Skip to main content

प्रा. तुकाराम नारायण मस्के यांची जिल्हा युवा समितीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी निवड


पंढरपूर / शंकर जमदाडे - अखिल भारतीय वारकरी मंडळ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी जिल्हा अध्यक्ष श्री ह भ प डॉ किरण महाराज बोधले यांच्या शिफारशीनुसार तर जिल्हा उपाध्यक्ष श्री ह भ प अभिमान महाराज पाटील, सह जिल्हा अध्यक्ष श्री ह भ प प्रभाकर दादा वाघचवरे महाराज, श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज हेटकळे यांच्या सूचनेनुसार जिल्हा समिती प्रमुख पदाधिकारी यांच्या नियुक्ती  जाहीर केली आहे.

प्रा.तुकाराम नारायण मस्के  यांच्या  किर्तन रुपी समाज प्रबोधन आणि त्यांच्या या कामाची दखल घेऊन , अखिल भारतीय वारकरी मंडळ यांनी प्राध्यापक तुकाराम नारायण मस्के यांची जिल्हा युवा समितीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली .प्रा.तुकाराम नारायण मस्के  शिक्षक म्हणूनविवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर मध्ये कार्यरत आहेत . त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी कीर्तनकार झाले आणि त्याच बरोबर हे स्वतः एक मोठे वक्ते आहेत. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर जिल्हा समिती कार्यकारणी पुढीलप्रमाणे

 वारकरी शिक्षण समिती 
१)प्रमुख(अध्यक्ष)- श्री ह भ प अंबरूषी (तात्या) महाराज पाटील (बावी , बार्शी)
२) उपप्रमुख (उपाध्यक्ष)- श्री ह भ प हसन महाराज आतार (कुर्डू , माढा)

स्वच्छता व व्यसनमुक्ती समिती- 
१)प्रमुख (अध्यक्ष) - श्री ह भ प धनंजय देशमुख महाराज (अकलूज)

जिल्हा युवा समिती 
१)प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प अनिरुद्ध महाराज निंबाळकर (बिटरगाव वांगी करमाळा)
२) उपप्रमुख (उपाध्यक्ष) - श्री ह भ प प्रा.तुकाराम महाराज मस्के (भोसे करकंब)

 सप्ताह व दिंडी समिती- 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प काकासाहेब महाराज पाटील (दारफळ, उत्तर सोलापूर)

 जिल्हा महिला व बालसंस्कार समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- सौ. स्मिता ताई पाटील (कान्हापुरी, पंढरपूर)

 गोपालन व इतर कार्यक्रम समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प पांडुरंग महाराज चव्हाण (सुस्ते, पंढरपूर)

 सार्वजनिक मंदिर बांधकाम व निधी संकलन समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प भागवत महाराज देवकते (सोलापूर शहर)

 जिल्हा समाजकल्याण समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प विश्वनाथ महाराज बाबर(पुळूज)

जिल्हा आरोग्य समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प डॉ सचिन महाराज गोडसे (कुर्डुवाडी)

या सर्वांचे अभिनंदन व स्वागत जिल्हा मुख्य सचिव श्री ह भ प रंगनाथ महाराज काकडे यांनी केले तर यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष श्री ह भ प राजन महाराज काशीद, प्रसिध्दी प्रमुख श्री ह भ प श्रीनिवास महाराज चव्हाण ,संपर्क प्रमुख श्री ह भ प नवनाथ महाराज झिंझाडे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...