Skip to main content

सर्व नागरिकांनी प्रधानमंञी जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा उतरवावा - गणेश अधटराव


पंढरपूर/नामदेव लकडे ::- सर्व नागरिकांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रत्येक नागरिकांच्या फॅमिली आधाराकरिता कमीत कमी रक्कमेत सर्वांनकरिता त्यांच्या संकल्पनेतुन सुरू असलेल्या वार्षिक रक्कम 330 रू. असलेला प्रधानमंञी जीवन ज्योती विमा व वार्षिक रक्कम 12 रूपये असलेला प्रधानमंञी सुरक्षा विमा हा आपले नॅशनल बँक खाते असलेल्या बँकेमध्ये त्वरित उतरवण्याची गरज असल्याचे मत पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश अधटराव यांनी व्यक्त केले आहे. 

यामध्ये कोणत्याही अधिक कागद पञांची गरज नसुन ज्या नॅशनल बँकेमध्ये आपले खाते आहे त्या बँकेमधुन तो फाॅर्म घेऊन भरून द्यायचा आहे.या अगोदर हे दोन्ही विमा उतरवले असल्यास नंतर उतरवता येणार नाही.
व एका व्यक्तीचा एकाद्या बँकेत हे विमे उतरविले असल्यास दुसऱ्या बँकेत त्या चालु वर्षात हे विमे उतरवता येणार नाहीत. 

या मधिल प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना ही 18 ते 70 वर्षांमधिल तर प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजना ही 18 ते 50 वर्षांमधिल नागरिकांना उतरवता येईल तसेच या मधिल प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सदर विमा धारकाचा कोणत्याही कारणावास्तव मृत्यू झाल्यास मृता च्या योजना फाॅर्मवरील वारसास दोन लाख रूपये मिळतात व प्रधानमंञी सुरक्षा विमा योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास मृताच्या वारसास दोन लाख रूपये मिळतात.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...