Skip to main content

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली

 


नवी दिल्ली /16 फेब्रुवारी


सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 809 व्या उरुसनिमित्त केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली. सहिष्णुता आणि सौहार्द्रता हा भारताचा डीएनए आहे आणि आपल्या देशाचा हा अभिमानास्पद वारसा कोणीही “बदनाम किंवा उध्वस्त” करू शकत नाही असे नक्वी यांनी सांगितले.

यावेळी नक्वी यांनी पंतप्रधानांचा संदेश वाचला ज्यात त्यांनी वार्षिक उरुसाच्या निमित्ताने भारत व परदेशातील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना अभिवादन आणि शुभेच्छा दिल्या.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 809 व्या उरुस निमित्त जगभरातील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना अभिवादन आणि शुभेच्छा. हा वार्षिक उत्सव हे सामाजिक ऐक्य आणि बंधुतेचे एक सुंदर उदाहरण आहे. विविध धर्म, पंथ आणि त्यांच्याशी संबंधीत श्रद्धा यांचे सुसंवादी सह-अस्तित्व हा आपल्या देशाचा एक भव्य वारसा आहे. या वारशाच्या जतन आणि संरक्षणात आपल्या देशातील विविध संत, पीर आणि फकीर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या शांतता आणि सलोख्याच्या संदेशामुळे आपला सामाजिक-सांस्कृतिक वारसा नेहमीच समृद्ध झाला आहे.”

पंतप्रधानांनी आपल्या संदेशामध्ये असे म्हटले आहे की, “सुफी विचारांनी समाजात अमिट छाप उमटवणारे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे आपल्या महान आध्यात्मिक परंपरेचे आदर्श प्रतीक आहेत. प्रेम, ऐक्य, सेवा आणि सौहार्द यांना प्रोत्साहन देणाऱ्या गरीब नवाजची मूल्ये आणि मते मानवतेसाठी नेहमी प्रेरणा देतील. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या वार्षिक उरुसानिमित्त मी अजमेर शरीफ दर्गा येथे “चादर” सुपूर्द करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करतो आणि देशाच्या सुख, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.


गरीब नवाज यांचे जीवन आपल्याला जातीय आणि सामाजिक समरसतेची वचनबद्धता दृढ करण्यासाठी प्रेरणा देते. हे ऐक्य समाजात फूट आणि संघर्ष निर्माण करण्याच्या कटात गुंतलेल्या शक्तींना नेस्तनाबूत करू शकते. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा संदेश “जगभरातील शांततेसाठी प्रभावी बांधिलकी” आहे असे नक्वी यावेळी म्हणाले.


नक्वी यांच्या हस्ते दर्गा परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या 88 शौचालयांचे उद्घाटनही करण्यात आले ज्यामुळे भक्त आणि यात्रेकरू विशेषत: महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. 500 महिला यात्रेकरूंसाठी निवास व्यवस्था असणाऱ्या “रेन बसेरा” चे उद्घाटन त्यांनी केले. दर्गा आवारात पहिल्यांदाच या सुविधा बांधण्यात आल्या आहेत.


नक्वी यांच्या हस्ते दर्ग्याच्या गेट क्रमांक 5 चे उद्‌घाटन झाले आणि त्यांनी दर्गा परिसरातील गेस्ट हाऊसच्या चौथ्या मजल्याचे उद्‌घाटनही केले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...