Skip to main content

शिक्षक आमदार पद हे शोभेचे किंवा मिरवण्याचे नसून ते जबाबदारीचे पद आहे - प्रा. डॉ.सुभाष जाधव


 


आज  शिक्षणव्यवस्थेत अनेक प्रश्न आपल्या सर्वांना भेडसावत आहेत . नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातुन शिक्षक विद्यार्थी-पालक शिक्षकेतर कर्मचारी व गावोगावी समाजाच्या तळागाळात निष्ठेने व सेवावृतीने काम करणार्‍या संस्थासमोर अनेक समस्या निर्माण होणार आहेत. विशेषत: दलित आदिवासी, ओबीसी, बहुजन आणि  गरीब मुलामुलींच्या ,विशेषत: मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अनेक जटिल अडथळे निर्माण होणार आहेत . केंद्र सरकार शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र खाजगीकरण, कंपनीकरण व बाजरीकरणाच्या दावणीला बांधत असल्याने शिक्षणाच्या संधी आक्रसत जाणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवा-शाश्वती; वेतनश्रेणी व सामाजिक सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. शासन शिक्षण संस्थेचा आधार काढून घेत त्यांना अस्थिरतेच्या  गर्तेत ढकलत आहे. सरकारचा शिक्षणाबद्दलचा आणी शिक्षणावरील खर्चा संबंधी बदलेला दृष्टीकोण हे यामागील खरे कारण आहे .आजच्या या आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांचा प्रतिनिधी विचारपूर्वक निवडण्याची गरज असल्याने आपण मला विधानपरिषदेवर पाठवून आपले प्रश्न मांडण्याची व सोडवण्याची एक संधी द्यावी-प्रा. डॉ.सुभाष जाधव .


                                               

बार्शी /अब्दुल शेख- सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहचला आहे. सर्वच उमेदवार आपल्यापरीने मतदारांपर्यंत पोहचत आहेत.याचाच एक भाग म्हणून प्रा. डॉ.सुभाष जाधव हे सोलापूर दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील विविध महाविद्यालयांना भेट देवून शिक्षकांसोबत संवाद साधला.  त्यांनी शिक्षकांना मतदान करण्याचे आवाहान केले. यावेळी सर्व शिक्षकांनी आम्ही तुमच्यासोबतच आहोत असा निर्धार व्यक्त केला. बार्शी भेटी दरम्यान  प्रा.एस.एस.जाधव यांच्या निवासस्थानी प्रचारा संदर्भात बैठक पार पडली . यावेळी प्रा.संतोष जटीथोर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धाप्पा कलशेट्टी,डी.वाय. एफ.आय चे दत्ता चव्हाण तसेच शिक्षक उपस्थित होते . यावेळी बोलताना दत्ता चव्हाण म्हणाले की, प्रा. डॉ.सुभाष जाधव हे एम.ए अर्थशास्त्र , एम.फील, पी.एच.डी व सेट नेट उत्तीर्ण असेलेले उच्चशिक्षित उमेदवार आहेत. त्यांनी एकूण ३२ वर्ष ज्ञानदानाचे काम केले आहे. त्यांचे शैक्षणिक कार्य व शैक्षणिक चळवळीचे कार्य करत असताना त्यांना अनेक वेळा अटक झालेली आहे . त्यांना येरवडा तुरुंगात ५ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला आहे , तसेच त्यांचे कामगार चळवळतील कार्य उल्लेखनीय आहे अशा उमेदवारला आपण आपला प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर पाठवावा.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...