Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 43 दवाखान्यांचा समावेश जिल्ह्यात आतापर्यंत 705 कोरोना रूग्णांनी घेतला लाभ

सोलापूर : राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा प्रारंभ केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही योजना सर्वांसाठी खुली असून सोलापूर जिल्ह्यात 43 दवाखान्यात या योजनेचा लाभ 705 रूग्णांना मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तसेच रूग्ण गंभीर असेल तरच या योजनेतून मोफत उपचार मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे नि:शुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. सोलापूर जिल्ह्यातील 8 लाख 13 हजार 278 कुटुंबांना योजनेचा लाभ मिळू शकतो. 2 जुलै ते 26 जुलै 2020 पर्यंत आतापर्यंत 1 लाख 56 हजार 954 रूग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, यामध्ये 705 रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे योजनेच्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला जगताप यांनी सांगितले. कोविड-19 साठी जिल्ह्यातील दवाखाने अधिग्रहित केले आहेत.  यामध्ये 80 टक्के बेड हे ...

सोलापूर जिल्ह्यात काय राहणार सुरू ,काय बंद ?

सोलापूर:  कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले. हे आदेश नवीन सुधारीत सूचनेनुसार पोलीस आयुक्तालय हद्द वगळून लागू करण्यात आले आहेत. यानुसार मॉल्स, बाजारसंकुले पाच ऑगस्टपासून सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 सुरु राहतील. मात्र मॉल्समधील चित्रपटगृहे, उपहारगृहे बंद राहतील. परंतु मॉलमधील उपहारगृहातून फक्त घरपोच सेवा चालू असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नवीन सुधारित सूचना खालीलप्रमाणे  65 वर्षे वयावरील व्यक्ती, गंभीर आजारी असलेले रुग्ण, गरोदर स्त्रिया तसेच 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच रहावे. त्यांना अत्यावश्यक कामासाठी व आरोग्यविषयक कारणासाठी निर्देशाचे  पालन करणे आवश्यक राहील.  प्रतिबंधीत सांसर्गीक क्षेत्रामध्ये अत्यावश्यक बाबी वगळता निर्बंध कडक राहतील.   यापूर्वी देण्यात आलेल्या विशिष्ट/ सामान्य  आदेशानुसार परवानगी व मान्यता देण्यात आलेले उपक्रम चालू राहतील.     सर्व सार्वजनिक स्थळी, कामाच्या ...

5 ऑगस्ट 2020 पासून काय सुरू काय बंद ?

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.  काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून संमती देण्यात आली आहे.  या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील. कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सामाजिक अंतर पाळणे (सोश...

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश

परांडा - महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मध्ये ग्लोबल विद्यालय परंडा - सोनारी रोड, खानापूर पाटीजवळ, परंडा चा 100% निकाल लागला  यामध्ये  कु. यश कैलास मोरे याने 95.40 % गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम ,  कु. प्रवीण दत्तात्रय नाईकनवरे याने 86.80% गुण मिळवून शाळेमध्ये द्वितीय ,कु.  प्रेम गोरख मोरजकर याने 83.80% गुण मिळवून शाळेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गोरख मोरजकर सर व सचिव सौ आशा मोरजकर मॅडम तसेच पालक सौ मोरे मॅडम, श्री दत्तात्रय नाईकनवरे, शिक्षक खैरे सर, शेळके सर, ठवरे सर, ठाकुर सर व भगत सर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सर्व नागरिकांनी प्रधानमंञी जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा उतरवावा - गणेश अधटराव

