Skip to main content

उंदरगाव मध्ये पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन



माढा/राजकुमार माने -  रयत क्रांती संघटना व नवहिंदवी स्वराज्य कला क्रिडा व सांस्कृतिक बहु. संस्था, उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उंदरगाव गावामध्ये आज सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मोफत पशुचिकित्सालय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लाळ्या , खरखुत, लसीकरण, तसेच गर्भधारणा तपासणी, वांजपणा तपासणी, तसेच विविध आजार यांची  तपासणी करण्यात आली. 100 जणावराना लसीकरण करण्यात आले. 25 जनावरांची गर्भधारणा तपासणी करण्यात आली. ह्या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून जगप्रसिध्द चित्रकार रत्नदीप बारबोले आणि उंदरगाव चे युवा नेते अभयसिंह मस्के लाभले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून उंदरगाव चे उपसरपंच ऋषिकेश तांबिले, व युवा नेते रवी चव्हाण उपस्थित होते.शेतकऱ्यांसाठी हे लसीकरण आणि गर्भधारणा तपासणी शिबीर मोफत आयोजन करण्यात आले होते. रयत क्रांती संघटना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या पुढे ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोबत राहील .त्याप्रसंगी दीपक आरे,  रविकांत कोळेकर, उत्तम साळुंके, शंकर साळुंके, अस्लम शेख, वामन तांबिले, मारुती सरवदे, बाबासाहेब वाघमोडे, सुनील नाईकवाडे, तुकाराम पाटील, विष्णू सुतार , संजय नाईकवाडे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी रयत क्रांती चे पंडित साळुंके, संतोष कोळी, अमोल तांबिले, नितीन रंगा चव्हाण, औदुंबर लवटे, नितीन बापूराव चव्हाण, प्रवीण चव्हाण,आबासाहेब कोळेकर, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...