Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

पिंपळवाडीच्या सरपंचपदी. जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंचपदी. गोवर्धन चौधरी बिनविरोध

बार्शी - राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या  असलेल्या बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायच्या सरपंच पदी जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंच पदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दिनांक  26:2.2021 रोजी. बार्शी तालुक्यातील सरपंच उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या पिंपळवाडी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अटी तटीची लढत झाली. यामधे माजी मंत्री. मा. दिलीप. सोपल साहेब प्रणित अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीचे 7पैकी 5उमेदवार बहुमताने विजयी झाले पिंपळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी जयश्री रमेश चौधरी यांचा तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन बाळनाथ चौधरी यांचा एक एक अर्ज  दाखल झाला होता.सरपंच पदाला जयश्री चौधरी यांना पूजा पांडुरंग चौधरी सूचक तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन आप्पा यांना आजमुद्धीन मुलांनी हे सूचक राहिले या वेळी नवनिर्वाचित सदस्यामध्य आजमोदीन  मुलाणी  रेश्मा संदीप चौधरी पूजा पांडुरंग चौधरी रोहित. अनिल चौधरी हे उपस्थित होते या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे  आर. कोळी विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी ग्रामसेवक  के. व्ही  सुरुसे यांनी काम पहिले सदर ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

मुंबई दि. २७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत  पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे. पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी वाढवण्यात येईल. दर शनिवारी,रविवारी तसेच शासकीय सुट्टयांच्या दिवशी मार्गदर्शन वर्ग बंद राहतील. पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण ४ अभ्यास घटकांचे दिवसाला २ तास याप्रमाणे ऑनलाईन प्रशिक्षण असेल. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील. हे प्रशिक्षण वर्ग बार्टीच्या 'Barti Online' या युट्यूब चॅनल वरूनही थेट प्रसारीत करण्यात येतील. प्रशिक्षण परस्परसंवादी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षणामध्ये विषयाचा आवाका, मागील...

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या सूचना

सोलापूर : अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी जिल्हा जात पडताळणी समितीच्या सदस्य तथा उपायुक्त छाया गाडेकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी यु.जे. कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव, सहायक पोलीस आयुक्त हेमंत भट, संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नागनाथ पवार, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम.एन. कांबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक एल.ए. क्षीरसागर, महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे, चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे यांच्यासह कामगारांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या घरकुल, ...

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

ए.बी.एस.न्यूज नेटवर्क - मुंबई : जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. q  राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे श्री.वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. q  यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, राज्यात जानेवारी फेब्रुवारी 2021 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे गहू, हरभरा, द्राक्ष, मका, डाळिंब, भाजीपाला या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, धुळे, नाशिक, औरंगाबाद, बीड, सातारा जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आ...

काजल हवलदार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

ए.बी.एस.न्यूज नेटवर्क - सांगोला -सामाजिक कार्याचा वसा हाती घेऊन अविरतपणे काम करणाऱ्या कडेगावच्या धडाडीच्या युवा सामाजिक कार्यकर्त्यां काजल हवलदार यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समाजरत्न पुरस्कार श्रीम फौंडेशन व सी बी एस न्युज यांच्या वतीने श्रीम फौंडेशनच्या चेअरमन राजश्री गायकवाड, सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले, सिनेअभिनेत्री स्मिता शेवाळे, सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत गायकवाड, तसेच CBS news चे मुख्य संपादक चांदभैय्या शेख यांच्या हस्ते सांगोला येथे देण्यात आला. सामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, महीला तसेच विद्यार्थीवर्गासाठी अनेक सामाजिक उपक्रम काजल यांनी गेली 5 ते 6 वर्षे राबविले आहेत. यामध्ये गरजुंना धान्य वाटप, फुटपाथवरील लोकांना अन्नदान, रक्तदान शिबीर, अनाथ व बेघर लोकांना मदत, स्त्रियांसाठी तसेच विद्यार्थीसाठी समाज उपयोगी उपक्रम, लेक शिकवा लेक वाचवा अभियान, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य शिबीर, सामाजिक वाढदिवस, विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यशाळा असे समाज उपयोगी उपक्रम काजल यांनी सातत्याने राबविले ...

