मंगळवेढा/अमीर अत्तार-आज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे ढोल बजावे सरकार जगाओ आंदोलन मंगळवेढा तालुक्यातील पश्चिम भागात सर्वात मोठे तीर्थक्षेत्र तसेच महाराष्ट्रात दक्षिण काशी म्हणून म्हणून ओळखली जाणारी सूक्षेत्र श्री. बिरोबा व महालिंगराया यांच्या पावन नगरी मध्ये हुलजंती येथील ग्रामपंचायत समोर आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्याचे माझी.उपसभापती मा. श्री. शिवाजीराव पटाप यांनी धनगर समाज बांधवांना घेवुन ढोल बजाओ सरकार जगावो आंदोलन पार पाडली यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते, दत्ता पेटर्गे, मंगळवेढा तालुका ग्राहक मंच तालुकाध्यक्ष अविनाश कोरे गौडाप्पा पाटील, नागेश मासाळ आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

Comments
Post a Comment