Skip to main content

मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल.मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश.




तालुक्यातील 23 ग्रामपंचायत साठी शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल

मंगळवेढा/अमीर आत्तार  -मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या 223 जागेसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 910 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान तेवीस ग्रामपंचायत पैकी मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले असून ही ग्रामपंचायत सलग सहा वेळा बिनविरोध काढण्यात ग्रामस्थांनी परंपरा कायम ठेवली आहे.

तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून बुधवार दिनांक 30 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपत असल्याने तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते सुरुवातीला उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते मात्र वाढती उमेदवारांची संख्या व नेटवर्क प्रॉब्लेम मुळे 

निवडणूक आयोगाने आपला उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी दिल्याने शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत रांगेत असलेल्या उमेदवाराचे अर्ज करण्यात येत असल्याचे चित्र होते.

ग्रामपंचायत ग मी आहे उमेदार ही संख्या पुढीलप्रमाणे हुलजंती 71. मरवडे 74. बोराळे 74 . भोसे 60. कचरेवाडी 38. माचनुर 36. तमदर्डी 24. बालाजीनगर 31. तांडोर 29 सिद्धापूर 51. कात्राळ कर्जाल 21. ममदाबाद शेटफळ 19. मल्लेवाडी 19 नंदेश्वर 67 लेंडवेचिंचाळे 42. अरळी 39. सलगर बुद्रुक 49. माचनुर 36. मुढवी 9. घर्निकी18. कचरेवाडी 38 असबेवाडी 29. गणेश वाडी 37 डोणाज 42 लवंगी 31. असे 909 उमेदवारांनी 223 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

तेवीस ग्रामपंचायत मधील 82 प्रभागांमध्ये ही निवडणूक होत आहे तरी 31 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी दुपारी तीन वाजेपर्यंत होत असून दिनांक 4 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.दरम्यान तालुक्‍यातील तेवीस ग्रामपंचायतींपैकी केवळ मुढवी गावाला बिनविरोध करण्यात यश आले आहे

या ग्रामपंचायतीने तालुक्यामध्ये बिनविरोध करून एक वेगळा आदर्श निर्माण केल करून दिला आहे.

विनोद प्रक्रिया पार पाडण्यासाठी तानाजी खरात या गटाला यश आले असून ग्रामपंचायतीने सलग सहा वेळा आतापर्यंत बिनविरोध होऊन तालुक्यात राजकीय क्षेत्रात रेकॉर्ड मोडले आहे सर्वाधिक उमेदवारी अर्ज व बोराळे त्याच्या खालोखाल हुलजंती . हे तिन्ही गावे राजकीय दृष्ट्या सक्षम म्हणून ओळखली जाते 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे तिला समजल की ती स्वतःच त्यातून बाहेर पडेल

                                                                                             आज जागतिक मासिक पाळी दिन... सकाळी सकाळीच घरातीलच एक किस्सा आठवला. सध्या लॉकडाउनमुळे घरा घरात पापड्या कुरवडया बनवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत... तसाच कार्यक्रम काही दिवसांपूर्वी आमच्याही घरी चालू होता. घरात मासिक पाळी येणाऱ्या आम्ही तिघी. आई ,वहिनी आणि मी. त्यातही आईची पिशवी काढून टाकल्याने राहिलो आम्ही दोघीच वहिनी आणि मी... घरात एकीचे झाले  की एकीचे चक्र सुरू असते. त्यामुळे एकदा अशीच मजा घरात घडली. गेल्या महिन्यात आईने घरात कुरवडया बनविण्याचा घाट घातला, त्याही दोन टप्यात. पहिल्या टप्प्यातल्या कुरवड्या व्यवस्थित झाल्या अगदी कोणत्याही अडचणी व तक्रारीशिवाय . परंतु दुसऱ्या टप्प्यात मात्र आमच्या वहिनीबाईंची पाळी होती. त्यादिवशी सुट्टीचा दिवस असल्याने मी आणि दत्ता द...