Skip to main content

महाराष्ट्र उच्च शिक्षणात अग्रेसर – माजी कुलगुरु तथा उच्च शिक्षण संचालक डॉ.एस.एन.पठाण



नवी दिल्ली : उच्च शिक्षणात महाराष्ट्र अग्रेसर असून भविष्यातही राज्याचा हा आलेख उंचावेल, असा आशावाद माजी कुलगुरु तथा उच्च शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पठाण यांनी आज व्यक्त केला.      


महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘उच्च शिक्षण काल, आज आणि उद्या’ या विषयावर डॉ. पठाण बोलत होते.

महाराष्ट्राने गेल्या ६० वर्षांत उच्च शिक्षणात मोठी भरारी घेतल्याचे सांगून डॉ.पठाण यावेळी म्हणाले, आजमितीस राज्यात एकूण ६२ विद्यापीठे आणि ३ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. यात २३ राज्य विद्यापीठ, २१ अभिमत विद्यापीठ, ११ खाजगी विद्यापीठे आदींचा समावेश आहे. राज्यात वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. शासनाच्या जोडीलाच खाजगी शिक्षण संस्थांनीही राज्याच्या उच्च शिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची आज विविध महाविद्यालये आहेत. विदर्भात शिक्षणमहर्षी  पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचीही अनेक महाविद्यालये आहेत. पुणे जिल्हा शिक्षण संस्था तसेच नाशिक, अहमदननगर आदी जिल्ह्यांमध्ये मराठा विद्याप्रसारक मंडळांची महाविद्यालये आहेत.

राज्यातील सहकार क्षेत्रानेही शिक्षणात मोलाचे योगदान दिले असून सहकारी साखर कारखान्यांनी आपापल्या परिसरात शाळा-महाविद्याये उभारून शिक्षणाचे मोठे जाळे तयार केले आहे, असेही डॉ. पठाण म्हणाले.  राज्याची शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे मात्र, गुणात्मक शिक्षण हे उच्च शिक्षणासमोरील मोठे आवाहन असल्याचेही त्यांनी सांगितले.


विविधतेत एकता हे भारत देशाचे बलस्थान आहे. देशात झालेल्या शिक्षणाच्या प्रगतीने देश विकासपथावर अग्रेसर झाला आहे. महाराष्ट्रानेही यात मोलाचे योगदान दिले आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या न्यायाने ब्रिटीश सत्तेने भारत देशाला कमजोर करण्यासाठी लॉर्ड मेकॉलेंची शिक्षण पद्धती रूजवून भारतीयांमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतंत्र भारतात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आणि या बदलात महाराष्ट्राचे अग्रगण्य स्थान असल्याचे डॉ.पठाण म्हणाले.


देशात गेल्या ७५ वर्षात उच्च शिक्षण संस्थांचा वाढता आलेख


एकीकडे महाराष्ट्र स्थापनेचे हीरक महोत्सव साजरे होत असताना भारत देशाचेही हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण संस्था स्थापन झाल्याचे डॉ. पठाण म्हणाले. देश स्वतंत्र झाला तेव्हा मुंबई, मद्रास आणि कोलकाता या प्रमुख विद्यापीठासह २५ विद्यापीठे होती आज ही संख्या वाढून देशात एकूण ९६७ विद्यापीठे कार्यरत आहेत. यात ४१८ राज्य विद्यापीठे, १२५ अभिमत विद्यापीठ, ५४ केंद्रीय विद्यापीठ आणि ३७० खाजगी विद्यापीठांचा अंतर्भाव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ५६५ महाविद्यालये होती ही संख्या वाढून आज ३० हजार झाली आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा १८ हजार विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते आज ही संख्या २.५ कोटी एवढी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...