Skip to main content

संभव फाऊंडेशन व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात ३ हजार रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 


शहर प्रतिनिधी /सोलापूर  - आज जगभरात कोरोना विषाणू ची महामारी सुरू असताना लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत, सर्वत्र शासनाने लागु केलेल्या संचारबंदी मुळे होतकरू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली असून यात कष्टकरी विडी कामगार, घरेलू कामगार महिला, फेरीवाले, बांधकाम कामगार समूहाचे पण तितकेच हाल होताना दिसत आहेत.


सोलापूर शहरातील तळागाळातील गरीबां पर्यंत मदत पोहचुन सेवा पुरवणारी संभव फाऊंडेशन गेल्या काही दिवसांपासून लॉक डाउनच्या काळात कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेत ही अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे कार्य सुरू ठेवले असून या मध्ये आटा, डाळ, तेल, साखर, हळद, मीठ व मास्क असे जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून पोटाची खळगी भरण्यासाठी दोन हातांशी धडपडणाऱ्या सोलापूर शहरातील  तीन हजार चारशे होतकरू, कष्टकरी गरजवंताना सदर किट चे वाटप करण्यात आले. 

हे रेशन किट जुने विडी घरकुल, नवीन विडी घरकुल कुंभारी, मुळेगाव, कुमठे, दोड्डी, बेलाटी, मिलींद नगर, एस.टी बस स्टँड, जुना बोरामणी नाका, गांधी नगर, रविवार पेठ, मोदी, सुत मिल, हब्बु वस्ती, माने वस्ती, जवळकर वस्ती, रमाबाई आंबेडकर नगर, भवानी पेठ, आंबेडकर नगर कर्णिक नगर, मड्डी वस्ती, जय मल्हार चौक,सलगर वस्ती,बाळे,पुर्वभाग आदी ठिकाण या रेशन किटचे वाटप करण्यात आले. सदर रेशन किटचे पुजन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे डॉक्टर अँन्ड पेशंट गॕलेरीचे ब्रिजेश कासट,सपना रांभीया हैद्राबादवाले प्रविण गाडेकर यांच्या हस्ते झाले.तर

रेशन किटचे वाटप रिलायन्स फाउंडेशनचे व्यवस्थापक संदीप गुंजाटे, रिलायन्स फाउंडेशन राज्य समन्वयक दिपक केकान रिलायन्स फाउंडेशन सोलापूरचे समन्वयक श्रीकांत कोळी यांच्या माध्यमातून झाले. यावेळी संभव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण, सचिवा राणी सिरसट उपस्थित होत्या.


जीव मुठीत चार भिंतीत बसण्याची वेळ आली असताना संभव फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांनी चार भिंतीच्या बाहेर पडत माणुसकी जोपासत सदर किट चे वाटप केले. किट वाटप करण्यासाठी रुपाली हूंडेकरी, आरती लांडे, आस्मिता गायकवाड, वृषाली गायकवाड,आकाश बनसोडे,भाग्यश्री सोनवणे, प्रा.पवन व्हनकवडे, प्रा.गणेश पवार, सचिन शिंदे, राज पवार, चेतन लिगाडे,विश्वजीत बनसोडे,अमीर दोडोती,संतोष माने, राहुल सिरसट,अक्षय चंदनशिवे,बुद्धराज ढेपे यांनी मोलाची भूमिका बजावली.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...