पंढरपूर/नामदेव लकडे ::- सर्व नागरिकांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रत्येक नागरिकांच्या फॅमिली आधाराकरिता कमीत कमी रक्कमेत सर्वांनकरिता त्यांच्या संकल्पनेतुन सुरू असलेल्या वार्षिक रक्कम 330 रू. असलेला प्रधानमंञी जीवन ज्योती विमा व वार्षिक रक्कम 12 रूपये असलेला प्रधानमंञी सुरक्षा विमा हा आपले नॅशनल बँक खाते असलेल्या बँकेमध्ये त्वरित उतरवण्याची गरज असल्याचे मत पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश अधटराव यांनी व्यक्त केले आहे.  यामध्ये कोणत्याही अधिक कागद पञांची गरज नसुन ज्या नॅशनल बँकेमध्ये आपले खाते आहे त्या बँकेमधुन तो फाॅर्म घेऊन भरून द्यायचा आहे.या अगोदर हे दोन्ही विमा उतरवले असल्यास नंतर उतरवता येणार नाही. व एका व्यक्तीचा एकाद्या बँकेत हे विमे उतरविले असल्यास दुसऱ्या बँकेत त्या चालु वर्षात हे विमे उतरवता येणार नाहीत.  या मधिल प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना ही 18 ते 70 वर्षांमधिल तर प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजना ही 18 ते 50 वर्षांमधिल नागरिकांना उतरवता येईल तसेच या मधिल प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सदर विमा धारकाचा कोणत्याही क...

कोविड रुग्णालयासाठी आ.भारत भालकेंनी दिला‌ ३० लाखांचा निधी

पंढरपूर / नामदेव लकडे ::-पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  यावर नियंञण मिळवण्यासाठी  गुरुवारी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी पंढरपूर मध्ये आढावा बैठक घेतली.या बैठकीत आ भारत भालके यांनी १२ आॅक्सिजन मशिन खरेदी करणेसाठी ३० लाखांचा निधी  दिला. पंढरपूर शहर व तालुक्यात दररोज वाढणारे रुग्ण चिंताजनक आहेत.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर मध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. याची घोषणा शुक्रवारी जिल्हाधिकारी   करणार आहेत. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी  शहरातील सहा खाजगी हास्पिटल ताब्यात घेण्यात आले आहेत.  या रुग्णांवर तात्काळ उपचार मिळणेसाठी व मृत्यु दर कमी करणेसाठी  आॅक्सिजन मशिनची गरज असल्याचे या बैठकीत डाॅक्टरांनी सांगितले. यावर तात्काळ आ भारत भालके यांनी ३० लाखांचा निधी दिला. याचबरोबर या बैठकीत आ भालके यांनी आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधत रॅपिड किटससह इतर आरोग्य किट देण्याची मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले,...

संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

बार्शी: बार्शी तालुक्यातील सर्व संशयित व्यक्तींना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.बार्शी तालुक्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. शंभरकर यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बार्शी नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार डी.एस.कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, तालुका समन्वयक तथा सहायक निबंधक अभय कटके, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.शितल बोपलकर,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, आदी उपस्थित होते.श्री.शंभरकर यांनी सांगितले की, कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांची त्याच दिवशी तपासणी करावी. अतिजोखमींच्या संपर्कातील आणि कमी जोखमींच्या संपर्कातील किमान वीस व्यक्तींचे ट्रेसिंग करा. नागरिकांचे सर्व्हेक्षण करा. त्यातून आयएलआय (इन्फ्लूएंजा लाईक इलनेस) आणि सारीची (सिव्हीअर ॲक्यूट रेस्पीरेटरी इलनेस) लक्षणे अ...

आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून

                                कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तथापी, आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्र...

साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

प्रतिनिधी/शंकर जमदाडे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षतेत तावशी येथील साधना विद्यालयाचा निकाल 100 % लागला आहे. प्रशालेत कु पिसे प्रीती धनाजी 88.60% (प्रथम ) कु पिसे प्रतीक्षा नाथा 87.80% (द्वितीय) सुतार साहिल सतीश 87.40% (तृतीय )क्रमांक आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक ,  शिक्षक ,पालक  यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव विद्यालयाचा एकुण निकाल 94.44 %

कोपरगाव /निखिल भाटे -गोधेगाव येथील  रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव या विद्यालयाचा एकुण निकाल 94.44 % अहमदनगर जिल्हातील कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव या विद्यालयाचा एकुण निकाल 94.44 %इतका लागला असून  कुमार. अक्षय त्र्यंबक ठोंबरे यांनी 500 पैकी 455 गुण प्राप्त करून (91%) प्रथम क्रमांक प्राप्त केला.   त्याचबरोबर कुमारी. प्रगती बाबासाहेब नवले व कुमारी. साक्षी भाऊसाहेब भाटे यांनी क्रमशः   500 पैकी 452 (90.49%) व 446 (79.20%) गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खंदारे सर व सर्व विषय शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रा. तुकाराम नारायण मस्के यांची जिल्हा युवा समितीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

