Skip to main content

शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या



 शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या -पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रशासनाला सूचना: फेरफार नोंदी निर्गतीकरणाबाबत केले कौतुक


 सोलापूर: फेरफार नोंदी निर्गतीकरण अभियानाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.   

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री भरणे म्हणाले, फेरफार नोंदी शेतकऱ्यांच्या बाबतीत फार महत्त्वाचे असतात. कोरोनाच्या कालावधीत फेरफार नोंदीच्या कामाकडे लक्ष देता आले नव्हते. पण आता महसूल प्रशासनाने अभियान राबवून गेल्या दहा दिवसांत सुमारे साडे अकरा हजार नोंदी निकालात काढल्या आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र महसूल प्रशासनाने आता यापुढे फेरफार नोंदीबाबत पुढाकार घेऊन कामकाज करावे. शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये अशा पद्धतीने काम करावे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी शेतरस्ते नाहीत. याबाबत तहसीलदारस्तरावर विशेष मोहीम राबवून शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी मोहीम राबवावी.

कोविड लसीकरणात सर्व शासकीय कर्मचारी यांनी सहभागी व्हावे. सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण करुन घ्यावे. त्याचबरोबर नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्यात, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.


आमदार श्री. शिंदे यांनी महसूल विभागाने फेरफार अदालत घेऊन नोंदी निर्गत केल्या आहेत. पण अदालत प्रलंबित राहू नयेत यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.


 आमदार श्री.राऊत यांनी वारस नोंदी, मयत नोंदी, वाटप नोंदी सुलभ व्हायला हव्यात. न्यायालयातील आदेशाच्या नोंदी लवकर लागाव्यात, यासाठी प्रयत्न करायला हवे, असे सांगितले.

यावेळी परीविक्षाधीन प्रशासकीय अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, ज्योती कदम, उदयसिंह भोसले, दीपक शिंदे, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, तहसीलदार समीर माने, राजेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. जाधव यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी श्रीमती कदम यांनी मानले.


        पशुसंवर्धन विभागाच्या मोबाईल डिस्पेन्सरीचे अनावरण 

यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजनेतून सुरु करण्यात आलेल्या मोबाईल तपासणी दवाखान्याचे उदघाटन करण्यात आले. पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फेरफार नोंदीचे दाखले वितरण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...