Skip to main content

विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस


 विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस


मास कम्युनिकेशन विभागातर्फे ऑनलाईन स्नेहसंमेलन व ‘विद्यावार्ता’चे प्रकाशन




सोलापूर/विशेष प्रतिनिधी - कोरोना महामारीच्या संकटात, लॉकडाऊन काळात  विद्यार्थ्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवून वेळेचा सदुपयोग केला हे कौतुकास्पद आहे असे  गौरवोद्गार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढले.


पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे आयोजित ऑनलाईन स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन व ‘विद्यावार्ता’ या प्रायोगिक वार्तापत्राच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, संयोजक व विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात मास कम्युनिकेशन , बी. व्होक तसेच अँकरिंग, डॉक्युमेंटरी मेकिंग आणि डिजिटल जर्नालिझम या  अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते . यात मास कम्युनिकेशन विभागांतील 45 विद्यार्थ्यांनी कथा, कविता , चारोळी,उत्स्फूर्त वक्तृत्व, एकपात्री,मिमिक्री , लघुपट इत्यादी कला गुणांचे सादरीकरण केले . यात विशेष सादरीकरणासाठी आमंत्रित केलेले माजी विद्यार्थी महेश कोटीवाले व निखिल भालेराव यांनी अनुक्रमे सादर केलेल्या मिमिक्रीने व गायनाने सर्वांची मने जिंकली.



कुलगुरु डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की, कोरोनाने आपणा सर्वांनाच नव्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. सामुहिक प्रयत्नातूनच कोणतेही संकट थोपवता येते हे दाखवून दिले आहे. लॉकडाऊन काळात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आपला वेळ नवोपक्रम व सर्जनशील कृतीतून व्यतीत केला आहे. याबाबतची मांडणी त्यांनी ‘विद्यावार्ता’मध्ये लेख लिहून केली आहे. मास कम्युनिकेशन विभागाने ऑनलाईन स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ही कौतुकास्पद बाब आहे. पुढील काळातही विद्यार्थ्यांनी आपल्यातील सकारात्मक मानसिकता वृद्धींगत करावी. स्वतःच्या, कुटुंबाच्या व मित्रपरिवाराच्या आरोग्यविषयक काळजीबाबत सजग राहावे.

 विद्यावार्ता अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा.डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, मास कम्युनिकेशन विभाग हा सतत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रभागी असतो. या विभागाने ऑनलाईन स्नेहसंमेलन आयोजित करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना मंच उपलब्ध करुन दिला. ‘विद्यावार्ता’ या अंकाचे नियोजन, संपादन, मांडणी अप्रतिम आहे. यातील लेख वाचनिय आहेत. विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात केलेले प्रयोग, अनुभव शब्दबध्द केले आहेत. हा उपक्रम कौतुकास पात्र आहे.


प्रारंभी विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी ‘विद्यावार्ता’चा लॉकडाऊन विशेषांक व ऑनलाईन स्नेहसंमेलनामागची भूमिका विशद केली. असे उपक्रम घेण्याच्या प्रक्रियेत कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे व विद्यापीठाचे पाठबळ मिळत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मनातील सकारात्मक विचारांना पुढे आणण्यासाठी हा कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भासके व कु. तेजस्विनी कांबळे यांनी केले. पहिल्या व दुसर्‍या सत्राचे आभार अनुक्रमे डॉ. बाळासाहेब मागाडे व श्री. ऋषिकेश मंडलिक यांनी मानले. 

--



ऑनलाईन स्नेहसंमेलनात कलागुणांचा आविष्कार

दुसर्‍या सत्रात या स्नेहसंमेलनात जोया सुभेदार, विक्रम बरडे, अर्चना माने, शीला अडसुळे, बालाजी गुरव, डॉ. औदुंबर मस्के, उज्वला दंतकाळे, विजया कोकणे, विजय पारसेकर, मनमोहन भोसले, अब्दुल शेख, श्रद्धा राऊळ, वैष्णवी माळगे, अंबादास पोळ, नितीन ढवळे, महताब शेख, आसिफ मुलाणी, गणेश पवार, समर्थ सोरटे, विजयकुमार लोंढे, धनंजय पुराणिक, सद्दाम मुल्ला, विजया कोकणे, विनोद मोरे, शिवय्या स्वामी, नटराज बैटापल्ली, सुमित शिवशरण, विशाल पाटमस, सूर्यकांत माने, ईश्‍वर केरुरकर, सुहास भोसले, नितीन काजवे आदींनी बहारदार सादरीकरण केले. विक्रम बरडे, गणेश पवार, ऋषिकेश मंडलिक, विजया कोकणे यांच्या लघुपटाचे सादरीकरण झाले. याशिवाय विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे यांनीही कलागुण सादर केले. 

या ऑनलाईन स्नेहसंमेलनात 75 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...