पंढरपूर / शंकर जमदाडे - अखिल भारतीय वारकरी मंडळ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी जिल्हा अध्यक्ष श्री ह भ प डॉ किरण महाराज बोधले यांच्या शिफारशीनुसार तर जिल्हा उपाध्यक्ष श्री ह भ प अभिमान महाराज पाटील, सह जिल्हा अध्यक्ष श्री ह भ प प्रभाकर दादा वाघचवरे महाराज, श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज हेटकळे यांच्या सूचनेनुसार जिल्हा समिती प्रमुख पदाधिकारी यांच्या नियुक्ती  जाहीर केली आहे. प्रा.तुकाराम नारायण मस्के  यांच्या  किर्तन रुपी समाज प्रबोधन आणि त्यांच्या या कामाची दखल घेऊन , अखिल भारतीय वारकरी मंडळ यांनी प्राध्यापक तुकाराम नारायण मस्के यांची जिल्हा युवा समितीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली .प्रा.तुकाराम नारायण मस्के  शिक्षक म्हणूनविवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर मध्ये कार्यरत आहेत . त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी कीर्तनकार झाले आणि त्याच बरोबर हे स्वतः एक मोठे वक्ते आहेत. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर जिल्हा समिती कार्यकारणी पुढीलप्रमाणे  वारकरी शिक्षण...

अक्कलकोट तालुक्याचा निकाल ९६.४३ टक्के

अक्कलकोट / जयकुमार सोनकांबळे : महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ९६.४३ टक्क इतका लागला आहे.श्री शहाजी प्रशालेची अनुराधा माधव कुलकर्णी ही ९७.६० टक्के गुण मिळवत तालुक्यातुन प्रथम आली आहे तर एस.एस.शेळके प्रशालेतील विश्वनाथ खिरानंद धड्डे यांने ९७ टक्के गुण मिळवत कन्नड माध्यमात प्रथम व तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविले.तर  मंगरूळे प्रशालेतील सोमनाथ मारूती जमादार यांने ९६ टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविले.या वर्षी तालुक्यातून ४ हजार २९१ मुले व मुली परिक्षस बसल्या होत्या.त्यामध्ये ४ हजार १३८ मुले व मुलींना यश मिळाले आहे.त्यामध्ये मुलींचे प्रमाण उत्तीर्ण होण्याचे अधिक आहे.

दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सा.म्हेत्रे प्रशालेचे दहावीचा निकाल १००%

दुधनी / जयकुमार सोनकांबळे  : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील  मातोश्री लक्ष्मीबाई सा.म्हेत्रे प्रशालेचे दहावीचा निकाल १००% टक्के लागला आहे. मार्च २०२० एस.एस.सी परीक्षेमध्ये एकूण ५९ विद्यार्थी बसले होते. यापैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्रावीण्य मध्ये १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कु. गिता प्रभु झळकी   ( गुण ८५.८०टक्के ) द्वितीय क्रमांक  उत्तम सातलिंग निबांळ  (गुण ८४ टक्के ), तृतीय क्रमांक कु. लक्ष्मी रत्नप्पा गोटे (गुण ८३.२० टक्के) गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्था अध्यक्ष मा.श्री शंकर अण्णा म्हेत्रे व सचिव श्री. प्रथमेश म्हेत्रे  व सहसचिव श्री . महादेव खेडसर  मुख्याद्यापक व सर्व  शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी  शुभेच्छा दिले. श्री. एस्. जी. परमशेट्टी हायस्कूल, दुधनी. ता. अक्कलकोट शाळेचा निकाल- 98.41% दुधनी केंद्रात व शाळे...

