Skip to main content

लग्नासाठी मुलगी देता का ? का शिधापत्रिका देता ?



प्रतींनिधी/जयकुमार सोनकांबळे - दिनांक 26 /11 /2020 रोजी पाटोदा जि. बीड तहसील कार्यालया समोर लग्ना साठी मुलगी देण्यात यावी, साठी आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले,

गोरगरीब वंचित समूहातील लोकांची या तहसील कार्यालयाकडून फसवणूक केली जात आहे, असेच पाटोदा तालुक्यातील गरीब कुटुंबातील अमित आगे हा विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याला शैक्षणिक कामासाठी शीधापत्रिकेची गरज पडली आणि त्याने तहसील कार्यालयाकडे दिनांक 29 /9 /2020 रोजी शिधापत्रिका मिळण्यासाठी विनंती अर्ज केला परंतु संबंधित कार्यालयाने त्यांना पत्र देऊन सांगितले की एका व्यक्तीच्या नावाने शिधापत्रिका देण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे व एक व्यक्तीही कुटुंबाच्या व्याख्येत बसत नाही. असे लेखी पत्र देऊन त्यांना शिधापत्रिका देण्याचे नाकारून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला होता,

त्यामुळे अमित आगे यांनी तहसील कार्यालयात पत्र देऊन एका व्यक्तीस शिधापत्रिका देता येत नाही असे कोणत्या कायद्यामध्ये आहे, अशी विचारणा केली असता तहसील कार्यालयाने या पत्रास कोणतेही उत्तर दिले नाही.म्हणून अमित आगे यांना एक सुंदर मुलगी लग्नासाठी पाहून तहसील कार्यालयाने माझा विवाह करून द्यावा. त्यामुळे तुमच्या कार्यालयाच्या व्याख्येत मी बसेन व मला शिधापत्रिका मिळून मी स्वतः धान्य दुकानातील माल घेण्यास पात्र ठरेल.

       तहसील कार्यालयाने लग्नासाठी एक सुंदर मुलगी पाहून विवाह लावून देण्यासाठी आज दिनांक 26/ 11/ 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता शिवाजी चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत नवरदेव घोड्यावरती बसून वाजत-गाजत परण्या काढण्यात आला व तहसील कार्यालयाच्या समोर शिधापत्रिकेसाठी आंदोलन करण्यात आले.


 

वंचित बहुजन आघाडी ने पुकारलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव,आष्टी पंचायत समितीचे सदस्य मा. यशवंत भाऊ खंडागळे,व वंचित बहुजन आघाडीचे पाटोदा तालुका अध्यक्ष गोरख झेंड साहेब यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते,

        या आंदोलनाच्या वेळी बोलताना अॅड.डॉ. अरुण जाधव म्हणाले की मराठवाडा ही अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा शिधापत्रिकेसाठी या पाटोदा तहसील कार्यालयासमोर नवरदेव घेऊन एक आगळ्या- वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येत आहे, प्रशासनाकडे या गरजू विद्यार्थ्यांने शैक्षणिक कामासाठी फक्त शिधापत्रिका मागितली होती आणि तो अधिकार त्याला संविधानाने  दिला आहे,आणि तो अधिकार प्रशासनाला  नाकारता येणार नाही,

              तालुक्यांमध्ये याअगोदर चार ते पाच शिधापत्रिका एक व्यक्ती असणाऱ्यांना देण्यात आले आहे, त्याचा पुरावा आमच्याकडे आहे मग  अमितला का शिधापत्रिका देता येत नाही.तुम्ही भ्रष्टाचारी अधिकारी आहात, आणि आमचे हे आंदोलन कार्यालयासमोर आल्यानंतर एका तासामध्ये शिधापत्रिका देण्यात आली असा काय कायद्यात बदल तुम्ही केला,   तालुक्यातील अनेक लोकांच्या शिधापत्रिकांच्या अडचणी आहेत यापुढे एकाही व्यक्तीची तक्रार आली नाही पाहिजे, नाहीतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी.

यावेळी नवरदेव परण्या घोड्यावरती वाजत गाजत आला असताना तहसील कार्यालय परिसर दणाणून गेले होते.या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सचिन मेघडंबर, रमेश वारभुवन, खंडू यादव, सुभाष सोनवणे, वैजीनाथ केसकर, आबा पौळ, राहुल शिरोळे, सुनील जावळे, वसंत काळे, मामा नाईकवाडी,महादेव आगे, उमेश शिरसागर, सुनील शंकरराव जावळे,नितीन धनवटे आदींनी परिश्रम घेतले. 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...