Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

सोलापूर विदयापीठातील पत्रकारिता विभागातर्फे ‘जागर पत्रकारितेचा’ माध्यम सप्ताहाचे आयोजन

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील  सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे  ‘ जागर पत्रकारितेचा’ दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त माध्यम सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे. याचा समारोप कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी दिली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना मिळावे या उद्देशाने दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने अशा  माध्यम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात व्याख्याने, कार्यशाळा यांचा समावेश असतो. यावर्षीही 1 जानेवारी  ते 6 जानेवारी 2021  या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने हा माध्यम सप्ताह साजरा होणार आहे. यात मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. 1 जानेवारी रोजी ‘ऑनलाईन पत्रकारिता’ या विषयावर मयूर गलांडे ( लोकमत, मुंबई), ‘पर्यावरण पत्रकारिता’ या विषयावर तरुण भारत संवाद चे संपादक रजनीश जोशी  ( सोलापूर) यांची व्याख्याने होणार आहेत. 2 जानेवारी रोजी ‘संपादकीय पानाचे महत्व’ विषयावर तरुण भारत सोलापूरचे ...

मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल.मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश.

तालुक्यातील 23 ग्रामपंचायत साठी शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल मंगळवेढा/अमीर आत्तार  -मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या 223 जागेसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान तेवीस ग्रामपंचायत पैकी मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले असून ही ग्रामपंचायत सलग सहा वेळा बिनविरोध काढण्यात ग्रामस्थांनी परंपरा कायम ठेवली आहे. तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून बुधवार दिनांक 30 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपत असल्याने तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते सुरुवातीला उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते मात्र वाढती उमेदवारांची संख्या व नेटवर्क प्रॉब्लेम मुळे  निवडणूक आयोगाने आपला उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी दिल्याने शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत रांगेत असलेल्या उमेदवाराचे अर्ज करण्यात येत असल्याचे चित्र होते. ग्रामपंचायत ग मी आहे उमेदार ही संख्या पुढीलप्रमाणे हुलजंती 71. मरवडे 74. बोराळे 74 . भोसे 60. कचरेवाडी...

हुलजंती ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठी 71 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल , प्रभाग तीन बिनविरोध..!

मंगळवेढा/अमीर आत्तार - :तालुक्यातील हुलजंती ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी आज शेवटच्या दिवशी एकूण 71 अर्ज दाखल झाले आहे. यामुळे निवडणूतिच्या रणधुमाळीला उधाण आले असून अत्ता पासूनच तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी या करिता गावातील काही प्रतिष्टीत मंडळींचा खटाटोप चालू होता,  अखेर त्या प्रयत्नाला अपयश आले आहे. परंतु हुलजंती ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन (3) ही बिनविरोध करण्यात माजी सरपंच गोविंद भोरकडे यांना यश आले. सत्ताधारी गटाला आव्हान देण्यासाठी सर्व युवावर्गाच्या पुढाकारातून तिसरी आघाडी स्थापन करण्याचा नेटाने प्रयत्न सुरु होता. जागावाटपाच्या फाॕर्म्युल्याची देखील वारंवार चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत होती. परंतु या वेगवेगळ्या असलेल्या आघाडीमध्ये असलेल्या प्रमुख तिन्ही गटांनी स्वतंत्र आस्तित्व सिद्ध करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात परस्परांवर कुरघोड्या करुन शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे प्रभाग तीन (3) सोडून इतर सर्व प्रभागात दुरंगी अथवा तिरंगी लढती होणार की काही प्रभागात बहुरंगी लढती होणार याचा अंतिम निकाल ...

शेत रस्त्याचा विषय निकाली काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी

