प्रतिनिधी - कारी मध्ये गरीब, वंचीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून रमजान ईद साजरी करण्यात आली. सध्या देशात कोरोना या रोगाचे सावट असल्यामुळे कारी येथील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची नमाज घरातच पठण केली. रमजान ईद अगदी साध्या पध्दतीने साजरी करून उरलेल्या पैश्यातुन वंचित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या किटच वाटप करण्यात आले. गावामध्ये 35-40 किटच वाटप मुस्लिम समाजाकडून करण्यात आले.यावेळी कारी गावचे उपसरपंच रिझवान सय्यद ,चांद मुजावर, आसिफ मुलानी, दाऊद आतार, तन्वीर मुलाणी, सकलेंन सय्यद,आदम मुजावर आदींनी परिश्रम घेतले.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...
Comments
Post a Comment