Skip to main content

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या कामांचा पडला विसर -शेवते - खेडभोसे रस्त्याची दुरवस्था


शेवते - खेडभोसे रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.

 शेवते - खेडभोसे रस्त्यावर शेवते ग्रामपंचायतीने मागील वर्षी 2 किमी पर्यंत मुरुम टाकला होता, मात्र यंदा रस्त्याची डागडुजी न केल्याने ग्रामस्थ, शेतकऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे.

पंढरपूर/नामदेव लकडे - लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पंढरपूर तालुक्यातील शेवते ते खेडभोसे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना चिखलातुन रस्ता शोधावा लागत आहे. शेवते ते खेड भोसे हे पाच किलोमीटर अंतर आहे. या पाच किलोमीटर पैकी शेवते गावाकडून दोन किलोमीटर खडीकरण आहे. तर खेडभोसे गावाकडून दोन किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे.

आता खेडभोसे शीव ते पवार वस्ती ह्या एक किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. या एक किलोमीटर मध्ये साधे खडीकरण सुध्दा नाही. या रस्त्याने वाहनच काय पण माणसांना देखील व्यवस्थित चालता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातच सध्या या परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने या रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने  वाहनचालकाना खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.निवडणूका आल्या कि या भागातील लोकप्रतिनिधी या रस्त्याने येतात मात्र एकदा निवडणूका झाल्या कि इकडे फिरकत सुध्दा नाहीत. शेवते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी  पुढाकार घेऊन या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...