शेत रस्त्याचा विषय निकाली काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी -शिवार फाऊंडेशनचे आवाहन उस्मानाबाद :- शेत रस्त्याच्या अडचणी असतील तर शिवार हेल्पलाइन संपर्क करा, या अवाहनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना योग्य ती माहिती सांगितली जात आहे. पण अर्ज करताना आवश्यक ते कागदपत्र व विहित नमुन्यात अर्ज करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, त्यामुळे प्रकरण निकाली निघण्यात विलंब होऊ शकतो.  अर्ज करताना शेतकऱ्यांनी अर्जदार म्हणून वैयक्तिक नाव व सामूहिक प्रश्न असेल तर इतर शेतकऱ्यांची नावे ही टाकावीत,तसेच मोबाईल नंबर व स्वाक्षरी नमूद कराव्यात. विषय मध्ये योग्य तो गट नंबर / सर्वे नंबर नमूद करून जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या नावे पत्रामध्ये" अतिक्रमण मुक्त शेतरस्ते अभियान" याचाही उल्लेख करावा. सोबत गाव नकाशा व  संबंधित शेत रस्त्याचा ७/१२ जोडावा. गाव नकाशा घेण्यासाठी संबधित तलाठी/ग्रामसेवक यांना संपर्क साधावा. पूर्वी अर्ज केलेला असल्यास त्याची पोहोच पावती जोडावी. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्यात तहसील कार्यालय येथे जमा करावा. अर्ज करताना शे...

पीक कर्जासाठी करा बँकेशी संपर्क शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

सोलापूर-: जिल्हास्तरीय बँक प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये बँकांनी पीक कर्जाचा लक्षांक पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या असून शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रासह संबंधित बँक शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्याला 2020-21 या रब्बी हंगामातील पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांना 2256.59 कोटी रूपये, जिल्हा मध्यवर्ती बँक 280.71 कोटी रूपये आणि ग्रामीण बँकेला 75.19 कोटी रूपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. लक्षांक पूर्ण करण्याबाबत बँकांनी तत्काळ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या आहेत. पीक कर्ज उपलब्ध होण्याबाबत अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार, सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही श्री. भोळे यांनी केले आहे. 

चला गांधी समजुन घेवु..!

गांधीला चुकीच ठरविण्यासाठी अनेकांच्या खांद्यावर कट्टरतावाद्यांनी बंदुका ठेवल्या. ज्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचं कधीही पटले नाही अशांनी गांधीला विरोध करण्यासाठी त्यांचा वापर केला. सुभाषबाबू तर गांधीला राष्ट्रपिता म्हंटले त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. भगतसिंग, सुखदेव यांच्या फाशीवरून त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. पण भगतसिंग यांना फाशी थांबावी हे मान्य नव्हते. कारण फाशी थांबली तर देशभरातील युवकांना मिळालेली प्रेरणा नाहीशी होणार होती ते भगतसिंगाना मान्य नव्हते. गांधीने आयर्विन करारा अंतर्गत हजारो कैद्यांची सुटका केलेली हे मात्र सोईस्कररित्या लपवले जाते.   चला गांधी समजुन घेवु..! गांधी म्हंटले की कधी अतिवप्रेम तर कधी टिंगल - टवाळी, प्रचंड व्देष बघायला मिळतो.  हा गांधी ना कोणत्या प्रांताचा झाला, ना कोणत्या जाती-धर्माचा झाला. हा गांधी फक्त राहिला तो भारतीयांचा आणि हा भारतही राहिला तो फक्त गांधीचाच.  भारताची ओळख गांधींचा देश म्हणून सबंध जगभर झालेली दिसते. पण अशा वेळी बऱ्याच जणांकडून गांधींची टिंगल-टवाळी केली जाते अन्  त्यांच्याविषयी व्देषही बघायला...

शेत रस्त्याचे वाद असतील तर शिवार हेल्पलाइनला कॉल करा

  शेत रस्त्याचे वाद असतील तर शिवार हेल्पलाइनला कॉल करा-जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेला शिवार फाऊंडेशनची समन्वयकाची भुमिका उस्मानाबाद :- शेती, बांध व शेत रस्ता म्हटलं की गावागावात त्याचे वाद सुरू असतात. या रस्त्यावरून भावांमध्ये, भावकी मध्ये किंवा गावकऱ्यांमध्ये खूप वेळा तुंबळ हाणामारी पण होतात. हे वाद अनेक वर्षे चालत राहतात व यात शेतकरी सर्व बाजूने पिचत जातो. तो मानसिकरीत्या खचून जातो. कोर्टात खटले उभे राहतात, आर्थिक ताण, नैराश्यातून शेतकरयांनी  आत्महत्या केलेल्या ही घटना मागील काही वर्षांत समोर आलेल्या आहेत.                 गेल्या सहा महिन्यात शिवार हेल्पलाइनवर शेत रस्ता वादाचे सहा कॉल आलेले आहेत, त्यापैकी सर्वाधिक तीन कॉल हे कळंब तालुक्यातून असून उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा तालुक्यातील प्रत्येकी एक कॉल आहे. संबंधित जिल्हा यंत्रणेशी हे प्रश्न चर्चा करून सोडवण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यातील शेत रस्त्याचा संघर्ष थांबवण्यासाठी लातूर पॅटर्नच्या धर्तीवर शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यां...

अभविपचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

पंढरपुर/गणेश सुरवसे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशनचे थेट प्रक्षेपण अभाविप,पंढरपूर शाखेच्या वतीने सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज, कोर्टी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.अभाविप,पंढरपूर च्या वतीने सत्काररुपी स्वामी विवेकानंदांच्या विचाराची शिदोरी देण्यात आली.त्यावेळी सर्व तरुण सहकारी, परिषदेचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

कम्युनिस्ट पक्षाचा गौरवशाली इतिहास-एक चिंतन

एक जागतिक तत्वज्ञ कार्यकर्ता ,कार्ल मार्क्स याने पुढील सिद्धांत मांडला.... निसर्ग विकासातून माणूस उदयास आला.जन्माला येताना काही शरीर धर्म,मनोधर्म आणि गरजा घेऊन तो जन्मास आला. त्याला हवा जाग्यावर मिळाली .पाणी शोधावं लागल़. अन्न निर्माण करावं लागलं.वस्तू निर्मिती ही त्याची गरज झाली,वस्तू निर्मितीतून अनेक तंत्रविद्येचे अविष्कार आले. मानवजातीच्या सुरुवातीच्या काळात माणसे गटागटाने राहिली होती. तेव्हा मालमत्ता सामुदायिक होती. कालांतराने खाजगी मालमत्ता ही जाणीव निर्माण झाली.तिला लोभाचं रूप प्राप्त झालं.त्यातून तंटेबखेडे निर्माण झाले. गरजेची वस्तू निर्माण करण्यासाठी थोडे श्रम पडतात पण प्रत्यक्षात श्रमिकांच्या वाट्याला अधिक श्रम येतात. या अधिक श्रमाचे फलित प्रत्यक्ष  राबणाऱ्याला मिळत नाही.त्यांना राबवणाऱ्या धनदांडग्यांना ते मिळतं.शेवटी राबणारे राबूनही गरीब राहतात ,राबवणारे मात्र श्रीमंत होतात. यातून वेगवेगळे वर्ग आणि त्यांचे हितसंबंध निर्माण होतात .मग सुरु होतो वर्गसंघर्ष . अशा संघर्षात जर श्रमिकांना आत्मबोध घडला ,जाण आली, आपल्या श्रमातून हे विश्व आकाराला आलं.हे कळलं तर हा वर्ग फणा वर...

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला भेट

पंढरपुर /गणेश सुरवसे -राज्याचे माजी मुख्यमंत्री,व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी श्रीपुर येथे राज्यस्तरीय पारितोषिक व नामांकित श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला भेट दिली.या वेळी कारखान्याचे चेअरमन मा,श्री प्रशांत  परिचारक,  मा श्री.खासदार रनजितसिंह निबांळकर,मा,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,मा, उमेश परिचारक मालक कारखान्याचे व्हा, चेरमन वंसत नाना देशमुख,कार्यकारी संचालक, कुलकर्णी. साहेब माझी व्हा, चेरमन दिनकर, (भाऊ) मोरे.  वर्क्स मॅनेजर,आर  बी पाटिल साहेब,डेपुडि मँनेजर,आमोल बारटक्के साहेब व ईतर सर्व आधिकारी उपस्थित होते. 

आश्वासित प्रगती योजनेसाठी शिक्षक आमदार आसगावकर यांना आयटक चे निवेदन

बार्शी /प्रतिनिधी - विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 च्या आश्वासित प्रगती योजनचेेे रद्द केलेले जीआर पुर्नर्जीवित करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावेत या मागणीचे निवेदन पुणे विभाग नूतन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांना आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना तसेच संयुक्त कृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून आज दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी देण्यात आले व चर्चा करण्यात आली. निवेदन संघटनेचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले. निवेदनामध्ये  सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर व्हाव्यात.  सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा त्यासोबतच दहा वीस तीस वर्षाच्या लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू व्हावी,  पाच दिवसांचा आठवडा लागू व्हावा या मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.  यावेळी शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मा. वित्तमंत्री मा.उच्च शिक्षण मंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. निवेदनावर कॉ. तानाजी ठोंबरे, ए.बी. कुलकर्णी, प्रविण मस्तुद, उमेश मदने, विलास...

