Skip to main content

राज्यातील शेळी-मेंढी व जनावरांच्या सर्व बाजारपेठा सुरू करा÷शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे



प्रतिनिधी/ नामदेव लकडे-गेल्या ६ महिन्यांपासून करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेळी-मेंढी व जनावरांच्या महाराष्ट्रभरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता बिइंग महाराष्ट्रातील इतर सर्व बाजारपेठा या सरकारने सुरू केलेल्या आहेत व नुकतीच बससेवाही सरकारने सुरू केलेली आहे.परंतु सरकारने अजूनही शेळी-मेंढी व जनावरांच्या बाजारपेठा सुरू केलेल्या नाहीत.सर्व बाराजपेठा बंद असल्यामुळे शेतकरी बांधव व शेळी-मेंढी पालन करणारा धनगर समाज हवालदिल झालेला आहे.

 यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.यामुळेच जिल्ह्यातील येथील शेतकऱ्यांनी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांच्याकडे तेथील बाजरपेठ सुरू करण्याविषयी व्यथा मांडली.संघटनेने लगेच महाराष्ट्राचे दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.कारण हा विषय सविस्तर मांडून.शेतकरी आणि व्यापारी शेळी-मेंढी पालन करणाऱ्या धनगर समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या तसेच हा विषय गंभीर असून यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.  असे मत शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा सुरू करण्याविषयी सरकारने सकारात्मक निर्णय लवकरच घ्यावा.सकारात्मक आश्वासन महाविकास आघाडी सरकारने द्यावे.या अथक प्रयत्नामुळे राज्यातील जनावरांच्या व शेळी-मेंढ्यांच्या सर्व बाजारपेठा लवकरच सुरू कराव्यात.

यामुळे हवालदिल झालेल्या मेंढपाळ बांधवांना मोठा दिलासा मिळले. आणखी एक महत्वाचा मुद्दा की, सरकारने मेंढपाळांना ६ हजाराचे अनुदान जाहीर केले होते,परंतु ते त्यांना मिळत नाही.गेल्या ६ महिन्यांपासून शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीसाठी सर्व बाजारपेठा बंद आहेत.आणि अशा परिस्थितीमध्येच सरकारने जाहीर केलेले अनुदान मेंढपाळांना मिळत नसेल तर त्यांनी उदरनिर्वाह कशावर करायचा?यावर महाविकास आघाडी सरकारने विचार करावा.कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला आहे.येत्या महिनाभरात सर्व मेंढपाळांना अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे महाविकास आघाडी सरकाराचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांच्याकडे निवेदनाव्दारे  मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...