Skip to main content

छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती वडाची झाडे लावून साजरी करण्यात

 


सांगोला - आज वाणीचिंचाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीच्या निमित्ताने गावातील युवकांनी 5 वडाची झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

     सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन गावातील मान्यवरांच्या हस्ते व मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता सामाजिक उपक्रम राबविण्यात येण्याचे ठरवले यानुसार गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात,महादेव मंदिर परीसर व प्रगती विदयालय या परीसरात हि वडाची झाडे लावून त्याची जबाबदारी अनिरुद्ध पाटील, रोहीत पवार, दादा काशीद ,यांच्या कडे महादेव मंदिराच्या परीसरातील झाडांचे संगोपन करणे.तसेच प्राथमिक शाळेच्या आवारातील बापुद्दीन शेख,नवनाथ गायकवाड, अमीत सावंजी,अभिजीत गायकवाड, सुरेश झाडबुके, अक्षय पवार यांच्या कडे देण्यात आली. तर प्रगती विदयालय परीसरातील झाडाचे संगोपन सचिन गायकवाड, कैलास गडहिरे, अक्षय वाळके,जालींदर पवार, विनोद निळे ,संभाजी केंगार यांच्या कडे देण्यात आले.

    या माध्यमातून फक्त खड्डा तोच  फक्त झाड व मान्यवर बदल न होता हे लावलेली झाड जगविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत.तसेच सध्या पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे म्हणून या युवकांनी आखलेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. तसेच गावात यापुढे प्रत्येक महापुरुषांच्या जंयतीच्या निमित्ताने 5 देशी झाडे लावण्यात येणार आहेत.

      यावेळी गावातील अशोक गंगाधरे, संपत शिंदे, देठे, विनोद गडहिरे, अमोल पवार, बंडू लांडगे, अनिल खरात,जगन्नाथ करडे,राजेंद्र पवार, गायकवाड, नामदेव घुणे,जितेंद्र गडहिरे, संभाजी केंगार,समाधान झाडबुके,सचिन सोपे, अमोल गडहिरे, सुकदेव जावीर,दगडु जाधव,प्रफुल्ल गडहिरे, अनिरुद्ध पाटील, सचिन गायकवाड, अभिजित गायकवाड, अमोल पवार, महादेव सुरवसे,यांच्यासह गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...