माणसाच्या रूपातील देवदूत : अंध जगन्नाथ भोसले यांच्या मदतीला धावले

सांगली/सुहेल सय्यद -सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये सिद्धेश्वर कॉलनीत मातीच्या छोट्याशा खोलीत राहत असलेल्या जगन्नाथचा (40) जन्मतःच एक डोळा नव्हता. वयाच्या पंधराव्या वर्षी खेळत असताना काठी लागून दुसरा डोळा पण निकामी झाला, वडिलांचे वीस वर्षापूर्वी निधन झाले होते. लगेच आईचे देखील आजाराने निधन झाले. दोन्ही डोळे निकामी असल्यामुळे, आई- वडील छत्र हरपले मुळे, पोटचा प्रश्न उभा राहिला, अश्या वेळी गल्लीतील मित्रांनी जेवणाच्या मेसचा खर्च भागवत आहेत. अश्या हलाखीच्या परिस्थितीत एकटेच जीवन जगत आहेत, जीवन जगत असताना एक अडचण दूर करे पर्यंत दुसरी अडचणी निर्माण होत होत्या, अश्यातच त्यांना रात्रंदिवस पोटात दुखणे व जेवल्यानंतर पोट फुगणे ह्या मुळे भरपूर वेदना होत असल्याने या विकाराने ग्रासले, त्यामुळे ते प्रचंड चिंताग्रस्त, भयभीत झाले होते. त्यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले होते त्यामुळे मला पण तेच झाले असेल या मानसिकतेच्या, शंकेने ते कायम भयभीत गप गप असायचे. सांगलीतील दोन चार हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले होते, पण काहीही फरक पडला नव्हता कोणी सांगितले.  हैदराबाद, मुंबईला घेऊन जावा, लाखाच्या घरात असलेला...

शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात चिंचणेर निंब येथे अंत्यसंस्कार

सातारा :  शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर आज चिंचणेर निंब येथे पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, कमांडर स्टेशन हेडक्वार्टर, कोल्हापूरचे कर्नल पराग गुप्ते  यांनी शहीद जवान सुजित किर्दत यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.  शहीद जवान सुजित किर्दत यांना मानवंदना देऊन कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या  पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावले होते.  'अमर रहे, अमर रहे सुजित किर्दत अमर रहे, भारत माता की जय,' अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली. सैन्य दल व पोलिस दलामार्फत पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आलीतसेच हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाज...

जिल्हा युवा महोत्सव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने

सोलापूर : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर  जिल्हा क्रीडा कार्याल याच्या  वतीने   युवक -   युव तींसाठी 25 डिसेंबर 2020 रोजी  ऑनलाईन/ व्हर्च्युअल ‘गुगल मीट’ ॲपवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात  आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. इच्छुक शाळा, महाविद्यालय, युवक मंडळ यातील कलाकारांनी आपले अर्ज 24 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या  dsosolapur.dsys-mh@gov.i n आणि  dsosolapur1@gmail.com   इमेलवर सादर करावेत. अर्ज पाठवताना व्हॉटस्ॲप क्रमांक आवश्यक असून अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी नदीम शेख (9422651337) आणि क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव (9028095500) यांच्याशी संपर्क साधावा. लोकनृत्य ,  लोकगीत ,   एकांकिका (इंग्रजी / हिंदी) ,  शास्त्रीय  नृत्य (भरतनाट्यम, ओडिसी, मणिपुरी, कथ्थक नृत्य, कुचीपुडी), शास्त्रीय  गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी ) , शास्त्रीय वादन(  सितार ,   बासरी ,  तबला ,  वीणा ,  मृदंग ,  हार्मोनियम (...

केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी ,जास्तीत जास्त मदतीची शेतकऱ्यांकडून मागणी

सोलापूर: केंद्रीय पथकाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची काल सायंकाळी पाहणी केली. पथकाने सांगोला तालुक्यातील संगेवाडी, बामणी, वाढेगाव तर मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावात भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी पथकातील केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव यश पाल, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांच्याकडे केली.             पथकासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील, मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्यासह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.             केंद्रीय पथकाने सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथे शिवाजी व्होवाळ यांच्या दोन एकरातील ज्वारी आणि डाळिंबाच्या बागेच्या नुकसानीची पाहणी केली. बामणी येथे अवि पोपट देशमुख यांच्या अडीच एकर डाळिंब बागेत भेट दिली.         ...

