शिवार संसदच्या भावनिक हाकेला शेतकऱ्यांची साथ , अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या नाही..
उस्मानाबाद:- मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मागील चार दिवसांपासून शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे ; पण सुदैवाने उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अजुन तरी तसा अनुचित प्रकार घडलेला नाही. पाच दिवसापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शिवार कडून आवाहन केले होते की, " आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा " या भावनिक हाकेला लगेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ही दिला.
शिवार हेल्पलाइनवर शेतकऱ्यांनी कॉल करून आपल्या भावना व्यक्त केल्या. पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.
शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.अशी माहिती जिल्हा समन्वयक अशोक कदम यांनी दिली.

Comments
Post a Comment