Skip to main content

सोलापूर विदयापीठातील पत्रकारिता विभागातर्फे ‘जागर पत्रकारितेचा’ माध्यम सप्ताहाचे आयोजन



सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील  सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे  ‘ जागर पत्रकारितेचा’ दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त माध्यम सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे. याचा समारोप कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी दिली आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना मिळावे या उद्देशाने दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने अशा  माध्यम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात व्याख्याने, कार्यशाळा यांचा समावेश असतो. यावर्षीही 1 जानेवारी  ते 6 जानेवारी 2021  या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने हा माध्यम सप्ताह साजरा होणार आहे. यात मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

1 जानेवारी रोजी ‘ऑनलाईन पत्रकारिता’ या विषयावर मयूर गलांडे ( लोकमत, मुंबई), ‘पर्यावरण पत्रकारिता’ या विषयावर तरुण भारत संवाद चे संपादक रजनीश जोशी  ( सोलापूर) यांची व्याख्याने होणार आहेत. 2 जानेवारी रोजी ‘संपादकीय पानाचे महत्व’ विषयावर तरुण भारत सोलापूरचे संपादक विजयकुमार पिसे तर ‘माध्यमातील करिअर संधी’ या विषयावर लोकराज्य चे माजी संपादक सुरेश वांदिले ( मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. 3 जानेवारी रोजी न्यूज ब्युरोची कार्यपध्दती या विषयावर दैनिक पुढारीचे ब्युरो प्रमुख  विजयकुमार देशपांडे तसेच राजकीय वार्तांकन या विषयावर ज्येष्ठ पत्रकार राजा माने मार्गदर्शन करणार आहेत. 4 जानेवारी रोजी मदुराई ( तामिळनाडू ) येथील अमेरिकन कॉलेजच्या डॉ. शौरिनी बॅनर्जी ‘फॅक्टशाला’ कार्यशाळा घेणार असून यात खोटया बातम्या कशा ओळखायच्या याबाबत प्रशिक्षण विदयार्थ्यांना  देणार आहेत. 5 जानेवारीरोजी  ‘जय महाराष्ट्र’ चॅनल मुंबईचे संपादक मनोज भोयर ‘टी.व्ही.पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर, दैनिक सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी ‘क्राईम रिपोर्टिंग’ या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी ‘शोध आणि सखोल पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दैनिक लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळ्कोटे आणि दिव्य मराठीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर यांचेही मार्गदर्शन विदयार्थ्यांना लाभणार आहे.

6 जानेवारी 2021  या पत्रकार दिनाच्या दिवशी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ , सोलापूरच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते या कार्यशाळेचा समारोप होणार आहे. या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, शिवाजी विदयापीठ कोल्हापूर, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विदयापीठ , जळगाव तसेच स्वामी रामानंद  तीर्थ मराठवाडा विदयापीठ नांदेड या चार विदयापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या संयुक्त विदयमाने एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा होणार आहे. यात अजय अंबेकर, संचालक , माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई आणि  सम्राट फडणीस, संपादक , दैनिक सकाळ , पुणे पत्रकारिता आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. विदयार्थ्यांनी या कार्यशालेचा लाभ घ्यावा असे आवाहन्‍ विदयापीटातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर यांनी केले आहे. या माध्यम सप्ताहाच्या  यशस्वितेसाठी डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे , डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक प्रयत्न करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...