Skip to main content

अधिकाऱ्यांशी चर्चा करू; सोलापूरच्या लॉकडाउनचा निर्णय उद्या जाहीर करु


सोलापूर -सोलापूर शहर व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या व कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणायचा कसा? असाच प्रश्न सर्वसामान्यांसह जिल्हा प्रशासनालाही पडला आहे. 15 दिवसांसाठी सोलापूर शहर व परिसरात कडक संचारबंदी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तयार केला आहे. या प्रस्तावाबाबत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जे जे प्रयत्न आवश्‍यक आहे ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. पंधरा दिवसाच्या कडक लॉकडाऊन बाबत उद्या (गुरुवारी) मी सोलापुरात आल्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल.
दरम्यान, पालकमंत्री भरणे उद्या (गुरुवारी) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी 11 वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर साडेअकरा वाजता ते सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत. त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गच्या प्रकल्पाबाबतही ते आढावा बैठक घेणार आहेत. पालकमंत्री भरणे यांच्या उद्याच्या दौऱ्यात सोलापुरातील लॉकडाऊन बाबत ठोस निर्णय व तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या सोलापुरात दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन पुन: प्रारंभच्या माध्यमातून सवलती दिल्यानंतर अवघ्या 18 ते 20 दिवसांमध्ये सोलापूर शहरातील कोरोना बाधितांची व मृतांची संख्या दुप्पट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याने हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? याची चाचपणी सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. या उपाययोजनाचा प्रमुख भाग म्हणजे 15 दिवसासाठी कडक लॉकडाऊन हा पर्याय समोर आला आहे. सोलापूर शहरात करण्यात येणारे संभाव्य लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याशी याबाबतची चर्चा करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...