Skip to main content

शकिल मुलाणी यांची भाजपच्या बार्शी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी निवड



प्रतिनिधी/अब्दुल शेख -:बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत व जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते शकिल मुलाणी यांची भाजपच्या बार्शी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुलाणी यांची पक्षावर असलेली निष्ठा आणि काम करण्याची चिकाटी यामुळेच त्यांची निवड केली असल्याचे सांगितले.तसेच जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनीही मुलाणी यांनी भाजप पक्षाचे सर्वसमावेशक धोरण अल्पसंख्यांक समाजामध्ये राबवून पक्षाला बळकटी देण्याचे काम करावे असे सांगितले.शकिल मुलाणी यांनी समाजसेवेबरोबर आ.राजेंद्र राऊत यांचे निस्वार्थी कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केली आहे.त्यांनी २०१२ साली मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष तर २०१५ साली मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे.त्याबरोबरच उडाण फाऊंडेशन या सामाजिक संघटनेतही ते कार्याध्यक्ष म्हणून काम पहात आहेत.त्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात भाग घेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना १ महिन्यांचे मोफत पास दिल्याचेही मुलाणी यांनी यावेळी सांगितले.तसेच तुळजापूर येथे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठीही अन्नदानाचे काम केल्याचे सांगितले.त्यामुळे मुलाणी यांना सामाजिक क्षेत्राबरोबर आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते.त्यांच्या निवडीचे सर्व स्थरातून स्वागत केले आहे.यावेळी नगरसेवक विजय राऊत,सभापती अनिल डिसले,शहराध्यक्ष महावीर कदम,तालुकाध्यक्ष मदन दराडे,वैरागचे संतोष निंबाळकर,बाबासाहेब काटे,प्रमोद वाघमोडे,उपसभापती अविनाश मांजरे,केशव घोगरे,ऍड.राजश्री डमरे-तलवाड,काका काटे,अजित बारंगुळे,किशोर शिंदे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...