एलआयसी कडून बिमा ज्योती ही नवी योजना जारी

सिंगल प्रीमियम वाढीमध्ये गोवा एलआयसी ठरले देशात अव्वल ए. बी . एस न्युज नेटवर्क- एलआयसी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने  बचत आणि सुरक्षा कवच असा दुहेरी लाभ देणारी बिमा ज्योती ही योजना बाजारात आणली आहे. भांडवली बाजाराशी जोडलेली नसलेली ही नॉन लिंक, नॉन पार्टीसिपेटिंग, वैयक्तिक, बचत योजना आहे.  या योजनेअंतर्गत मुदत समाप्तीनंतर एक रकमी रक्कम आणि पॉलीसीच्या मुदत कालावधीत धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना वित्तीय पाठबळही देऊ करते. एजंटमार्फत  किंवा इतर मध्यस्थांमार्फत ही योजना ऑफ लाईन घेता येईल तसेच www.licindia.in या संकेत स्थळाद्वारे थेट घेता येईल. पॉलीसीच्या मुदत कालावधीपर्यंत प्रत्येक वर्षाच्या अखेरीला, हजार रुपयामागे 50 रुपये या दराने निश्चित हमीने रक्कमेत भर घातली जाईल.  जोखीम सुरु झाल्याच्या तारखेनंतर पॉलीसीच्या मुदत कालावधीत पॉलीसीधारकाचा मृत्यू झाल्यास,’सम अश्यूअर ऑन डेथ’आणि पॉलीसीच्या अटीनुसार हमीने भर घालण्यात आलेली जमा रक्कम देय आहे.  पॉलीसीची मुदत संपण्याच्या  तारखेला जीवित पॉलीसीधारकाला परिपक्वतेच्या वेळी प्रदान करण्यासाठी निश्चित करण्यात आले...

लुटारु सरकारला शिवनितीने उत्तर दिले पाहिजे- कॉ.नरसय्या आडम मास्तर

  सोलापूर  -  राजा  शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाला मूठमाती दिली आहे. अन्नदाता सुखी तर राज्य सुखी म्हणून शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाई नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाला आदेश देणारे प्रजाहितदक्ष राजा शिवछत्रपतींच्या राज्यात बळिराजा न्यायासाठी गेली 82  दिवस झाले सरकारशी झगडू लागला.परंतु जनतेची लूट करणाऱ्या सरकार ला शिव प्रभूंच्या नितीने प्रत्युत्तर दिले पाहिजे असे परखड मत व्यक्त केले. मार्क्सवादी  कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी माकपचे राज्यसचिव माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माकप च्या नगरसेविका कामीनीताई आडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   तदनंतर शिवाजी चौक येथील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रास्तविक अँड.एम.एच.शेख यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ.अनिल वासम यांनी केले.  यावेळी व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, युसूफ मेजर, सि...

छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती वडाची झाडे लावून साजरी करण्यात

  सांगोला - आज वाणीचिंचाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीच्या निमित्ताने गावातील युवकांनी 5 वडाची झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला.      सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन गावातील मान्यवरांच्या हस्ते व मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता सामाजिक उपक्रम राबविण्यात येण्याचे ठरवले यानुसार गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात,महादेव मंदिर परीसर व प्रगती विदयालय या परीसरात हि वडाची झाडे लावून त्याची जबाबदारी अनिरुद्ध पाटील, रोहीत पवार, दादा काशीद ,यांच्या कडे महादेव मंदिराच्या परीसरातील झाडांचे संगोपन करणे.तसेच प्राथमिक शाळेच्या आवारातील बापुद्दीन शेख,नवनाथ गायकवाड, अमीत सावंजी,अभिजीत गायकवाड, सुरेश झाडबुके, अक्षय पवार यांच्या कडे देण्यात आली. तर प्रगती विदयालय परीसरातील झाडाचे संगोपन सचिन गायकवाड, कैलास गडहिरे, अक्षय वाळके,जालींदर पवार, विनोद निळे ,संभाजी केंगार यांच्या कडे देण्यात आले.     या माध्यमातून फक्त खड्डा तोच...

