Skip to main content

उडान फाऊंडेशनचे गरजू कुटुंबांना धान्य किटचे वाटप


बार्शी (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन काळात बार्शीतील उडान फाऊंडेशनने यावर्षीचा होणारा रमाजान ईदवरील खर्च टाळून गरजू कुटुंबांना किराना किटचे वाटप करून ईद साधेपणाने करणार असल्याचा संदेश दिला.

प्रतिवर्षी उडान फाऊंडेशन व
फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव जमील खान, उद्योजक युन्नुस् शेख, शब्बीर वस्ताद, शोएब काझी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ ईदसाठीचे  लागणारे साहित्य गेली पाच वर्षे बार्शीतील गरीब कुटुंबांना वाटप करते. परंतू यावर्षी नायब तहसीलदार संजीवन मुंढे व पुरवठा अधिकारी ऋषिकेश धनवडे यांच्या हस्ते किराणा किटचे सामान देऊन सुरवात करण्यात आली.

यावेळी मंडळाचे सचिव जमील खान यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, फाऊंडेशनने लॉकडॉऊन जाहीर झाल्यापासून बार्शीतील सर्वधर्मिय पाचशे कुटुंबांना आतापर्यंत किराणा मालाचे किट दिले आहेत. तसेच भगवंत अन्नछत्रालय, आंधळकर अन्नछत्रालय, ऍड.असिफभाई तांबोळी अन्नछत्रालय यांना देखील मदत केली असल्याचे सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, उद्योजक युन्नुस् शेख, शकिल मुलाणी, शोएब काझी, शब्बीर वस्ताद, वसीम मुलाणी, हाजी शिकवलकर, तौसीफ बागवान, अल्ताफ शेख, मोईन, सादिक, अय्यूब शेख, बाबा शेख, रॉनी सय्यद, जिलानी शेख, मोहसीन पठाण, साजन शेख, मुन्ना बागवान, अबू शेख व इकबाल शेख यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...