https://bit.ly/3nqA27U ऑनलाईन अर्जाकरिता :  https://ibpsonline.ibps.in/sbiposamar20/

आदिवासी पाड्यातील महिलांसोबत दिवाळी साजरी

विशेष प्रतींनिधी/ठाणे - आदिवासी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रविवार दि.15/11/2020 रोजी ठाणे जिल्ह्यातील आसनगाव पाडा येथे आदिवासी समन्वय समितीतर्फे आदिवासी महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महिलांना रोजगारविषयक माहिती देऊन विविध प्रशिक्षणांची माहिती देण्यात आली.यावेळी भूमिहीन, विधवा व निराधार आदिवासी महिलांना दिवाळीचा फराळ,साडी आणि आरोग्यहितासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आदिवासी समन्वय समितीचे राज्य संपर्क प्रमुख श्री.मधुकर हरी गभाले आणि त्यांच्या सहका-यांनी विशेष परिश्रम घेतले.ज्योती दिपक ठाकरेअध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा),महिला आर्थिक विकास महा मंडळ, उद्योजिका आणि वुमन पाॅवर असोसिएशनच्या अध्यक्ष श्रीमती अर्चना शर्मा,शिवसेनेच्या जि.संघटक आणि नवचेतना महिला महासंघाच्या अध्यक्ष रश्मीताई निमसे,WTCचे मानद सल्लागार श्री.जयेश खाडे,IIT मुंबईचे श्री.मलय घोष आणि MCED ठाणेचे प्रतिनिधी मनोज भोईर,वासिंद शहर आध्यक्ष आनंद गायकवाड,आजय बांगर,पारधी सर यांच्यासोबतच राष्ट्रवादी काॅग्रेसचे मुंबईचे पदाधिकारी व उद्योजक श्री.किशनराव गायकवाड उप...

हुलजंती येथील श्री महालिंगराया यात्रा रद्द पूर्वापार चालत आलेली परंपरा खंडित

   प्रतिनिधी/अमीर आत्तार  : सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिवाळी पाडव्याला हुलजंती येथे श्री महालिंगराया देवस्थनच्या वतीने भरवण्यात येणारी यात्रा व पालखी भेटीचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती देवस्थान कमिटी व श्री महालिंगराया यांचे वंशज श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांच्या वतीने देण्यात आली आहे.  प्रत्येक वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अमावस्येच्या रात्री श्री शंकर-पार्वती श्री महालिंगराया यांचा सन्मान म्हणून प्रत्यक्ष श्री महालिंगराया मंदिरास फेटा बांधून जातात यास कर्नाटकी भाषेत मुंडास या नावाने देखील ओळखले जाते. तसेच हे एक जागृत देवस्थान असून  महाराष्ट्रा, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथे दक्षिण काशी म्हणून हुलजंती गावाला संबोधले जाते. या राज्यांमधून लाखो भाविकभक्त यात्रेस असतात. गेल्या शेकडो वर्षापासून श्री बिरोबा, श्री महालिंगराया, अन्य सात पालख्यांचे भेटीचा सोहळा अमावस्येच्या पूर्व संध्येला मंदिरास 'मुंडास' झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 च्या सुमारास पालखी भेटीचा सोहळा संपन्न होत असतो. परंतु प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना महामारी  असल्य...

