Skip to main content

पंढरपूर शहरात १० दिवस लॉकडाऊन करा-शिवसेना

 

शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी    
                               
पंढरपूर/नामदेव लकडे - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन अतिशय शिस्तबध्दपणे विविध उपायोजना करीत आहे.पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात संपुर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्या पासून आपण व आपल्या सर्व सहकार्‍यांनी प्रशासकिय पातळीवर योग्य त्या उपायोजना करण्याबरोबरच अहोरात्र परिश्रम करीत पंढरपूर शहर तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठे यश मिळवीले.मात्र जुन महिन्याच्या सुरुवातीस पंढरीत पहिला स्थानिक रहीवाशी कोरोना बाधीत आढळला आणि शहरात मोठया संख्येने कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे.हा प्रसार रोखण्यासाठी व संपर्क साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहरात किमान १० दिवसाचा लॉकडाऊन करावा अशा आशयाची मागणी शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  
     
     या बाबत अधिक माहिती देताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले कि, पंढरपुर शहरातील जवळपास सर्वच उपनगरात तसेच शहरातील प्रदक्षिणा मार्गावर कंटेनमेन्ट झोन तयार करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.तर शहरातील अर्तंगत भागातही अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.ही परिस्थीती अतिशय गंभीर वळण घेत असून दररोज रुग्णांचा वाढता आकडा पाहता जर वेळीच खबरदारी घेतली नाही तर शहरात समुह संसर्गाची परिस्थीती निर्माण होऊ शकते हे पाहता पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व कोरोना बाधीत व्यक्तींची संपर्क साखळी तोडण्यासाठी तातडीने किमान 10 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करुन शहरातील अती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करुन शहरात जनता कर्फ्युची घोषणा करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे.                                                                                                               

हे निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग सुधीर अभंगराव,शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख,शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे,शिवसेना उप शहर प्रमुख पोपट सावतराव,विनय वनारे,अविनाश वाळके,सचिन बंदपट्टे,लंकेश बुराडे,तानाजी मोरे,अमित गायकवाड,पंकज डांगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...