शिवजयंती विशेष - मला कळालेले शिवाजी महाराज ..

जाणता राजा, रयतेचा राजा इ.अनेक उपमा देऊन छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात.शिवजयंती च्या अनुषंगाने सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीने त्यांच्या मीडियाच्या विद्यार्थ्यांना "मला कळलेले छत्रपती शिवाजी महाराज" यावर मत व्यक्त करायला सांगितले त्यातल्या निवडक  प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय... मला कळलेलं शिवाजी महाराज म्हणजे द मॅनेजमेंट गुरू. मॅनेजमेंट कशी असावी आणि कश्या पध्दतीने हाताळावी हे समजून घ्यायचं असेल तर महाराजांना नीट समजून घेऊन त्यांच्या अभ्यास केला तर अनेक घटक कळू शकतात.-शोभिका नकाशे,भाऊसाहेब हिरे विद्यालय माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शूर-पराक्रमी वीर-पुत्र. साहस, धाडस आणि नियोजन व नेतृत्व गुण मला शिवाजी महाराजांच्या अनेक कथांमधून वाचायला मिळाले . रयतेच्या सुखासाठी धडपड करणारे, अन्यायाच्या विरोध नेहमी उभे राहणारे, संस्कारी पुत्र म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज अर्थात शिवबा.-रितिका यादव,अनुयोग विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज खूप धाडसी होते. मला त्यांच्या विषयी आदर वाटतो. शिवाजी महाराज्यांच्या सैन्यात सर्व धर्म-पंथ व  जातीच...

मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापनेच्या निधीसाठी मिरजेमध्ये बैठक

  सांगली/सुहेल सय्यद      महाराष्ट्रामध्ये मुस्लिम युनिव्हर्सिटी निर्माण हुमायून मुरसल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नेतून कोल्हापूर जिल्ह्यात हेरले गावी होत आहे. या युनिव्हर्सिटी निर्मितीच्या निधीसाठी ॲड अब्दुल जब्बार मुरसर, शाही ईदगाह जामा मस्जिद इतजाम कमिटीचे अध्यक्ष महबूबआली मनेर, यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजेतील मनेर कॉम्प्लेक्स मध्ये बैठक पार पडली.      यामध्ये मिरजे मधील विविध सामाजिक, राजकीय कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीतून, मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या निर्मितीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावावा, यासाठी मिरज भागातून निधी गोळा करून देण्यात येणार आहे.       यावेळी ॲड अब्दुल जब्बार मुरसल म्हणाले, मुस्लिम समाज हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आहे. जो पर्यंत मुस्लिम समाज हा शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होत नाही. तो पर्यंत त्याचा मागासलेपणा दूर होणार नाही. यासाठी मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापना होणे गरजेचे आहे.      महबूबआली मनेर म्हणाले, मुस्लिम समाजाची शैक्षणिक परिस्थिती सुधारण्...

भारतीय नौदलात मेगा भरती

पदाचे नाव आणि जागा : ट्रेड्समन मेट (INCET- TMM) ● ईस्टर्न नेव्हल - 710 ● वेस्टर्न नेव्हल - 324 ● साउथर्न नेव्हल - 125 शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI वयाची अट : 18 ते 25 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट) नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.   परीक्षा शुल्क : General/OBC- ₹205/- (SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही) अर्ज करण्याची मुदत : दि. 07 मार्च 2021 अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/ 

