Skip to main content

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                     
ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I
वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई
सुरुवात होता
तू घाबरायचं नाही         
MHM चे लय महत्व बाईI१I

पाळी ही येता त्रास
होईल ओटी पोटी दुखणे
तुला जाणवेल
आहार चौरस सुरु ठेव ताई               
MHM चे लय महत्व बाई I2I 

मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि
फळे तू खा ग निरोगी
राहण्याची ही चावी ताई       
MHM चे लय महत्व बाईI3I

चिडचिड होईल भीती ही
वाटेल गोंधळ होईल
राग तुला येईल 
यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I

थकवा वाटेल ,ताण तुला येईल                निराश वाटेल चिडचिड होईल
यामुळे गोंधळून जायाचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I५I

सुर्यनमस्काराचा आधार घे ग                  दीर्घ श्वासाचा व्यायाम कर ग
त्या चार दिवस
आरामाची हि चावी बाई 
MHM चे लय महत्व बाई I६I

थोडासा व्यायाम रोज तू कर ग                स्वताची काळजी स्वता तू घे ग
स्वतासाठी थोडा वेळ दे ग ताई                एमएचएम चे लय महत्व बाई I७I

सँनिटरी पँडचा वापर तू कर ग              दिवसातून चार वेळा बदल तू कर ग
पाळीचा कालावधी सुखकर होई              एमएचएम चे लय महत्व बाई I८I

सुती कपड्याचा वापर कर ग                  भिजलेले कपडे नियमित बदल ग
पाळी व्यवस्थापन सोपे हे होई                एमएचएम चे लय महत्व बाई I९I

आनंद तुझ्या घरात नांदो                        हे चार दिवस सुखाचे जावो
उमेद तुझ्या जीवनात राही                एमएचएम चे लय महत्व बाई I१०I         

https://absnewsofficial.blogspot.com/2020/05/Poojadatta.html

https://absnewsofficial.blogspot.com/2020/05/Masik.html

गीतकार – गुरु भांगे
जिल्हा कृतीसंगम समन्वयक , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान   मो – ८८८८४२१६६६   

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...