Skip to main content

3 फेब्रुवारी आद्य क्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करा


 


आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या फाशीचा दिवस 3 फेब्रुवारी आद्य क्रांतिकारक हुतात्मा दिन जाहीर करावा या मागणीसाठी शासनाकडे आग्रह धरणार -आमदार अरुण (आण्णा) लाड


सांगली -भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी 1820 ते 1832 या कालखंडात इंग्रज सरकारविरुद्ध प्रथमच बंडाचा झेंडा उभारला आणि महाराष्ट्राच्या एका भागात स्वतःचे राज्य निर्माण केले. अशा या लढवय्या क्रांती वीरास इंग्रज सरकारने तीन फेब्रुवारी 1832 रोजी पुणे येथील खडक माळ या ठिकाणी फाशी दिले. आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक संपूर्ण भारतासह महाराष्ट्राची एक स्वतंत्र अस्मिता ठरली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 3 फेब्रुवारी हा दिवस आद्यक्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या मागणीचा पाठपुरावा शासनस्तरावर करणार असल्याची ग्वाही पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण (आण्णा)लाड यांनी दिली. 

काल आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आमदार मा.अरुण (आण्णा)लाड यांना भेटले व या मागणीसंबंधी चर्चा करुन निवेदन दिले. तेव्हा आमदार मा.अरुण लाड म्हणाले की उमाजी नाईक यांचे कार्य हे इतिहासातील सर्वात प्रेरणादायी कार्य असून त्यांच्या कार्याची  महती म्हणावी तेवढी पुढे आलेली नाही.स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हुतात्मा झालेल्या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना फाशी दिलेला दिवस 3 फेब्रुवारी हा महाराष्ट्र शासनाने आद्यक्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा यासाठी मी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरणार असून या रास्त मागणीचा पाठपुरावा केला जाईल.यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे, राज्य उपाध्यक्ष दगडू जाधव, राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे तसेच संघटक लक्ष्मण शिंदे बाळासाहेब खेडकर,सोशल मिडीया प्रमुख महेश मदने यांचेसह पलूस शहर शाखेचे पदाधिकारी अनिल जाधव, रमेश जाधव ,आशिष जाधव, सुनील जाधव, संजय जाधव ,धनाजी जाधव, अमित शिरतोडे ,हर्षवर्धन जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...