CISF मध्ये विविध पदांच्या 2000 जागांसाठी भरती

पदांचे नाव आणि जागा : 1) एसआय (एक्झिक.)/ SI (Exe.) I जागा - 63 2) एएसआय (एक्झिक.)/ ASI (Exe.) I जागा - 187 3) हेड कॉन्स्टेबल / जीडी/ Head Constable/GD I जागा - 424 4) कॉन्स्टेबल / जीडी/ Constable/GD I जागा- 1326 वय : 50 वर्षापर्यंत. परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही. पगार : 1) एसआय (एक्झिक.)/ SI (Exe.) - 40,000 2) एएसआय (एक्झिक.)/ ASI (Exe.) 35,000 3) हेड कॉन्स्टेबल / जीडी/ Head Constable/GD - 30,000 4) कॉन्स्टेबल / जीडी/ Constable/GD - 25,000 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत पात्रता : उमेदवार लष्करातून निवृत्त झालेले असावेत. अर्ज करण्याची मुदत : दि. 15 मार्च 2021 अधिकृत वेबसाईट :  www.cisf.gov.in

सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती

  सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती पदाची संख्या : ३० पदाचे नाव:  कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर) शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव   (iii) संगणक प्रमाणपत्र वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी कमाल २७ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सुट) आवेदनाची अंतिम तारीख: १३ मार्च २०२१ अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3djPEIH

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली

  नवी दिल्ली /16 फेब्रुवारी सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 809 व्या उरुसनिमित्त केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली. सहिष्णुता आणि सौहार्द्रता हा भारताचा डीएनए आहे आणि आपल्या देशाचा हा अभिमानास्पद वारसा कोणीही “बदनाम किंवा उध्वस्त” करू शकत नाही असे नक्वी यांनी सांगितले. यावेळी नक्वी यांनी पंतप्रधानांचा संदेश वाचला ज्यात त्यांनी वार्षिक उरुसाच्या निमित्ताने भारत व परदेशातील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना अभिवादन आणि शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 809 व्या उरुस निमित्त जगभरातील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना अभिवादन आणि शुभेच्छा. हा वार्षिक उत्सव हे सामाजिक ऐक्य आणि बंधुतेचे एक सुंदर उदाहरण आहे. विविध धर्म, पंथ आणि त्यांच्याशी संबंधीत श्रद्धा यांचे सुसंवादी सह-अस्तित्व हा आपल्या देशाचा एक भव्य वारसा आहे. या वारशाच्या जतन आणि संरक्षणात आपल्या देशातील विविध संत, पीर आण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून किनगाव टेम्पो दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त

मुंबई :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, पोलिस, मदत पथकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीआभार मानले आहेत. दुर्घटनेतील मृत बांधवांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जाहीर केले आहेत. अपघातातील जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत.

मॅजिकल व्हॅलेंटाईन

सध्या आजूबाजूला सर्व मॅजिकल आहे असे दिसत आहे. त्याच कारण ही खास आहे. फेब्रुवारी महिना सुरू आहे. फेब्रुवारी आणि प्रेम यांचं एक नातं आहे. या महिन्यात व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस असतो. हां यावेळी व्हॅलेंटाईन डे आतपर्यंत जसे होता त्याहून भिन्न असेल. सर्व जगासमोर कोरोनाचं संकट होत व अजूनही हे संकट पूर्ण संपलेलं नाही. या संकटातून हळू हळू सर्व जण सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, सर्व हळू हळू ठीक होत आहे आणि त्यात हा व्हॅलेंटाईन डे लोकांच्या जीवनात प्रेमाचा सुगंध पसरायला आला आहे. आता प्रेम म्हंटल तर आपोआप चेहऱ्यावर एक स्मितहास्य येत. एकमेकांवर प्रेम करणारे लोक व्हॅलेंटाईन डे ला एखादी भेटवस्तू देणे किंवा ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याला आवडेल ते किंवा त्याचा आठवणीत राहिल असं काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतात. आपले प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. म्हणूनच प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीला एका विशिष्ट व्याख्येत मांडणे चुकीचे ठरेल. आजच्या या धावत्या जगात जर पाहिले तर परिस्थिती वेगळी दिसते. आजच्या स्थितीला दोन बाबी आहेत. त्यापैकी पहिली ज्याला खरोखरच प्रेमाची जाणीव आहे आणि...

