Skip to main content

"सांगलीमध्ये अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न."



सांगली/सुहेल सय्यद           

   सांगलीमध्ये नुकतीच अल्पसंख्यांकांची संविधानिक हक्क व अधिकार या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली, या कार्यशाळेचे आयोजन अल्पसंख्यांक कल्याण समन्वय समिती, सांगली शाखेतर्फे करण्यात आले होते. 

           कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून संविधानाचे अभ्यासक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. विनोद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमचे अध्यक्ष झाकीर भाई शिकलगार हे लाभले.

              संविधानाची प्रस्तावना वाचून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली; यावेळी बोलताना डॉक्टर विनोद पवार म्हणाले, भारतीय संविधानाच्या कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांना मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत, या अधिकारांचा वापर करून अल्पसंख्यांक समाजाने त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास साधून घेतला पाहिजे. आज संविधानाच्या मूल्यावर घाला घालण्याचे काम काही जातीयवादी संघटना करीत आहेत. अशावेळी अल्पसंख्यांकांनी आपले संविधानिक  हक्क व अधिकार जाणून घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी केंद्र व राज्य सरकारांच्या योजनांची माहिती घेऊन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत त्या पोहोचवाव्यात. 

                मायनॉरिटी एन.जी.ओ. फोरमचे झाकीर भाई शिकलगार बोलताना म्हणाले  की सध्या केंद्र व राज्य सरकारच्या अल्पसंख्याकांसाठी फारच कमी योजना लागू आहेत व बऱ्याच योजनांची राजकिय नेत्यांकडून नुसतीच घोषणा होते परंतु प्रत्यक्षात त्या योजना सुरू होत नाहीत.ज्या योजना सुरू आहेत त्याला सरकार कडून अतिशय अपुरा निधी दिला जातो त्यामुळे त्याचा लाभ मोजक्याच लोकांना होतो या साठी सर्व अल्पसंख्यांक समाजातील लोकांनी आपापसातील मतभेद विसरून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

              मुनीर मुल्ला यांनी उपस्थितांचे स्वागत केले, प्रवीण नवगिरे यांनी प्रास्ताविक मांडले, याकुब मणेर यांनी सूत्र संचलन केले व आभार प्रदर्शन सौ. जसबिर कौर खंगूरा यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे सुनील फराटे, मुस्लिम समाजाचे मुफ्ती मुजम्मील, फादर नवगीरे, रोहित माळी, सलीम तेरदळाकर, ताहीर शेख, सुहेल सय्यद, जिशान पटेल, रमिज मणेर, सरताज तांबोळी, समीर मुजावर, मुनीर शिकलगार व इतर अल्पसंख्यांक समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...