Skip to main content

तौते चक्रीवादळ - भारतीय नौदलाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरूच


मुंबई, 19 मे -भारतीय नौदलाकडून मुंबई आणि गुजरात किनाऱ्यांजवळ सुरु असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेचा आज तिसरा दिवस. भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने सध्या P-305 या नौकेवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या शोध आणि बचावासाठी कार्यरत आहेत. ही नौका 17 मे रोजी मुंबईपासून 35 मैलांवर बुडाली होती. या शोध आणि बचाव मोहिमेत आयएनएस कोची, कोलकाता, बियास, बेतवा, तेग या जहाजांसह P8I हे सागरी गस्ती विमान, चेतक, एएलएच आणि सीकिंग ही हेलिकॉप्टर्स कार्यरत आहेत.


बचावलेल्या 125 जणांना सोडण्यासाठी आणि चार कर्मचाऱ्यांचे मृतदेह पोहोचविण्यासाठी 19 मे रोजी बंदरात दाखल झालेले आयएनएस कोची हे जहाज लगेचच संध्याकाळी पुन्हा शोधमोहिमेसाठी समुद्रात नेण्यात आले. आयएनएस कोलकाता हे जहाज 19 मे च्या रात्री मुंबई बंदरात पोहोचणार असून P-305 नौकेवरील तसेच 'वरप्रदा' या कर्षक नौकेवरील बचावलेल्या व्यक्तींना ते बंदरावर सोडणार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान हाती लागलेले 18 कर्मचाऱ्यांचे मृतदेहही यावेळी बंदरात पोहोचवले जाणार आहेत.


गुजरात किनाऱ्याजवळील सागरी भागातील मोहीम संपवून आयएनएस तलवार हे जहाजही आता, मुंबईजवळ P-305 नौकेवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत नौदलाच्या तीन जहाजांच्या ताफ्यात सामील होण्यासाठी पाठवण्यात आले आहे. अगोदर दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस तलवार या जहाजाने गुजरातच्या किनाऱ्याजवळील सागरी भागात समन्वयाची जबाबदारी सांभाळली. सपोर्ट स्टेशन-3 आणि ड्रिल शिप सागर भूषण यांना या जहाजाची मदत झाली. या दोन्हींना आता ओएनजीसीच्या मदत-जहाजांकरवी मुंबईकडे खेचून आणण्यात येत आहे. या संकटग्रस्त जहाजांवरील जवळपास 300 कर्मचाऱ्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्थाही नौदलाने मुंबईहून पाठवलेल्या हेलिकॉप्टर्सनी केली.


आतापर्यंत P-305 या निवासी नौकेवरील 186 कर्मचाऱ्यांची आणि 'वरप्रदा' या कर्षक नौकेवरील दोघांची भारतीय नौदलाच्या जहाजांनी व विमानांनी सुखरूप सुटका केली आहे. तर P305 वरील व्यक्तींपैकी एकूण 26 जणांचे मृतदेह आतापर्यन्त हाती लागले आहेत.

Comments

Popular posts from this blog

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...