“जागातीक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई- मॅरोथॉनचे आयोजन

                    ई- मॅरोथॉन..... आरोग्यदायी, स्वच्छ आणि निरोगी वातावरणासाठी प्रतिंनिधी /उस्मानाबाद -१९ नोव्हें.  “जागातीक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई- मॅरोथॉनचे आयोजन करण्यात आले असून याचा  हेतू देशातील नागरिकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत  जागरुकता निर्माण करणे हा आहे.  ई- मॅरोथॉनमध्ये  सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात, त्यात ४२ किमी फुल मॅरोथॉन आणि २१ किमी हाफ मॅरोथॉन चा समावेश आहे, हे ई- मॅरोथॉन  १५ नोव्हे ते १९ नोव्हें २०२० या कालावधीत पूर्ण करू शकता. यात सहभागी होण्यासाठी विशिष्ठ ठिकाणांची निवड करून सहभाग्यांनी एकत्र येण्याची किंवा गर्दीसारखी  परिस्थिती निर्माण करण्याची गरज नसणार आहे. तसेच सहभागींनी प्रशासकीय नियम पाळून या ई- मॅरोथॉनमध्ये सुरक्षित अशा ठिकाणांचीआणि योग्य वाटेल त्या वेळेची निवड करून आपली धाव पूर्ण करू शकतो. १ लाखापेक्षा अधिक व्यक्ती देशाच्या कांनाकोपर्‍यातून भागातून ई- मॅरोथॉन सहभागी होतील. त्याचप्रमाणे विदेशांतून सुद्धा ई- मॅरोथॉनमध्ये लोक सहभागी होत आहेत.  ...

कॅनरा बॅंकेच्या गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेड करणार बोंबाबोंब आंदोलन

                                                                                                        शेतकरी सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात                          पंढरपूर/रवीशंकर जमदाडे  - खेडभाळवणी येथील काही शेतकरी यांनी मे.2018 मध्ये दिड लाखाच्या आत कॅनरा बॅंक   पंढरपूर यांचे पिक कर्ज घेतलं होते.सदर शेतकरी हे भिमा नदी  पुरग्रस्त भागात क्षेत्रात येतात. परंतु दि.30 मार्च 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत सदर शेतकरी थकीत कर्जदार असल्याने त्यांना महात्मा जोतिराव फुले  कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला नाही.कॅनरा बॅंकेचे मनमानी व गहाळ कारभारामुळे त्यांनी या शेतकर्यांची कर्ज खात्याची माहिती   शासनास सादर केली नाही. ह्या सगळ्य...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद डी.लिट पदवी प्रदान

  मुंबई : सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.   राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली. डी. लिट. ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्यता नाही असे आपण मानतो, तरी देखील आयोजकांच्या प्रेमाखातर आपण ही पदवी विनम्रपणे स्वीकारीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आपण स्वत:ला ‘राज्य सेवक’ समजतो व त्याच भावनेने काम करीत आहे असे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृती चीर पुरातन व नित्यनुतन आहे. नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृतीसह, संस्कार व मातृभाषेतील शिक्षणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. प्राथमिक शिक्षण शक्यतोवर मातृभाषेतून दिले जावे यावर नव्या शैक्षणिक धोरणाचा भर आहे असे त्यांनी सांगितले.   महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त करताना चारित्र्यसंपन्न युवक घडविण्यासाठी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार दिले पाहिजे असे राज्य...

पत्रकार सुरक्षा समितीची बैठक ,आंदोलन त्रीव्र करण्याचा निर्धार

  सोलापूरअमीर/आत्ता र  -पत्रकार सुरक्षा समितीची मासिक बैठक घेण्यात आली सदर बैठीकीत ,पत्रकार संरक्षण कायदा.जेष्ठ पत्रकार समान पेन्शन,पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी,पक्की घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना व विमा योजना,राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ला शासकीय जाहिराती,इत्यादी विषयासह  कोरोना काळात अनेक वृत्तपत्र बंद असताना राज्यातील अनेक युट्युब चॅनल च्या संपादक आणि पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून जीव धोक्यात घालून राज्य सरकार महसूल प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन च्या बातम्या केलेल्या आहेत अश्या युट्युब  चॅनल ला  मुख्यमंत्री महोदयांनी शासकीय मान्यता व जाहिराती द्याव्यात अशी मागणी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे  त्याच बरोबर कोरोना काळात वार्तांकन करताना ज्या पत्रकारांचे निधन झाले आहे त्यांच्या कुटूंबाला पन्नास लाख रुपये तात्काळ मदत करावी अशी मागणी देखील प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे  यावेळी शहर अध्यक्ष अरुण...