दहा दिवसात पीक विमा जमा करा अन्यथा पिकवीमा कंपनीच्या राज्याच्या प्रमुखांची धिंड काढणार- शंकर गायकवाड

छायाचित्रात बोंबाबोंब आदोलन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी बार्शी/प्रतिनिधी- चालू वर्षीची अतिवृष्टीची व सर्वच पिकांना १००% पिकवीमा भरपाई द्या, सन २०१८-१९चा मागील राहिलेला दुष्काळ निधी द्या, लॉकडाऊन काळातील घरगुती व कृषी विजबीलातुन मुक्तता द्या, सर्वच खातेदारांना प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ द्या आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले त्यावेळी शरद भालेकर, सचिन आगलावे, समाधान भालेकर, भगवान निर्मळ, बाळू उंबरे, भोलेनाथ उंबरे, भालचंद्र आगलावे, नामदेव आगलावे, अर्जून उंबरे, मोहन ननवरे, हनुमंत फोपले, अनुरथ आगलावे, सचिन पाटील, नागनाथ पवार, बाळू पवार, कुमार फोपले, अशोक आगलावे, बाबासाहेब आगलावे, पिंटू लोखंडे, पप्पू शेख, विनोद उंबरे, आकाश उंबरे, दत्तात्र्य पाटील, कृष्णा घावटे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.   दहा दिवसाच्या आत जर सर्वच शेतकऱ्यांना पिकवीमा भरपाई न मिळाल्यास पिकवीमा कंपनीच्या प्रमुखांची टक्कल करून धिंड काढणार असल्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंक...

बार्शी रस्ते आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी विधानसभा प्रश्नावली प्रमाणे तात्काळ माहिती द्यावी - लोकायुक्त

बार्शी /प्रतिनिधी -बार्शी नगरपरिषद च्या समोर गेली अनेक दिवसापासून बार्शी तिल खराब रस्ते, अपूर्ण भुयारी गटार व शहरातील विबिध अपूर्ण कामे कामे यामुळे वाढलेली धूळ या बाबत राष्ट्रीय आंदोलन समन्वयक मनीष देशपांडे हे बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले आहेत त्यांच्या या आंदोलनाची दखल स्थानिक प्रशासनाने वेळीच न घेतल्याने व त्यांना पुरेशी माहिती दिली नाही तसेच त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत नाहीत यामुळे आंदोलक देशपांडे यांनी लोकायुक्त यांच्याकडे धाव घेतली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत की, बार्शीतील अपूर्ण भुयारी  गटार , खराब रस्ते वाढलेले धूळ यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ स्वतः जातीने चौकशी करून त्याची माहिती तात्काळ सादर करावी तसेच  विधानसभा किंवा विधानपरिषद सभागृहांमध्ये विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची माहिती जशी तात्काळ दिली जाते.  त्या स्तरावर आता मनीष देशपांडे यांच्या आंदोलनाचा विषय , मागणी व बार्शीतील अपूर्ण भुयारी गटार रस्ते वाढलेले धुळ  बाबतच सद्यस्थितीचा अहवाल आणि विविध कामावरती केलेल...

अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

महाराष्ट्रात सध्या कोरोना रोगाच्या निर्मूलनानंतर सर्व क्षेत्रे खुली होत असताना 'अल्पसंख्यांक हक्क दिवस' मात्र ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम घेऊन अल्पसंख्यांकांचे हक्क व त्यांचे अधिकार डावलण्याचा प्रकार खुद्द अल्पसंख्यांक विकास विभागाकडूनच अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या दिवशीच करण्यात आला, याचा सर्व स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजात काम करणाऱ्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी आहे. लवकरात लवकर हा कार्यक्रम पुन्हा ऑफलाईन घेऊन अल्पसंख्यांक मागण्या पूर्ण कराव्यात. -मुस्लिम अधिकार आंदोलन महाराष्ट्र चे अध्यक्ष मुनीर मुल्ला   प्रतिंनिधी-सुहेल सय्यद- 18 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगात अल्पसंख्यांक दिन म्हणून साजरा केला जातो, हा दिवस संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला गेला. महाराष्ट्रात मात्र कोरोनामुळे शासकीय पातळीवर हा दिवस ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेऊन साजरा करण्याचे आदेश अल्पसंख्यांक विकास विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून देण्यात आला; त्याप्रमाणे सांगली जिल्हा प्रशासनाकडूनही फक्त शासकीय आदेशाचे पालन करण्याच्या उद्देशाने निव्वळ एक औपच...

