सिंदखेडराजा /बालाजी सोसे - सध्याच्या सरकारच्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अत्याचार , विनयभंग आणि हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अतिशय संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवर अत्याचार आणि विनयभंग सत्र सुरूच आहे . .त्याकरिता आज सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर भाजप च्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र मध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महा विकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचार घटनेचा वाचा फोडण्यासाठी एक दिवस आंदोलन करण्यात आलेलं होतं परंतु तरीही महाविकास आघाडी सरकार कुठली दखल न घेतल्यामुळे व पाऊल न उचलल्यामुळे आज दिनांक १२/१०/२०२० रोजी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचारा विरोधात तसेच त्याच्या सुरक्षिते साठी कडक कायदा करावा . अशी मागणी करण्यात आली . यावेळी उपस्थिती सौ सुनीता ताई राजोते जिल्हा सचिव भाजपा महिला आघाडी मोर्चा,सौ अनिता शिगणे महिला मोर्चा ,सौ नंदाताई मेहेत्रे नगर उपाध्यक्ष,सौ शोभाताई काळे, सौ उज्वलाताई नागरे, सौ प्रियाताई केळकर व तसे प्रमुख उपस्थिती श्री मा तोतारामजी कायदे माजी आमदार सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ श्री मा प्रभाकरजी मामा ताटे भाजप जिल्हा उपाध्यक्ष, श्री विष्णूभाऊ मेहेत्रे ,श्री गजानन घुले भारतीय जनता पार्टी सिंदखेड राजा तालुकाधक्षकृा ,श्री कृष्णा काळे, श्री दीपक पडळकर कि राजा, श्री बाळासाहेब केळकर ,श्री युवराज नागरे , श्री सुभाषभाऊ मुंडे प चक्का, श्री सुंदरराव आढाव , श्री दिपक घुगे , श्री बंडू नागरे, श्री राजू गुंजाळ, आणि जावेदभाई इतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते .
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

Comments
Post a Comment