Skip to main content

वाणीचिंचाळे येथे हिरवाई बहरली , संपूर्ण वनविभागात हिरव्यागार रंगाची उधळण


या हरीत गाव करण्याच्या चळवळीला काहीजण  हरताळ पाळत आहेत. यामुध्ये झाडाच्या जाळ्या चोरुन नेणे,चोरून रात्रीच्या वेळी जनावरे वनविभागात चारणे,शिकार करणे  या गोष्टी पण काहीजण करत आहेत यावरही आळा बसला तर गाव एक हरीत माँडेल म्हणून येईल.यावर सर्वांनीच हि वनसंपदा आपली आहे ,याची काळजी आपण सर्वजण घेतली तरच जंगल वाचेल अन्यथा येरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या अशा प्रत्यय येईल.सर्वानीच वनांची काळजी घेऊन जर सहकार्य केले तर गावाला पावसाचे प्रमाण वाढेल व पर्यायाने गावात पिके चांगली येतील व हि वन साखळी वाचेल

पंढरपूर/नामदेव लकडे - सर्वत्र वनसंवर्धन दिन साजरा होत असतानाच वाणीचिंचाळे वनविभागात हा निराळा योग दिसून येत आहे. तसेच सध्या पाऊस पडल्यामुळे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या झाडे लागवडीमुळे सर्व परीसर हिरवागार दिसत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फाही झाडे वाढल्यामुळे अतिशय सुंदर चित्र दिसत आहे.

वाणीचिंचाळे गावाने पाणी फाऊंडेशनच्या यशानंतर गावात  हरीत गाव करण्याची संकल्पना मांडली .या मोहीमेला वनविभागाचे अधिकारी तसेच वनमजुर व गावकरी हातात हात घेऊन गावात वनांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाला यशही आले आहे. यामुळे गावातील वन परीसर हिरव्यागार शालु घातल्यासारखा दिसत आहे.

या झाडामध्ये कडुनिंब, काशीद,शिसव,करंज,पळस,वड,पिंपळ, जांभूळ, गुलमोहर, कांचन,शिरीष,चिंच अशा विविध प्रकारची झाडे फुलली आहेत.इतर गावामध्ये कायम वन विभागाच्या कारभारावर  गावकरी समाधानी नसतात परंतु वाणीचिंचाळे गावात वनविभागाचे सहकार्य खुप चांगल्या प्रकारे मिळुन गावाला आता पहिले दिवस येऊ लागले आहेत.



 वनविभागाच्या या कामगिरीमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी बाटे साहेब, वनपाल खंडेभराड साहेब, वनरक्षक बादने साहेब, वनमजुर कोरे यांचे सहकार्य खुपच मिळत आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे सुर्यवंशी साहेब, बनसोडे, वन कर्मचारी कैलास गडहिरे,गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे यामुळेच गावात हि हरीत गाव संकल्पना रूजू लागली आहे.

तसेच गावातील अनेक लोकांना या चळवळीत सहभागी होत आहेत .ते आपल्या स्वखर्चाने देशी झाडे  वनविभागात लावून आपला खारीचा वाटा उचलत आहेत.अशाच पद्धतीने सर्व गावातील लोकांनी या हरीत गाव करण्याच्या मोहीमेला सहकार्य करावे अशी अपेक्षा ही व्यक्त होत आहे.

 या ठिकाणाला गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ यांनी भेट देऊन सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच या क्षेत्रात देशी झाडे लावावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच गावात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात कायमच सहकार्य केले जाते. परंतु जर चुकीचे काम केले तर गय केली जात नाही असे सांगितले. गावात सर्व ग्रामस्थ व वनविभागाचे अधिकारी यांनी हातात हात घेऊन काम केले तर काही होऊ शकते हे या उदाहरणावरून दिसून येत आहे.तसेच गावातील राहिलेल्या वनविभागात देशी झाडांची लागवड करावी अशी अपेक्षा गावातील पदाधिकांऱ्यानी केली आहे.

जर गावात अशा प्रकारे झाडे लावली व संगोपनासाठी फक्त वनविभागाचे सहकार्य असुन चालणार नाही तर गावातील प्रत्येक नागरिकांना हे जंगल आपले आहे याची जाणीव झाली तर गावात खुप वनसंपदा वाढेल पर्यायाने गाव हिरवेगार दिसू लागेल व पर्यावरणाचा समतोल राखुन प्रर्जन्यमान वाढेल याची खात्री आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...