न्यायमूर्ती पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक

नवी दिल्ली -भारतीय संविधानाच्या कलम 224 (1) ने बहाल केलेल्या अधिकाराचा उपयोग करून राष्ट्रपतींनी  न्यायमूर्ती पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांची  13 फेब्रुवारी 2021 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना, कायदा आणि न्याय मंत्रालय, न्याय विभाग यांनी काल जारी केली आहे. न्यायमूर्ती पुष्पा विरेंद्र गनेडीवाला या 26.10.2007  रोजी जिल्हा न्यायाधीश म्हणून न्यायिक सेवेत रुजू झाल्या आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी महाराष्ट्र् न्यायिक अकादमी आणि भारतीय मध्यवर्ती केंद्र आणि प्रशिक्षण संस्था, उत्तन येथे  निबंधक (दक्षता) म्हणूनही काम पाहिले आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या महानिबंधक म्हणून देखील काम पाहिले आहे. 12.02.2019  पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते .

भारताच्या संसदेने संमत केलेल्या कायद्यांचे पालन ट्विटरला करावेच लागेल

    माहिती तंत्रज्ञान सचिव यांच्या ट्विटर टीम सोबत झालेल्या बैठकीबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी     दिल्ली- ट्विटरच्या विनंतीवरुन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी ट्विटरच्या जागतिक सार्वजनिक धोरणाच्या उपाध्यक्षा श्रीमती मोनीक मेशे, आणि ट्विटरच्या कायदेशीर विभागाचे उपाध्यक्ष आणि डेप्युटी जनरल कौन्सिल, जिम बेकर यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. शेतकरी हत्याकांड (‘farmer genocide’) याच्याशी संबंधित हॅशटॅग वापरून केलेले ट्विटस आणि असे ट्विटस करणारे अकाऊंट तसेच खलिस्तानी संघटनांविषयी सहानुभूती असणाऱ्या, पाकिस्तानचे समर्थन असलेल्या आणि  ट्विटरने स्वतःच प्रसिद्ध केलेला ब्लॉग, हे सगळे समाजमाध्यमांवरुन (ट्विटरवरून)काढले जावे, असे आदेश केंद्र सरकारने आज सकाळी जारी केले होते, त्या  पार्श्वभूमीवर ही बैठक  झाली. भारतात आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि  टीकेचाही सन्मान करतो, कारण तो आमच्या लोकशाहीचा तत्वाचा भाग आहे, असे सचिवांनी यावेळी ट्विटरच्या अधिकाऱ्यांना सांगितले. भ...

भारतीय नौदलाचा सर्वात मोठा वॉर गेम - थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाईझ (Tropex 21)

नवी दिल्‍ली- भारतीय नौदलाचा सर्वात मोठा वॉर गेम - द्विवार्षिक थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाईझ (Tropex 21) जानेवारीच्या सुरूवातीला सुरू झाला असून सध्या जहाजे, पाणबुडी, विमान तसेच भारतीय सैन्य, भारतीय हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या कार्यान्वित तुकड्यांच्या सहभागाने सुरू आहे.  फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यात या सरावाचा समारोप होईल. हिंद महासागर क्षेत्रात हा सराव आयोजित करण्यात आला असून सध्याच्या भौगोलिक धोरणात्मक संदर्भात जटिल  बहु-आयामी परिस्थितीत नौदलाच्या लढाऊ सज्जतेची चाचपणी करणे हा यामागचा उद्देश आहे. नौदलाच्या संरक्षण क्षमतांचे प्रमाणीकरण करणे, सागरी क्षेत्रातील राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करणे आणि हिंद महासागर प्रदेशात स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करणे हा देखील या ट्रोपेक्स सरावाचा उद्देश आहे. भारतीय नौदलाचे तीनही कमांड आणि पोर्ट ब्लेअर येथील ट्राय सर्व्हिसेस कमांडच्या सहभागाने नौदल मुख्यालयांकडून ट्रोपेक्सचे संचलन केले जात आहे. ट्रॉपेक्स विविध टप्प्यांतून जात असून शांतता काळापासून युद्धापर्यत नौदलाच्या स्थित्यंतराची देखील चाचणी केली जाते. पहिल्या टप्प्यात, भारत...

शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या

 शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या -पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रशासनाला सूचना: फेरफार नोंदी निर्गतीकरणाबाबत केले कौतुक  सोलापूर: फेरफार नोंदी निर्गतीकरण अभियानाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.    माढा तालुक्यातील मोडनिंब येथे महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.  पालकमंत्री भरणे म्हणाले, फेरफार नोंदी शेतकऱ्यांच्या बाबतीत फार महत्त्वाचे असतात. कोरोनाच्या कालावधीत फेरफार नोंदीच्या कामाकडे लक्ष देता आले नव्हते. पण आता महसूल प्रशासनाने अभियान राबवून गेल्या दहा दिवसांत सुमारे साडे अकरा हजार नोंदी ...

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (असिस्टंट कमांडंट) लेखी परीक्षा 2020 चा निकाल

दिल्ली-20 डिसेंबर 2020 रोजीच्या लेखी परीक्षेत पात्र घोषित झालेल्या उमेदवारांनी तपशीलवार अर्ज (डीएएफ) ऑनलाईन भरण्यापूर्वी संकेतस्थळाच्या संबंधित पृष्ठावर पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करण्यासह त्यांची पात्रता, आरक्षणाचा दावा इत्यादी तपशिलासह आयोगाच्या  http://www.upsc.gov.in   या संकेतस्थळावर स्वत: ची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन तपशीलवार अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावर 12.02.2021 पासून 25.02.2021 च्या संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. तपशीलवार अर्ज भरण्यासाठी आणि तो आयोगाला ऑनलाईन सादर करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण सूचनाही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ज्या उमेदवारांनी आपले तपशीलवार अर्ज (डीएएफ) सादर केले आहेत त्यांना नोडल प्राधिकरणाद्वारे कॉल लेटर पाठविले जाईल अर्थात पीएसटी/पीईटी/एमएसटीला हजर राहण्यासाठी आयटीबीपी. उमेदवारांना पीएसटी/पीईटी/एमएसटी येथे हजर राहण्यासाठी नियुक्त केलेल्या केंद्रांवर कॉल लेटर सोबत आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यासारखे फोटो ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. पत्राद्वारे किंवा फॅक्सद्वारे संपर्क सुलभ करण्यासाठी ...

क्रीडा कोट्यातून दिल्या जाणाऱ्या केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी सरकारने 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश केला : किरण रिजीजू

दिल्ली- भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच मंत्रालयांमध्ये ‘क’ गटातील कोणत्याही पदावर नेमणुकीसाठी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या क्रीडा प्रकारांच्या यादीत सरकारने आता “मल्लखांब” आणि “सेपाक टकराव” यांसह एकूण 21 नव्या क्रीडाप्रकारांचा समावेश केला आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी आज लिखित उत्तराद्वारे राज्यसभेत ही माहिती दिली. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या क्रीडाप्रकारांचा तपशील खाली दिला आहे:    

रेल्वेत जॉब करण्याची संधी

  मध्य रेल्वे अप्रेंटीस म्हणून 2500+ उमेदवारांची भरती करणार आहे.  मालगाडी दुरूस्ती विभाग, कल्याण डिझेल शेड, परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉपमध्ये काम करण्याची संधी मिळेल. ठिकाण : मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://rrccr.com 

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी , लगेच करा अर्ज

  पदाची सविस्तर माहिती –  पदाचे नाव : राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (NYV) पदसंख्या : 13206 जागा पात्रता : 10 वी पास वयाची अट : 18 ते 29 वर्षे. वेतन : 5000 रुपये शुल्क : शुल्क नाही. नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 20 फेब्रुवारी 2021 वड प्रक्रिया : मुलाखत मुलाखतीची तारीख : 25 फेब्रुवारी ते 8 मार्च 2021 अधिकृत वेबसाईट :  https://nyks.nic.in/nycapp/main.asp

