अक्कलकोट / जयकुमार सोनकांबळे : महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ९६.४३ टक्क इतका लागला आहे.श्री शहाजी प्रशालेची अनुराधा माधव कुलकर्णी ही ९७.६० टक्के गुण मिळवत तालुक्यातुन प्रथम आली आहे तर एस.एस.शेळके प्रशालेतील विश्वनाथ खिरानंद धड्डे यांने ९७ टक्के गुण मिळवत कन्नड माध्यमात प्रथम व तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविले.तर मंगरूळे प्रशालेतील सोमनाथ मारूती जमादार यांने ९६ टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविले.या वर्षी तालुक्यातून ४ हजार २९१ मुले व मुली परिक्षस बसल्या होत्या.त्यामध्ये ४ हजार १३८ मुले व मुलींना यश मिळाले आहे.त्यामध्ये मुलींचे प्रमाण उत्तीर्ण होण्याचे अधिक आहे.
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

Comments
Post a Comment