Skip to main content

युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर



तुळजापूर/अक्षय वायकर -  “जागतिक हात धुणे दिवस” च्या निमित्ताने “हाताची स्वच्छता सर्वांसाठी” या   मोहिमे अंतर्गत  युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रात  घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम झूम ऑनलाइन (ॲपच्या माध्यमातून) आज संपन्न झाला. 

या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यानी बक्षिस फटकावले. त्यामध्ये सिद्धाराम नागनाथ काम शेट्टी (जि. प. प्रशाला मुरूम तालुका उमरगा) याने चित्रकला पोस्टर मध्ये तृतीय क्रमांक तर प्रांजल दत्ता ढवळे इयत्ता 7 वी (सौ ताराराणी प्रशाला भूम) हिने वक्तृत्व (हात धुण्याचे महत्त्व) स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.

या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून 402 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुनम निकम इयत्ता नववी विद्यार्थिनी, डॉ. कमलादेवी आवटे. (सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य), कु. सिद्धी काळे (प्रमुख पाहुणे), मा.युसुफ कबीर (युनिसेफ, महाराष्ट्र), मा.आनंद घोडके (युनिसेफ, महाराष्ट्र), मा.राघवेंद्र मुनघाटे (शिक्षणाधिकारी, गडचिरोली)., मा. अंबादास मानकर (शिक्षणाधिकारी, वाशिम) हे मान्यवर उपस्थित होते.

15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुणे दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून  11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.  

या स्पर्धांमध्ये हात धुण्याची पद्धती आणि जनजागृती तयार करणारा व्हिडिओ तयार करणे. 

हात कधी कधी धुवावे आणि त्याचे महत्त्व सांगणारे चित्र किंवा पोस्टर काढणे. 

नाविन्यपूर्ण हात धुण्याचे ठिकाण बनवणे आणि त्याचे फोटो काढून पाठवणे. 

वॉश टॉक व्हिडिओ हात धुण्याचे महत्त्व सांगणारे वक्तृत्व 

अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून जवळजवळ २१७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या दरम्यानच्या काळात जवळजवळ ४३ हजार ५५४ लोकांनी सी.वाय.डी.ए.च्या फेसबुक पेजला  ३ हजार  ५००  संकेतस्थळाला भेट देऊन स्पर्धेबद्दल माहिती घेतली.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...