नारायण चिंचोली मध्ये ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात परिचारक गटाकडून निवडणूक आढावा बैठक

 पंढरपूर /गणेश सुरवसे -नारायण चिंचोली येथे सोलापूर जिल्ह्याचे आमदार आदरणीय श्री प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेली ग्रामपंचायत नारायण चिंचोली येथे ग्रामपंचायत निवडणूक सन 2021 उमेदवार निवडी साठी पांडुरंग परिवाराची बैठक आयोजित केली होती.त्या मध्ये उमेदवार निवडी बाबत चर्चा झाली. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण तात्या धनवडे,सौदागर बापु गुंड, शिवाजीराजे भोसले,विजय कोळेकर, मारुती वाघमोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच धर्मराज नलवडे, माजी उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण,दत्तात्रय मस्के सर, सोसायटी चे चेअरमन विष्णू माने,माजी सरपंच नितीन मस्के,माजी सरपंच विठ्ठल माने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिकेने पूर्वसूचना न देता झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केल्याने विविध संघटनांकडून निषेध

  पंढरपूर/-गणेश सुरवसे - दि,16/12/020रोजी  पंढरपूर मधील  झोपडपट्ट्या नगरपालिकेने पूर्वसूचना न देता  उद्ध्वस्त केल्याने संघटनांकडून निषेध करण्यात आला. पंढरपूर येथील  विस्थापित नगर येथील  झोपडपट्ट्या नगरपालिकेने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केलेल्या या निषेधार्थ पंढरपूर नगरपालिका येथे आंदोलन करून करण्यात आला यामध्ये50 झोपडपट्ट्या काढण्यात आल्या. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांना जागा  लवकरात लवकर पर्यायी जागा द्यावी व त्यांचे  पुनर्वसन करावेत अशी मागणी  समस्त महादेव कोळी समाज, शेतकरी संघटना मनसे बाबा ग्रुप  तसेच त्याच्या झोपडपट्ट्या काडण्यात आल्या त्या सर्व महिला धरणे आंदोलनात सहभागी होत्या. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कोव्हिड योद्धे पगारापासून वंचित

सोलापुर /अब्दुल शेख - सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचारी पगार दिला गेला नाही , या  विषयाला घेऊन महाराष्ट्र राज्य जि.प आरोग्य सेवा कर्मचारी संघ संघटना आक्रमक झाली आहे . संघटनेकडून मा. जिल्हाधिकारी ,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी  सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांचे वेतन मागिल्ब 10 महिन्यांपासून वेळेवर होत नाही. आरोग्य कर्मचार्‍यांना वेतांनाशिवाय दूसरा कोणता उतपन्न स्त्रोत नाही.बँकांचे गृह कर्जाचे हफ्ते ,पत संस्थेचे हफ्ते वेळेवर न गेल्यास व्याज ,चेन बौन्स ई.मुळे कर्मचार्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व संवर्गाच्या नियमित पदौन्नती गेल्या तीन वर्षापासून रखडलेली आहे. काही कर्मचार्‍यांचे 6 व्या वेतन आयोगाचे हफ्ते अद्याप फंडात जमा झाले नाहीत. वरील सर्व मागण्या चर्चे अंती लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्या. अन्यथा संसदीय मार्गाचा अवलंब करून आंदोलन ,उपोषण करावे लागेल ,असा इशारा निवेदांनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस विजया चव्हाण ,गोपाल शिंदे , चंद्र्कांत पव...

