Skip to main content

कोरोना साथीच्या काळात भावनिक मनोबल वाढीसाठी मानस मैत्र हेल्पलाइन

  

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा , परिवर्तन संस्था व इतर संस्थाचा  उपक्रम

बार्शी /प्रतिनिधी –कोरोनाची रुग्णसंख्या देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे एका वर्षांनंतर ही समाज धास्तावलेला आहे. माध्यमांमधून जगभरातील कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या  बातम्या येत आहेत. कोरोनाचा शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर  परिणाम होत आहे. लोकांना   मानसिक आधार व भावनिक प्रथमोपचार मिळावा  यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा , परिवर्तन संस्था व इतर संस्थाचा  यांच्या वतीने मानस मैत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

समाजातील काही लोक कुटुंबापासून दूर आहेत. अशा वेळी कोणाशीही  प्रत्यक्ष भेट न होणे,हे तणावाचे कारण असू शकते. कोरोना बाबत समाजमाध्यमातून उलट –सुलट माहिती पसरते आहे. अंत्यविधीच्या बातम्या भडक स्वरुपात सोशल मीडिया व टेलिव्हिजनच्या  माध्यमातून प्रसारित होत आहेत.या सर्वांमुळे लोकांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्याला नेमका कशामुळे संसर्ग होऊ शकतो,काय केल्याने आपण कोरोना पासून स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकतो.असे विचार व्यक्तीला त्रास देऊ शकतात.

ह्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा , परिवर्तन संस्था व इतर संस्थाचा कार्यकर्त्यांनी एकत्र येत मनोबल हेल्पलाइन हा उपक्रम सूरु केला आहे.वीस पेक्षा जास्त प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणी यांच्या माध्यमातून ही हेल्पलाइन चालवली जाणार आहे. कोरोनामुळे ज्यांनाअस्वस्थता ,भीती ,निराशा वाटत असेल अशा लोकांना भावनिक आधार आणि समुपदेशन या हेल्पलाइन च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ज्यांना मनमोकळे करण्याची ,आधाराची गरज वाटते अशा लोकांनी हेल्पलाइन फोन करावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बार्शीच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती बार्शी शाखेचे कार्याध्यक्ष  प्रा.डॉ.अशोक कदम व सचिव विनायक माळी यांनी दिली. 

हेल्पलाइन विषयी ..

मराठी व हिंदी भाषेतून सेवा पुरवली जाईल.

महाराष्ट्रातील व महाराष्ट्राता बाहेरील लोकांना याचा लाभ घेता येणार.

ही सेवा पूर्णपाने मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.


ह्या क्रमांकावर करा संपर्क –

गोविंद पाटील – 9822955059

रंजना गवांदे – 9850491611

कृष्णात स्वाती – 8600230660

निशा भोसले – 9764476476 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...