बार्शी - राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायच्या सरपंच पदी जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंच पदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दिनांक 26:2.2021 रोजी. बार्शी तालुक्यातील सरपंच उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या पिंपळवाडी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अटी तटीची लढत झाली. यामधे माजी मंत्री. मा. दिलीप. सोपल साहेब प्रणित अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीचे 7पैकी 5उमेदवार बहुमताने विजयी झाले पिंपळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी जयश्री रमेश चौधरी यांचा तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन बाळनाथ चौधरी यांचा एक एक अर्ज दाखल झाला होता.सरपंच पदाला जयश्री चौधरी यांना पूजा पांडुरंग चौधरी सूचक तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन आप्पा यांना आजमुद्धीन मुलांनी हे सूचक राहिले या वेळी नवनिर्वाचित सदस्यामध्य आजमोदीन मुलाणी रेश्मा संदीप चौधरी पूजा पांडुरंग चौधरी रोहित. अनिल चौधरी हे उपस्थित होते या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे आर. कोळी विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी ग्रामसेवक के. व्ही सुरुसे यांनी काम पहिले सदर निवड प्रक्रिया बिन विरोध करण्यासाठी रमेश तात्या चौधरी जेष्ठ नेते राजेंद्र दादा. चौधरी अंबादास सावकार अनुबा अण्णा दत्तापाटील गोवर्धन माने परसराम पाटील पाटिलराव तात्या लिंबाजी ओव्हाळ मधुकर माने भाऊसाहेब चौधरी राजकुमार चौधरी बुबासाहेब डांगे आण्याबा डांगे लक्ष्मण डांगे दिगंबर चौधरी मधू अण्णा महिवाल मुलाणी शिवाजी दादा बबन जीवनराव चौधरी विलास प्रभू चौधरी यांची भूमिका महत्वाची ठरली अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडी चे उमेदवार बहुमताने विजयी झाल्यामुळे ग्रामपंचायत समोर आनंद साजरा केला.
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

Comments
Post a Comment