नेहरू युवा केंद्र, साताराच्या वतीने समाज प्रबोधनपर,जनजागृती पथनाट्य

  सातारा -नेहरू युवा केंद्र, सातारा (युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार), महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई,  यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कोरेगाव येथे, जिल्ह्याचे युवा अधिकारी गोपी त्तिरी व लेखाधिकारी भानुदास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  समाज प्रबोधनपर,जनजागृती पथनाट्य घेण्यात आला, यावेळी कोरेगांव पंचायत समिती सभापती श्री राजाभाऊ जगदाळे साहेब, स्वयंम फाउंडेशन चे प्रतिनिधी, मा.अमर लोखंडे सर कुमटे गावातील नागरिक उपस्थित होते.  तसेच कोरेगांव तालुक्यातील बाजारपेठ साठी प्रसिद्ध असलेली वाठर किरोल येथे ग्रामपंचायत परिसर मधे बाजाराचे अवचीत्या साधून हा पथनाट्य घेण्यात आला, पथनाट्य पाहण्यासाठी बाजार पेठेत आसपासच्या गावातील अनेक नागरिक जमले होते, त्याचबरोरीने हा पथनाट्य , जळगांव, आर्वी, शिरढोण, आणि सातारा जिल्हा मध्ये, अनेक ठिकाणी घेण्यात येणार आहे,असे नेहरू युवा केंद्रचे प्रतिनिधी रमेश पुजारी यांनी सांगितली. आणि हा पथनाट्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विक्रम बर्गे यांनी परिश्रम घेतले.

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात नरेंद्र मोदी सरकार राज्यातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून एनडीआरएफच्या तुकडीला मार्गदर्शन केले या आपत्तीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्राथमिक तत्त्वावर आवश्यक ती मदत केली जाईल नवी दिल्ली - उत्तराखंड येथील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या या काळात राज्याबरोबर नरेंद्र मोदी सरकार खांद्याला खांदा लावून उभे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात पत्रकारांशी बोलताना अमित शाह म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ते म्हणाले की, अन्य तुकड्या देखील उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. लवकरच बाकीच्या तुकड्या देखील तेथे दाखल होतील. आयटीबीपीचे जवान देखील घटनास्थळी पोहोचले आहेत, बरोबरच राज्यातील यंत्रणा देखील कार्यान्वित झाल्या आहेत, असे अमित शाह म्हणाले. अमित शाह म्हणाले की, जोशीमठाच्या जवळ हिमकडा आणि डोंगरकडा नदीमध्ये कोसळल्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप वाढला आह...

शेतरस्त्याच्या अडचणीसाठी शेतकरी करतायत शिवार फाउंडेशनला फोन

  शेत रस्त्याच्या अडचणीचे शिवारकडे धडकले २८८ फोन ,  मागील दोन महिन्यात तक्रारींचा पाऊस   उस्मानाबाद:-जिल्ह्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवार हेल्पलाइन सुरू करण्यात आली. मागील ०६ वर्षातील शिवार संसदच्या अभ्यासातून वेळोवेळी शेत रस्ताचा प्रश्र्न आणि शेतकऱ्याचे मानसिक आरोग्य, त्रस्त शेतकरी समोर आला आहे.  अशातच, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अतिक्रमण मुक्त शेतरस्ते अभियान हाती घेतले. या अभियानामध्ये शिवार हेल्पलाइनने समन्वयाची भूमिका घेऊन प्रश्न समजावून गावनिहाय, तालुकानिहाय संबंधित अधिकारी, कर्मचारीशी चर्चा करून संबंधित शेतकरयांना योग्य ते मार्गदर्शन केले. अतिक्रमणमुक्त शेतरस्ते अभियान सुरू होण्या अगोदर शेत रस्त्याच्या अडचणी विषयी शिवार हेल्पलाईनवर  ०६ फोन आले होते. अभियान सुरू झाल्यावर शेत रस्त्याच्या अडचणी असतील तर, " शिवार हेल्पलाईन ला संपर्क करा " असे आवाहन शिवार फाऊंडेशनकडून करण्यात आले. या आवाहनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. २८८ शेतकऱ्यांनी हेल्पलाइनला फोन करून शेत रस्त्याच्या व्यथा मांडल्या व अजून दररोज शेत...

