Skip to main content

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा-पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि. 29 – जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.कोरोनाच्या प्रार्दुभावावर विचार करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी  चर्चा केली. या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीसांना या सूचना केल्या.             

      जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागहात ही बैठक झाली. या बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, श्री. रणजितसिंह नाईकनिंबाळकर, श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, भारत भालके,  शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत,  संजयमामा शिंदे, यशवंत माने, प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदी उपस्थित होते.     
      
          याबैठकीत सर्व खासदार, आमदार यांनी आपल्या समस्या सूचना मांडल्या. यामध्ये आमदार भारत भालके यांनी हमीभाव केंद्र सुरू करा.  उजनी धरणातून नदीत पाणी सोडा, अशी मागणी केली. आमदार राजेंद्र राऊत यांनी वैद्यकीय साधन सामग्री तात्काळ मिळावी, अशी मागणी केली . आमदार सुभाष देशमुख यांनी सिविल हॉस्पिटलमधील स्वच्छता करण्याची मागणी केली. आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील खाजगी दवाखान्यात कोविड पेशंटवर उपचार करण्याची मागणी केली.           

       सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर वैद्यकीय साधन सामग्री तात्काळ खरेदी करून संबंधित तालुक्यात दिली जावी, अशा सूचना दिल्या. बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवा वे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे , अशा सूचना केल्या. प्रत्येक आमदारांनी आप-आपल्या तालुक्याची आणि महापौरांनी शहराची काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले.       
      
       प्रत्येक तालुक्यात थर्मल स्कॅनर आणि पल्स औक्सिमीटर घेण्यात यावे. संशयित रुग्ण आढळल्यास त्याची कसून तिथेच तपासणी करण्यात यावी. त्यास लगेच आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.  

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...