Skip to main content

संभव फाऊंडेशन देतय रोज ४०० लोकांना दोन वेळच जेवण

 




सोलापूर/ प्रतिनिधी- संभव फाऊंडेशन च्यावतीने शहरातील उपेक्षित हातावर पोट असणाऱ्या  झोपड्या आणि फुटपाथवर राहणाऱ्या ४०० लोकांना जेवण वाटप करण्यात येत असून यात रस्त्यावर राहणाऱ्या बेवारस मनोरुग्ण,वयोवृध्द आजीआजोबा,बेघर लोक,भिक्षेकरी,स्थलांतरीत कामगार 

 यांना संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून  जेवणाची सोय करण्यात येत आहे शहरातील अनेक लोकांचा रोजगार बंद असून उदर्रनिर्वाह होत नाही आश्या लोकांना जेवण पुरवण्याचं कार्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.रोजच्या जेवणामध्ये दाळ खिचडी,व्हेज पुलाव,मसाला राईस,चपाती भाजी दिली जाते.

 


 संभव फाऊंडेशनची टिम लोकांना मास्क,सॉनिटायझार सुरक्षित अंतर विषय मार्गदर्शक सुचना करत आहे.

 संभव फाऊंडेशनचे स्वंयसेवक आस्मिता गायकवाड,आरती लांडे,रुपाली हुडेकरी,राणी सिरसट,वृषाली गायकवाड,शोभा शेंडगे,भाग्यश्री सोनवणे,रुपाली पाटिल,पवन व्हनकडे,प्रा.सचिन शिंदे,संतोष माने,चेतन लिगाडे,पंकज क्षीरसागर,आदीच योगदान या मध्ये आहे.


समाजातील दानशुर लोकांची गरज असून येथील वंचित बेघर लोकांना पौष्टिक अन्न देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेत आहोत.कोरोनाच्या संकटकाळात आम्ही बेघर लोकांच्या सोबत आहोत त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय करून प्रयत्न सुटत नसलेतरी त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आम्ही हे कार्य सुरू ठेवले आहे -आतिश कविता लक्ष्मण अध्यक्ष संभव फाऊंडेशन ९७६५०६५०९८


Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...