बार्शीच्या स्वच्छ , धुळमुक्त ,खड्डेमुक्त्त रस्त्यासाठी नागरिकांसोबत संवाद

 बार्शी/प्रतींनिधी -बार्शी नगरपालिकेचे समोर बार्शी शहरातील भुयारी गटार योजना, खराब रस्ते व इतर मागण्यासाठी गेली आकरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले राष्ट्रीय आंदोलन समन्वयक मनिष देशपांडे यांच्या आंदोलनाचा उद्या बारावा दिवस आहे. बार्शी नगरपरिषद प्रशासन यांचेकडून कोणतेही ठोस उत्तर किंवा मागणी पूर्ण होत नसल्यामुळे बार्शी नगरपरिषद कर्मचारी व सत्ताधारी नगरसेवक यांना गांधीगिरी मार्गाने गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्याचे आंदोलन, खड्यात झाड लावणे, संविधानाची उद्देशिका वाटप आणि इतर आंदोलनही यावेळी करण्यात आली. या बेमुदत धरणे आंदोलनास विविध सामाजिक संस्था संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांचा पाठिंबा वाढत आहे कालच अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी  जनआंदोलन न्यास संघटनेच्या वतीने देखील मनीष देशपांडे यांच्या आंदोलनास व त्यांच्या कार्यास पाठिंब्याचे पत्र व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना पाठवले आहे. उद्या मंगळवार दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी ६ वाजता देखील मनीष देशपांडे, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय,बार्शी समन्वयक यांच्या आंदोलनास पा...

बार्शी च्‍या मेजर प्रा.अरूषा शेटे- नंदिमठ प्रजासत्‍ताक दिनाला कॅडेट्‍सची टीम घेवून जाणार दिल्‍लीला

बार्शी /प्रतिनीधी - बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्‍या प्राध्‍यापीका अरूषा शेटे या दिल्‍ली येथे  प्रजासत्‍ताक दिना निमित्‍ताने  रजपथावर होणार्‍या संचलनास 26 एनसीसी कॅडेट्‍सची टिम घेवून जाणार आहेत. या टीमचे नेतृत्व कर्नल प्रशांत नायर कमांडर ऑफिसर हे करणार आहेत. अधिक माहिती अशी की, दिल्‍ली येथे प्रजासत्ताक दिना निमित्‍ताने एनसीसी महाराष्ट्र कॉन्‍टीजन ची टिम दरवर्षी दिल्ली राजपथावर संचलन करीत असते. महाराष्ट्रातून एनसीसीचे पुणे या ठिकाणी निवड चाचणी शिबीरातून निवडलेले 26 कॅडेट्‍सची टिम 18 डिसेंबर 2020 रोजी विमानाने दिल्‍ली येथे जाणार आहे. या टिमला घेवून जाण्‍याचा बहुमोल मान बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयाचे एनसीसी कंपनी कमांडर मेजर प्रा. अरूषा शेटे- नंदिमठ यांना मिळाला आहे.  त्‍यांच्‍या सोबत बारामतीच विवेक बेले हे देखील असणार आहेत.  देशाभरातून आलेल्‍या एनसीसी टिम मधून महाराष्ट्र टिम दरवेळी प्रथम-व्‍दितीय क्रमांक पटवत आली आहे.  त्‍यामुळे यावेळी प्रथम क्रमांक पटकवण्‍याच्‍या उद्‍देशाने हि टिम सज्‍ज असल्‍याची माहिती पुणे ग्रुप कमांडर बिग्रेडिअर स...

अल्पसंख्यांक दिन साजरा करा –मुस्लिम अधिकार आंदोलन

  सांगली/सुहेल सय्यद – भारत सरकारच्या वतीने 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक दिन म्हणून साजरा केला जातो.सांगली जिल्ह्यामध्ये सुध्धा हा दिवस प्रशासनाच्या वतीने साजरा केला जातो.ह्या वर्षीही हा दिन साजरा करण्यात यावा तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांक   समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला आमंत्रित करून   त्यांना मान्यवरांकडून अल्पसंख्यांकां बदलचे हक्क व अधिकार बाबत   मार्गदर्शन करण्यात यावे. अशी मागणी मुस्लिम अधिकार आंदोलांन , या संघटनेच्या वतीने सांगली   जिल्हाधिकारी सो. यांना   करण्यात आली आहे.

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती

१. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव २. पदाचे नाव :- समन्वयक - माहिती, शिक्षण व संवाद (जागा – १) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / एमबीए मधील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव ३. पदाचे नाव :- संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक  (जागा – १) शैक्षणिक पात्रता –  सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या सारख्या  विकास क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव ४. सहायक मनुष्यबळ आस्थापना सल्लागार (जागा – १) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदवी. अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव ५. सहायक स्वच्छता व आरोग्य सल्लागार (जागा...