श्रीपतपिंपरी फाट्‍यावर किसान सभेच्या वतीने रस्ता रोको

   बार्शी /प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान सभा बार्शी तालुका कौन्सिलच्या वतीने तिन काळे कृषी कायदे रद्द करा, त्यासोबतच शेतकर्‍यांवर होत असलेली दडपशाही थांबली पाहिजे या मुख्य मागण्यासह इतर मागण्या घेऊन आज दिनांक 6 फेब्रुवारी 2021 वार शनिवार रोजी कुर्डवाडी रत्यावरील श्रीपतपिंपरी फाटायेथे रस्ता रोको करण्यात आला.  हा रस्तारोको काॅम्रेड तानाजी ठोंबरे व काॅम्रेड लक्ष्मण घाडगे  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.  यावेळी कॉमेड तानाजी ठोंबरे म्हणाले, "लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांचा लढा पुढे जाईल व मोदी भाजप आणि आरएसएस ला वठणीवर आनूूनच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यास भाग पाडेल."  यावेळी कॉम्रेड लक्ष्मण घाडगे यांचेही भाषणे झाले. यावेळी अंदोलनाचे पोलीस अधिकारी सुर्यवंषी यांनी निवेदण स्वीकारले व रस्तारोक थांबवण्यात आला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे कॉम्रेड तानाजी ठोंबरे, काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, पैगंबर मुलाणी, काॅम्रेड बाळासाहेब जगदाळे, बाळराजे पाटील, शाहूराज घाडगे, धनाजी पिंगळे, सुभाष पिंगळे, तानाजी काकडे, पोपट घाडगे, अनिल कोळी, शिवाजी घाडगे, शिवाजी काकडे, प्रकाश ता...

512 आर्मी बेस वर्कशॉप मध्ये भरती

पद : 1) Trade Apprentice - 322 जागा शैक्षणिक पात्रता - ITI PASS वय - किमान वय 14 वर्षे. वेतन - 8020 रुपये ते 10312 रुपये 2) Graduate / Diploma Technician - 3 जागा पात्रता - diploma ( Electrical, Electronic, Mechanical) वयाची अट : किमान वय 14 वर्षे. वेतन : 9000 रुपये नोकरी ठिकाण : पुणे अर्ज पद्धती : ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत :  दि.28 फेब्रुवारी 2021  अधिकृत वेबसाईट: www.indianarmy.nic.in अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Comdt & MD. 512 Army Base Workshop, Khadki / Kirkee, Pune - 411 003 

चौरी चौरातील शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाहीः पंतप्रधान

नवी दिल्ली / 4 फेब्रुवारी -इतिहासाच्या पानांमध्ये चौरी चौराच्या शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाही अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  व्यक्त केली. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधल्या चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ठळकपणे माहीत नसलेल्या शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा देशासमोर आणण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.  स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देश प्रवेश करत असताना  हे  अधिक उचित ठरेल, असे त्यांनी सांगितले.  चौरी चौराच्या शहिदांची गाथा जशी गायला पाहिजे तशी ती गायली जात नाही, हे दुःखद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. चौरी चौरा हा सामान्य लोकांचा स्व-प्रेरित संघर्ष होता. या संघर्षातील क्रांतिकारकांना इतिहासाच्या पानांमध्ये ठळक महत्त्व दिले गेले नसले तरी या राष्ट्राच्या मातीमध्ये त्यांचे रक्त एकरूप झाले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यलढ्यात एकाच घटनेसाठी 19 स्वातंत्र्यसैनिकांना फाशी दिले जाण्याची घटना दुर्मिळ आहे, असे ते म्हणाले....

ब्रेकिंग! काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई - काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे.  राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.