Skip to main content

अॅड. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील , नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच : आनंद चंदनशिवे




विठ्ठल मंदिर उघडण्यावर वंचित,विश्र्व वारकरी सेना ठाम ; वंचितला प्रतिसाद पाहून भाजपाचाही घंटानाद आंदोलन फार्स


पंढरपूर/नामदेव लकडे- लाॅकडाउन मुळे मागिल पाच महिन्यांपासून बंद असणारे विठ्ठलाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे यासाठी मंदिर प्रवेश करणारच यावर वंचित बहुजन आघाडी व विश्र्व वारकरी सेना ठाम असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हाणून पाडीत आंदोलन यशस्वी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.ते पंढरपूर येथे पञकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने राज्यभर घंटानाद आंदोलन केले. यावर वंचित बहुजन आघाडीने टीका केलीय. भाजपचे ‘दार उघड’ आंदोलन मंदिरासाठी नाही सत्तेसाठी आहे. सत्तेचे दार उघडण्यासाठी हे सारे खटाटोप आहेत. प्रकाश आंबेडकर यांना राज्यभरातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे भाजपने आंदोलनाचा फार्स केला आहे, असेही चंदनशिवे म्हणाले.

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर खुले करण्यासंदर्भात वंचित बहूजन आघाडी व विश्र्व वारकरी सेनाच्या वतीने सोमवारी होणार्या आंदोलनाची माहितीही दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील व नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील, असे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. वंचितला राज्यातील वारकरी संप्रदायाचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून आज भाजप कडून घंटानाद आंदोलन केले जात असून त्यांचे आंदोलन केवळ राजकारणासाठी असल्याची खरमरीत टीका चंदनशिवे यांनी केली.

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारकऱ्यांसमवेत मंदिरात प्रवेश करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. ते येत्या सोमवारी पंढरपुरात लाखो वारक-यांच्यासमवेत मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांची दारे मात्र अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्र्यांनी गाजर दाखवल्याचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर चर्चेचे केवळ गाजर दाखवले मात्र कोणतीही चर्चा घडवून आणली नाही, असाही आनंद चंदनशिवे सांगितले. वारकरी परंपरांचे पालन करीत मंदिर प्रवेश होणार असून राज्यातल्या २०० पेक्षा जास्त संघटनांनी वंचितच्या होणा-या आंदोलनास पाठिंबा दिल्याचा दावाही चंदनशिवे यांनी केला.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...