तुळजापूर/अक्षय वायकर - तुळजापूर तालुक्यातील कात्री रोड, अपसिंगा येथील ऋषिकेश पाटील यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जनावरे वाहून गेली आहेत.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.तसेच जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, शेतकरी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

शेतऱ्यांसाठी मदत केली पाहिजे...
ReplyDelete