सिंदखेड राजा/बालाजी सोसे - सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक २०/ते२१/९/२०२० सकाळी पहाटे पर्यंत मुसळधार पावसाने धुमशान घातला आणि आजसुद्धा या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस चालूच आहे .असून जऊळका गावाला त्याचा फटका बसलेला आहे. शेतातील ओढे नाले तुडुंब भरल्याने पाणी शेतात गेले आणि होत्याचं नव्हतं झालं.जिवापाड जपलेली पिक डोळ्यादेखत वाहून गेले आता जागायचा कस हा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे याअगोदर मूग हे पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याकडे फक्त आता सोयाबीन आणि कपाशी राहिलेली होती ती पण आता पूर्ण खाली पडल्यामुळे शेतकऱ्याला फार मोठा धक्का बसलेला आहे शेतकऱ्याचे मुख्य पीक कपाशी . मूग.आणि सोयाबीन आहे आता सर्वच गेल्याने जऊळका येथील शेतकरी दामोधर सांगळे, अशोक सांगळे, समाधान बुधवत, स्वप्निल सांगळे, यांनी आमच्याशी संपर्क साधून आपल्या ए बी एस न्यूज इकडे व्यथा मांडली आणि आमचे पंचनामे करून आम्हाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...


Comments
Post a Comment