प्रतिनिधी - कारी मध्ये गरीब, वंचीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून रमजान ईद साजरी करण्यात आली. सध्या देशात कोरोना या रोगाचे सावट असल्यामुळे कारी येथील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची नमाज घरातच पठण केली. रमजान ईद अगदी साध्या पध्दतीने साजरी करून उरलेल्या पैश्यातुन वंचित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या किटच वाटप करण्यात आले. गावामध्ये 35-40 किटच वाटप मुस्लिम समाजाकडून करण्यात आले.यावेळी कारी गावचे उपसरपंच रिझवान सय्यद ,चांद मुजावर, आसिफ मुलानी, दाऊद आतार, तन्वीर मुलाणी, सकलेंन सय्यद,आदम मुजावर आदींनी परिश्रम घेतले.
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...
Comments
Post a Comment