Skip to main content

मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करण्यात यावा

 



बार्शी/ प्रतिनिधी- महाविकास आघाडी सरकारने 7 मे रोजी मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित रद्द करावा यासाठी सिविल राइट्स प्रोटेक्शन सेलच्या वतीने बार्शी चे तहसीलदार सुनील शेरखाने यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे निर्णय घेतले जातात ही गोष्ट लाजिरवाणी असून मागासवर्गीयांच्या विरोधात व राज्यघटनेच्या विरोधात आहे. सन २०१७ सालापासून थांबविण्यात आलेली मागासवर्गीयांची पदोन्नती तात्काळ सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा.राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांची पदोन्नती भरली जाणारी 70 हजार पदे भरली जाणार आहेत त्याचा फायदा अन्य प्रवर्गातील उमेदवारांना आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा.


या मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यामार्फत पाठवण्यात आले. यावेळी सिविल्स राइट्स प्रोटेक्शन सेलचे महाराष्ट्र राज्य सचिव सत्यजित जानराव , सोलापूर जिल्हाध्यक्ष अंगद गायकवाड , बार्शी तालुका अध्यक्ष पंडित राजगुरू , नागनाथ सोनवणे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र  व सल्लागार आत्माराम चव्हाण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...