Skip to main content

एलआयसी कडून बिमा ज्योती ही नवी योजना जारी


सिंगल प्रीमियम वाढीमध्ये गोवा एलआयसी ठरले देशात अव्वल





ए. बी . एस न्युज नेटवर्क-

एलआयसी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने  बचत आणि सुरक्षा कवच असा दुहेरी लाभ देणारी बिमा ज्योती ही योजना बाजारात आणली आहे. भांडवली बाजाराशी जोडलेली नसलेली ही नॉन लिंक, नॉन पार्टीसिपेटिंग, वैयक्तिक, बचत योजना आहे.  या योजनेअंतर्गत मुदत समाप्तीनंतर एक रकमी रक्कम आणि पॉलीसीच्या मुदत कालावधीत धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना वित्तीय पाठबळही देऊ करते. एजंटमार्फत  किंवा इतर मध्यस्थांमार्फत ही योजना ऑफ लाईन घेता येईल तसेच www.licindia.in या संकेत स्थळाद्वारे थेट घेता येईल.


पॉलीसीच्या मुदत कालावधीपर्यंत प्रत्येक वर्षाच्या अखेरीला, हजार रुपयामागे 50 रुपये या दराने निश्चित हमीने रक्कमेत भर घातली जाईल. 


जोखीम सुरु झाल्याच्या तारखेनंतर पॉलीसीच्या मुदत कालावधीत पॉलीसीधारकाचा मृत्यू झाल्यास,’सम अश्यूअर ऑन डेथ’आणि पॉलीसीच्या अटीनुसार हमीने भर घालण्यात आलेली जमा रक्कम देय आहे.  पॉलीसीची मुदत संपण्याच्या  तारखेला जीवित पॉलीसीधारकाला परिपक्वतेच्या वेळी प्रदान करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली रक्कम आणि  हमीने भर घालण्यात आलेली जमा रक्कम देय आहे. विशिष्ट अटींच्या अधीन, मृत्यू/मुदत समाप्ती संदर्भातले लाभ हप्त्याने घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. 


या  पॉलीसीसाठी किमान ‘सम अश्यूअर’ 1,00,000/- रुपये असून कमाल मर्यादा नाही. 15 किंवा 20 वर्षाच्या मुदतीची पॉलीसी घेता येणार असून प्रीमियम देण्याची मुदत पॉलीसीचा कालावधी वजा पाच वर्षे राहील. वयाची मर्यादा किमान 90 दिवस पूर्ण आणि कमाल 60 वर्षे आहे. हप्ता वार्षिक, अर्ध वार्षिक, त्रैमासिक आणि मासिक ( मासिक हप्ता केवळ एनएसीएच मार्फत) किंवा वेतनातून कापून दिला जाऊ शकतो. कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.


घटत्या व्याज दराच्या सध्याच्या पार्श्वभूमीवर जोखीम कवचासह रकमेत हमीने निश्चीत घालण्यात येणारी निश्चित  भर  हे एलआयसीच्या बिमा ज्योतीचे आगळे  वैशिष्ट्य आहे.


सिंगल प्रीमियम वाढीमध्ये गोवा एलआयसी विभाग देशात अव्वल ठरला असून सिंगल प्रीमियम आणि प्रथम वर्ष प्रीमियम इनकम बजेट( एफवायपीआय) आधीच पूण केले आहे. ग्राहकांच्या समाधान पूर्तीसाठी गोवा एलआयसी कटीबद्ध आहे.


Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...