श्री शिवाजी विद्यालयाचा 98.36 टक्के निकाल

कारी/आसिफ मुलाणी - कारी येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित श्री शिवाजी विद्यालयाचा  इयत्ता10  विचा 98.36टक्के निकाल लागला . यामध्ये करळे पायल पद्माकर (90.60),कावळे राजनंदिनी अनिल (90),तर गादेकर सुमित सुधाकर (85.20)यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यालयातील 61 विद्यार्थी परीक्षेला बसले होते , यामधील 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष प्राविन्यात 18 तर प्रथम श्रेणीत 30 विद्यार्थी आहेत. मागील वर्षांच्या निकालाच्या तुलनेत यावर्षी चांगल्याप्रकारे विद्यालयाच्या निकालात मोठी वाढ झाल्याने पालक व गावकऱ्यांकडून शिक्षकांचे व विद्यालयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस एम भुसारे,ढेंबंरे ,संकपाळ, सोनवणे, शेख ,आगलावे, गायकवाड,या शिक्षकांचे  मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे, सचिव डॉ अनिल बारबोले, मुख्यध्यापक महावीर भुसारे आदींनी अभिनंदन केले.

वाणीचिंचाळे येथे हिरवाई बहरली , संपूर्ण वनविभागात हिरव्यागार रंगाची उधळण

या हरीत गाव करण्याच्या चळवळीला काहीजण  हरताळ पाळत आहेत. यामुध्ये झाडाच्या जाळ्या चोरुन नेणे,चोरून रात्रीच्या वेळी जनावरे वनविभागात चारणे,शिकार करणे  या गोष्टी पण काहीजण करत आहेत यावरही आळा बसला तर गाव एक हरीत माँडेल म्हणून येईल.यावर सर्वांनीच हि वनसंपदा आपली आहे ,याची काळजी आपण सर्वजण घेतली तरच जंगल वाचेल अन्यथा येरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या अशा प्रत्यय येईल.सर्वानीच वनांची काळजी घेऊन जर सहकार्य केले तर गावाला पावसाचे प्रमाण वाढेल व पर्यायाने गावात पिके चांगली येतील व हि वन साखळी वाचेल पंढरपूर/नामदेव लकडे - सर्वत्र वनसंवर्धन दिन साजरा होत असतानाच वाणीचिंचाळे वनविभागात हा निराळा योग दिसून येत आहे. तसेच सध्या पाऊस पडल्यामुळे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या झाडे लागवडीमुळे सर्व परीसर हिरवागार दिसत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फाही झाडे वाढल्यामुळे अतिशय सुंदर चित्र दिसत आहे. वाणीचिंचाळे गावाने पाणी फाऊंडेशनच्या यशानंतर गावात  हरीत गाव करण्याची संकल्पना मांडली .या मोहीमेला वनविभागाचे अधिकारी तसेच वनमजुर व गावकरी हातात हात घेऊन गावात वनांचे क्षेत...

रक्षा मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव : इलेक्‍ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : मेकॅनिकल इंजिनियरिंग : ३५ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग : ३१ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग : १२ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : मटेरियल सायन्स आणि इंजिनियरिंग/मेटॉलॉजिकल इंजिनियरिंग : १० शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : फिजिक्स : ८ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत फिजिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : केमिस्ट्री : ७ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परिक्षेत उत्तीर्ण पदा...

बार्शी टेक्निकल हायस्कूलचा निकाल 96.29%

बार्शी /अब्दुल शेख - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला .बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बार्शी टेक्निकल हायस्कूल बार्शी इयत्ता दहावी मार्च 2020 चा निकाल 96.29% लागला आहे. मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राऊत अविनाश ज्योतीराम  95% (प्रथम) ,पासले रोहित संतोष 93.20%(द्वितीय) ,हुकिरे सिद्धार्थ संतोष 85.60% ( तृतीय)  उदमले गणेश लक्ष्मण 85% 4 था क्रमांक पटकवला आहे. संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती प्रभाताई झाडबुके व संचालिका वर्षाताई गुलाबराव ठोंबरे तसेच संस्थेचे सचिव उत्तरेश्वर बेणे मुख्याध्यापक श्री विक्रम टकले सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निम्मीताने भव्य ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा

बार्शी /अब्दुल शेख - लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतीने भव्य प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र स्पर्धेचे आयोजन केले आल्याची माहिती काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांनी दिली आहे.   कोविड 19 या महामारी मुळे, ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली गेली आहे.  काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन, कार्य, विचार, साहित्यावर प्रकाश पडावा, अण्णा भाऊंचे विचार नव्या पिढी पर्यंत जावेत, प्रबोधन व्हावे या उद्देशाने ऑनलाईन भव्य प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र स्पर्धा केली आहे. या प्रश्नमंजुषेत 25 प्रश्न 100 गुणांसाठी दिले आहेत. https://forms.gle/g18mXmoxrr9tmkG67 या लिंक वर जावून या स्पर्धेत  पुरोगामी पक्ष, चळवळीचे कार्यकर्ते, तरूण, विद्यार्थी, महिला, नागरिक यांनी या स्पर्धेस उदंड प्रतिसाद द्यावा असे अवाहण केले आहे.    स्पर्धेत सहभागी होणार्यांना प्रत्येक सहभागीस ऑनलाईल मेल आयडीवर सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे तसेच स्पर्धेतील विजेत्यांचा कोरोनानंतर सत्कार करण्याचा, बक्षीस देण्याचा आयोजकांचा मानस आहे.अशी...

भरपावसात केले आयुर्वेदिक काढ्याचे वाटप-युवा उद्योजक लखन माने यांचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर/नामदेव लकडे -पंढरपूरातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणारे समाजसेवक लखन माने यांनी काल तुलसीदासनगर,गोपाळपूर येथे भर पावसात आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या प्रमाणानुसार आयुर्वेदिक काढा व अर्सनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले.यावेळी सर्व नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजनही  चेक करण्यात आले.कोरोनाने सवत्र हाहाकार माजवला आहे.त्याच्या फैलावाच्या वेगाने संपूर्ण देशभरातील लोक भयभीत झाले असताना स्वतःच्या जीवाची तमा न करता लोकांसाठी झटणारे अनेक लोक पुढे येत आहेत.आपल्या निस्वार्थी सेवेच्या व कामाच्या जोरावर लोकांची मने जिंकत आहेत. पंढरपूर शहरातही अनेकजण आपापल्या परीने कोरोनाच्या लढाईत आपले योगदान देत आहेत.याच काळात एका युवा उद्योजकाने आपल्या चोख व प्रामाणिक कामाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.तो युवा उद्योजक म्हणजे लखन माने.या युवा उद्योजकाने आजवर व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई झोपडपट्टी,अण्णाभाऊ साठे नगर, तुळशीदास नगर, गोपाळपूर येथे आतापर्यंत दहा हजार लोकांना गोळ्या व काढा वाटप केला आहे.त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोर...

पंढरपूर शहरात १० दिवस लॉकडाऊन करा-शिवसेना

  शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी                                     पंढरपूर/नामदेव लकडे - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन अतिशय शिस्तबध्दपणे विविध उपायोजना करीत आहे.पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात संपुर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्या पासून आपण व आपल्या सर्व सहकार्‍यांनी प्रशासकिय पातळीवर योग्य त्या उपायोजना करण्याबरोबरच अहोरात्र परिश्रम करीत पंढरपूर शहर तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठे यश मिळवीले.मात्र जुन महिन्याच्या सुरुवातीस पंढरीत पहिला स्थानिक रहीवाशी कोरोना बाधीत आढळला आणि शहरात मोठया संख्येने कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे.हा प्रसार रोखण्यासाठी व संपर्क साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहरात किमान १० दिवसाचा लॉकडाऊन करावा अशा आशयाची मागणी शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.              या बाबत अधिक माह...

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार

राज्य सरकार ने लवकरात लवकर मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे:- अझरुद्दीन सय्यद  हडपसर - देशात व राज्यात मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या परिस्थितीने अनेक कमिशन नेमण्यात आली. प्रत्येक कमिशन ने वेळोवेळी  मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण शासनाच्या निदर्शनास आणून देणारा अहवाल सादर केले.सदर अहवालामध्ये मुस्लिम समाजाची अवस्था अतिशय बिकट असून दलितेतर समाजापेक्षाही खालच्या दर्जाचे असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झालेली आहे. परंतु सदर अहवाल हे केवळ कागदोपत्री राहिले असून शासन दरबारी मात्र आरक्षणाच्या दृष्टीने अनास्था दिसून येत आहे.  महाविकास आघाडी सरकारने देखील आपल्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केलेले होते व आहे. नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेचा विचार करता यामध्ये मुस्लिम समाजाची टक्केवारी ही अतिशय कमी म्हणजेच १ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिमांना पाच टक्के कोटा दिला. पण त्याविरुद्ध केस हायकोर्टात गेली. कोर्टाने मुस्लिमांचं शैक्षणिक आरक्षण चालू ठेवायला सांगितलं. पण ...

