Skip to main content

बालकामगार विरोधी दिन - चिमुकल्या जिवांची मते

 


                बालकामगार नकोच!!

बालकामगार आपल्या भारताला भेडसावणारी मोठी समस्या आहे. बर्याच ठिकाणी लहान मुलं आपल्याला काम करताना दिसतात. मग ते हॉटेल असो वा चहाची टपरी असो किंवा मग लहान लहान कंपन्या असो तसेच घर काम करण्यामध्ये ही मुलांचा समावेश असतो. याचे मुख्य कारण आर्थिक परिस्थिती आहे, आई-वडीलांचे कमी उत्पन्न, मोठे कुटुंब तसेच बरीच कारणं ही आहेत. यामुळे लहान वयातच मुलांना काम करण्यास भाग पाडले जाते. 


शहरी तसेच ग्रामीण भागात सुध्दा लहान मुलं काम करताना दिसतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे व खेळण्यांचे दिवस असतात त्या वयात मुल काम करताना दिसतात. अनेक सामाजिक संस्था कार्य करत आहेत पण या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणं गरजेचं आहे. 


बालकामगार ही समस्या मुळापासून नष्ट करायची असल्यास मुलांना शाळेत पाठवणे तसेच आरोग्य व गरजेच्या वस्तू मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आपण हि सुजाण नागरिक म्हणून १८ वर्षांखालील मुलांना काम न करु देणे. तसेच कुठे लहान मुलं काम करताना आढळल्यास चौकशी करणे. त्यांना शक्य होईल ती मदत करणे जेणेकरून ते त्यांचं बालपण जगू शकतील. 


बालमजुरी ही भारतात असू नये. त्यांना मोफत शिक्षण घेण्याचा हक्क आहे व त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. 


देवांश आगिवले, ९वी 

साधना विद्यालय सायन

सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी.



   बालकामगार एक गुन्हा आहे


 मुलांकडून काम करवून घेणे गुन्हा आहे. त्यामुळे शारिरीक व मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसतात. आपल्या देशात गरिबीमुळे अनेक ठिकाणी बालमजुरी केली जाते पण त्या गुलामी मुळे आपल्या देशाचा भविष्याचा विचार केला तर ते आपलेच नुकसान आहे. कारणं हिच लहान मुलं देशाचं भविष्य आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर लहान मुलांचे हे वय खेळण्यांचे, शिकण्याचे तसेच माणूस म्हणून घडवायचे आहेत. त्यामुळे बालमजुरी नकोच. 


बालकामगार हा एक गुन्हा आहे. कारखान्यात, हॉटेल, घरातील काम किंवा कुठे काम करताना दिसल्यास कारवाई केली जाते. तरी आपल्या भारतात उत्तरप्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यात बालकामगारांची संख्या जास्त आहे. 


कैक कारणं आहेत बालकामगार वाढण्यामागे पण आपण सुजाण नागरिक म्हणून आपल्या परीने प्रयत्न करतं राहणं गरजेचं आहे. या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणं हिचं काळाची गरज आहे.


सदाफ फातिमा शेख, ९वी 

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, सायन

सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी



         बालपण शिकण्यासाठी आहे.


बाल कामगार विरुद्ध २००२ ला यां प्रश्नांवर काम केलं पाहिजे या विचारानं हा दिवस जनजागृती करिता साजरा केला जातो. दरवर्षी १२ जुन या दिवशी मोठ्या उत्साहाने या दिवसांचे महत्त्व पटवून देण्याचे काम अनेक संस्था करत आहेत. बाल कामगार विरुद्ध आपण सर्वांनी काम करने गरजेचे आहे. 


अनेक ठिकाणी बालमजुरी करून लहान मुलांना मानसिक तसेच शारिरीक त्रास दिला जातो. आज पण सिंगल वर लहान मुलं गजरा विकत, फुगे विकत किंवा भिक मागताना दिसतात. जागतिक पातळीवर या प्रश्नाचा विचार केला तर दहा पेकी एक मुलगा बालमजुरी करत आहे. तर बालकामगार रोखण्यासाठी आपण जनजागृती करणे, कार्यक्रम आयोजित करणे जेणेकरून लोकांना या प्रश्नाच गांभिर्य कळेल. 


मुलांना शिक्षण मोफत आहेच पण त्यांना त्या शाळेच्या पायरी पर्यंत पोहचण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असने गरजेचे आहे. मुलांचे बालपण शिकण्यासाठी, खेळण्यासाठी असते त्यांचा वापर कमावण्यासाठी करु नये. 


भैरवी गडदे, ९वी 

साधना विद्यालय, सायन

सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी



Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...