Skip to main content

बार्शीच्या स्वच्छ , धुळमुक्त ,खड्डेमुक्त्त रस्त्यासाठी नागरिकांसोबत संवाद



 बार्शी/प्रतींनिधी -बार्शी नगरपालिकेचे समोर बार्शी शहरातील भुयारी गटार योजना, खराब रस्ते व इतर मागण्यासाठी गेली आकरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले राष्ट्रीय आंदोलन समन्वयक मनिष देशपांडे यांच्या आंदोलनाचा उद्या बारावा दिवस आहे. बार्शी नगरपरिषद प्रशासन यांचेकडून कोणतेही ठोस उत्तर किंवा मागणी पूर्ण होत नसल्यामुळे बार्शी नगरपरिषद कर्मचारी व सत्ताधारी नगरसेवक यांना गांधीगिरी मार्गाने गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्याचे आंदोलन, खड्यात झाड लावणे, संविधानाची उद्देशिका वाटप आणि इतर आंदोलनही यावेळी करण्यात आली.

या बेमुदत धरणे आंदोलनास विविध सामाजिक संस्था संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांचा पाठिंबा वाढत आहे कालच अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी  जनआंदोलन न्यास संघटनेच्या वतीने देखील मनीष देशपांडे यांच्या आंदोलनास व त्यांच्या कार्यास पाठिंब्याचे पत्र व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना पाठवले आहे. उद्या मंगळवार दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी ६ वाजता देखील मनीष देशपांडे, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय,बार्शी समन्वयक यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच बार्शी शहरातील विविध समस्या याबाबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी इन्क्रेडिबल किसान और मजदूर संघ राष्ट्रीय अध्यक्ष असलम बागवान,जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, पुणे विभाग समन्वयक इब्राहीम खान,स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे व आधी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर बार्शीतील नागरिकांची संवाद साधणार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...