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या कामांचा पडला विसर -शेवते - खेडभोसे रस्त्याची दुरवस्था

शेवते - खेडभोसे रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.   शेवते - खेडभोसे रस्त्यावर शेवते ग्रामपंचायतीने मागील वर्षी 2 किमी पर्यंत मुरुम टाकला होता, मात्र यंदा रस्त्याची डागडुजी न केल्याने ग्रामस्थ, शेतकऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे. पंढरपूर/नामदेव लकडे - लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पंढरपूर तालुक्यातील शेवते ते खेडभोसे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना चिखलातुन रस्ता शोधावा लागत आहे. शेवते ते खेड भोसे हे पाच किलोमीटर अंतर आहे. या पाच किलोमीटर पैकी शेवते गावाकडून दोन किलोमीटर खडीकरण आहे. तर खेडभोसे गावाकडून दोन किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे. आता खेडभोसे शीव ते पवार वस्ती ह्या एक किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. या एक किलोमीटर मध्ये साधे खडीकरण सुध्दा नाही. या रस्त्याने वाहनच काय पण माणसांना देखील व्यवस्थित चालता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातच सध्या या परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने या रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने  वाहनचालकाना खड्डयाचा अंदाज येत...

वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव : ArcGIS Python Developer : १ जागा शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह बी.टेक/ एम.एससी/ एम.टेक पदवी आणि अनुभव वयोमर्यादा : वय वर्षे ४० पेक्षा जास्त नसावे. पदाचे नाव : Project Cordinator : १ जागा शैक्षणिक पात्रता : बी.टेक/ बी.एससी, अनुभव वयोमर्यादा : वय वर्षे ३५ पेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी : https://bit.ly/30Ri3xO अर्ज करण्यासाठी ईमेल :  registrar@wii.gov.in

पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे- दादाजी भुसे

नंदुरबार/गुणवंत पाटील  : - शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे आणि बँकेत येणाऱ्या शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर आदी उपस्थित होते. श्री.भुसे म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे व तो संकटातून सावरावा यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. बँकांनी कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने बँकांनी सहकार्याची भूमीका घेवून ग्रामीण शेतकऱ्यांना मदत करावी व वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे. आदिवासी दिनी रानभाज्या महोत्सव रानभाज्यांची चव शहरी भागात आणि नव्या पिढी...

2020 नंतर - संधी आणि आव्हाने

सध्या सगळ जग कधी नव्हे ते थांबल. या महामारीच्या संकटातून आपण लवकरच बाहेर पडू नव्हे पडतो आहोत. पण , यातून बाहेर पडल्यानंतर आपल्या पुढे सगळ्यात मोठ काम असणार आहे ते म्हणजे गडबडलेली अर्थव्यवस्था आणि त्यात लपलेल्या  संधी .!       सध्या आपण बघतो आहोत की सगळेच क्षेत्र एकदम नीचांकी पातळीवर आले आहेत , आणि यातील जागतिक संधि शोधून सन २०२० पासून आपण पुन्हा नव्याने सुरवात करून जगाने ज्या ज्या संधि गमावल्या त्या आपण निर्माण करून सन २०२० च्या पुढे आपण नक्कीच महासत्तेकडे वाटचाल करू.     हीच बदलाची वेळ आहे , जर आपण यात संधि नाही शोधली तर बाकीचे आपल्याला ओलांडून पुढे जातील...! गरीबी व बेरोजगारी आपली वाढेल आणि आपल्या समाजाची स्थिति अत्यंत वाईट होइल. आणि जर आपण चांगली संधि निर्माण करून बदल केले तर आपण खरी प्रगती करू शकू. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडून गतिमान अर्थव्यवस्थेकडे , बेरोजगारितून रोजगारकडे , उद्योग विकासाकडे , गतिमान विकासाकडे...!!! प्रामुख्याने आपण यापुढील काही लेखात उद्योग , सेवा , कृषि इत्यादि सारख्या विषयावर चर्चा करणार आहोत ...