अभिनेता वरुण धवनने अखेर त्याची लहानपणापासूनची मैत्रीण नताशा दलाल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. रविवारी अलिबाग येथील एका रिझॉर्टवर या दोघांचा विवाहसोहळा अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थित सर्वांना कोव्हिड-19 चाचणी करणे सक्तीचे होते, अशी माहिती मिळते आहे. यावेळी वरुणने डिझाईनर कुणाल रावलच्या कलेक्शनमधली शेरवानी घातली होती तर नताशासुद्धा मनीष मल्होत्राने खास तयार केलेल्या लहंगामध्ये दिसली. वरुणने त्यांच्या लग्नाचे फोटो ‘Life long love just became official अर्थात ‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’ अशा कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहेत.
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...


Comments
Post a Comment