Skip to main content

अवैध धंद्याच्या विरोधात SFI-DYFI ची 1 लाख सह्यांची मोहीम

 


सोलापूर/शाम आडम : सोलापूर शहर अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेला आहे. याला इथले लोकसेवक, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याशी मिलिभगत असणारी प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. समाजाला अवैध धंद्यांचे विष पाजणारे लोक स्वतःला समाजसेवक संबोधतात. हीच या लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. या अवैध धंद्यांच्या विळख्यातून श्रमिकाला कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी लोकप्रबोधनाची गरज आहे. म्हणून अवैध धंद्यांच्या विरोधात 2 ऑक्‍टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) तसेच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ(DYFI) च्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना समक्ष भेटून देणार असल्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली.

दत्तनगर लाल बावटा कार्यालय येथे मंगळवारी (ता. 29) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माकपचे ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार श्री. आडम (मास्तर) बोलत होते. 


श्री. आडम पुढे म्हणाले, ही लांब पल्ल्याची लढाई असून जनतेला विश्वासात घेऊन आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा पवित्रा अधिक आक्रमक करणार आहोत. सोलापूर हे कष्टकरी कामगारांचे शहर आहे. येथे विडी कामगार, यंत्रमाग कामगार, शिलाई कामगार, बांधकाम कामगार, रिक्षाचालक, उपहारगृहात काम करणारे कामगार, फळभाजी विक्रेते, फेरीवाले, चारचाकी वाले विशेष म्हणजे सुशिक्षित तरुण वर्ग असे अनेक विविध संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार मटका व्यवसायाच्या आहारी गेलेले आहेत. बदलत्या काळानुसार या व्यवसायात आधुनिक बदल करून ऑनलाइन पद्धतीने मटका व्यवसाय एजंटांमार्फत चालू आहे. 


शहरात मोठ्या प्रमाणात संघटित गुन्हेगारी, सराईत गुंड आणि समाजकंटक यात वाढ होत आहे. याचा दूरगामी परिणाम सुसभ्य समाजावर होत असून सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला बाधा निर्माण होत आहे. त्यात कष्टकरी कामगारांची मटका व्यवसायाच्या माध्यमातून होणारी लयलूट तातडीने थाबली पाहिजे. मटका व्यवसाय आणि मटका चालक याला खतपाणी घालणारे लोकप्रतिनिधी, लोकसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांची जी साखळी आहे ती तोडून सोलापूर शहर गुन्हेगारीमुक्त, अवैध धंदेमुक्त करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावी. वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस प्रशासनामार्फत नि:पक्षपाती चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई करावी; अन्यथा सबंध मटका, जुगार, अवैध धंदे यापासून पीडित असलेल्या कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना घेऊन महाराष्ट्र राज्यभर आंदोलन छेडणार आहे. 

पत्रकार परिषदेस ऍड. एम. एच. शेख, युसूफ शेख, विक्रम कलबुर्गी,मल्लेशम कारमपुरी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...